शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

सेकंड इनिंगच्या वाटेवर ' सेवाभावी केंद्रां' चा आधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2019 11:51 IST

उतरत्या वयात माणसांना सहवासाची व आधाराची गरज असते...

ठळक मुद्देभविष्यातील काळाची गरज :  सामाजिक बांधिलकी जपण्याचा हेतू 

दीपक कुलकर्णी-  पुणे : नोकरीतून निवृत्त होऊनही त्यांची काही वर्षे उलटलेली असतात. तसेच आयुष्याच्या पूर्वार्धात कमाईतून केलेली बचत किंवा आता निवृत्तीवेतनामुळे आर्थिक संपन्नताही पदरी असतेच. आयुष्यातील मुलांची शिक्षणे, नोकरी, लग्नकार्य यांसारख्या जबाबदाऱ्यांतून मुक्त होत आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यांकडे त्यांची वाटचाल सुरु असते.. अशा वेळी जोडीदारापैकी कुणी एकाने जगाचा निरोप घेतलेला असतो. तर कधी कधी आजारपणात हतबल अवस्थेत दोघेही जगात असतात. रोजच्या धावपळीत मग ही मंडळी नकळतपणे दुर्लक्षित होऊन जातात. अशा वेळी शहरातल्या ज्येष्ठ नागरिकांची सर्वतोपरी सेवासुश्रूषा करत जबाबदारी घेणाऱ्या  सेवाभावी केंद्रे उत्तम पर्याय ठरू पाहताहेत...शहरी भागातील ज्येष्ठ मंडळींविषयी अपुरी मनुष्ययंत्रणा, निराधारता, देश-विदेशात स्थलांतरित असलेल्या कौटुंबिक व्यक्तींमुळे ही समस्या दिवसेंदिवस वाढते आहे. मात्र, पुणे शहर किंवा परिसरात अंदाजे शंभरच्यावर नोंदणीकृत 'ज्येष्ठ नागरिक सेवा केंद्र 'उपलब्ध आहे. या केंद्रांमध्ये निराधार लोकांसह पेइंग गेस्ट म्हणून आश्रय घेता येतो. तिथे अनेक लोक राहत असल्याने कौटुंबिक वातावरणासह, तुमच्या आहारविहार, आरोग्य यांसह विरंगुळ्याची विविध साधने यांची उत्तम सोय केलेली असते. सकाळी उठण्यापासून ते रात्री झोपेपर्यंत असे सर्व काही अतिशय चोख पद्धतीने नियोजन केलेले असते. आभाळमाया संस्थेच्या डॉ. अपर्णा देशमुख म्हणाल्या, की उतरत्या वयात माणसांना सहवासाची व आधाराची गरज असते. त्याच वयात काही जणांच्या आयुष्यात एकांतवास येतो. त्यात शारीरिक समस्यांमुळे इमारतीमधून नित्याची चढ उतार शक्य होत नाही. सभोवताली आरोग्याची काळजी घेणारे आणि मानसिक आनंद देणारे सभोवताली नसल्याने या व्यक्ती चिडचिड्या होतात. त्यातून अनेक आजारांची निर्मिती होते. मात्र आभाळमायासारख्या संस्थांमध्ये अशा व्यक्तींची काळजी घेतली जाते........काही दिवसांपूर्वी मला एका दुचाकीस्वाराने धडक दिली. या अपघातात पायाला आणि हाताला जबर दुखापत झाली. जवळपास ३ ते ४ महिने मला डॉक्टरांनी बेडरेस्ट सांगितली होती. अशा वेळी माझे जवळचे नातेवाईक पुण्यात नसल्याने काळजी घेण्यासाठी कुणीही मंडळी उपलब्ध होत नव्हती. मोलकरीण बाईला जास्तीचे पैसे देऊनसुद्धा राहिलेल्या वेळेत माझ्याकडे येत असे. त्यामुळे जेवण, नाश्ता, औषधे वेळेवर न मिळाल्यामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागला. - एक पीडित वयस्कर महिला. ...........आम्ही नोकरीला असतानाच उतारवयातली आर्थिक तरतूद करून ठेवली आहे. तसेच निवृत्तीवेतनपण मिळते आहे. पण आता माझ्यासह कुटुंबातील सगळ्या सदस्यांची सत्तरीकडे वाटचाल सुरु आहे. जोपर्यंत हातपायांची हालचाल व्यवस्थितपणे सुरु आहे तोपर्यंत आम्ही घरात राहू. पण जेव्हा वाटेल की आता हालचाल करणे शक्य नाही तेव्हा आनंदाने सेवा केंद्राचा पर्याय निवडण्यात अडचण नसेल. तेथील वातावरण जवळून अनुभवण्यासाठी विविध केंद्रांना आम्ही भेटी दिल्या आहेत. तिथलं वातावरण, घेतली जाणारी काळजी, आहार असं सारं काही उत्तम आहे.  - एक वयस्कर कुटुंब..........कायमस्वरूपी आणि पेइंग गेस्ट म्हणून आमच्या संस्थेत तुम्हाला राहता येते. खेळीमेळीच्या वातावरणात सर्वजण एखाद्या कुटुंबाप्रमाणे एकमेकांच्या सुख दु:खाचे भागीदार होतो. प्रत्येकाच्या आरोग्याची नित्यनियमाने काळजी घेतली जाते. सध्या वयस्कर मंडळींसाठीच्या केअर टेकर संस्था निर्माण होणे ही काळाची गरज आहे. - नीलिमा धेंडे , निर्मल सेवा केंद्र, हडपसर. ...........

टॅग्स :PuneपुणेSenior Citizenज्येष्ठ नागरिकHealthआरोग्यFamilyपरिवार