शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
18
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
19
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
20
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय

पुण्यातून उलगडणार अंतरिक्षाचे गुपीत...!; इन्स्टिट्यूट आॅफ अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल स्पेस सायन्सची उभारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2018 11:52 AM

उपयोजित विज्ञानासोबत मूलभूत विज्ञानाची जोड त्यांना असणे गरजेचे आहे, ही गरज पूर्ण करण्यासाठी  इन्स्टिट्यूट आॅफ अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल स्पेस सायन्स (आयएएसएस) या संस्थेची पुण्यातील मुकुंद नगर येथे उभारणी करण्यात आली आहे.

ठळक मुद्देखगोल विज्ञान हा प्रत्येक माणसाच्या रोजच्या जगण्याचा अविभाज्य घटकसंस्थेत ९ वर्षापुढील विद्यार्थ्यांना अंतरिक्ष संशोधन विषयांचा शिकवला जाणार अभ्यास

अभिजीत डुंगरवाल बिबवेवाडी : शहरातील शैक्षणिक संस्थांमधून कुशल तंत्रज्ञ, अभियंते तयार होत असताना उपयोजित विज्ञानासोबत मूलभूत विज्ञानाची जोड त्यांना असणे गरजेचे झाले आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी  इन्स्टिट्यूट आॅफ अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल स्पेस सायन्स (आयएएसएस) या संस्थेची पुण्यातील मुकुंद नगर येथे उभारणी करण्यात आली आहे.

खगोल विज्ञान हा केवळ शालेय अभ्यासक्रमात शिकण्याचा किंवा वेधशाळेत अभ्यास करण्याचा विषय नसून हा प्रत्येक माणसाच्या रोजच्या जगण्याचा अविभाज्य घटक आहे. खगोलशास्त्र, खगोल अभ्यास म्हणूनच प्रत्येकासाठी अत्यावश्यक आहे. आज जगात खगोलशास्त्रात मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू आहे. नासा, इसा, इस्रो या अवकाश संस्था चंद्र, मंगळ ग्रहीय मोहिमा राबवत आहेत. अवकाशाचे गूढ सातत्याने उलगडले जात आहे. या निमित्ताने भारतभरातील विद्यार्थीदेखील या शाखेकडे व्यावसायिकदृष्ट्या पाहत आहेत. विज्ञानप्रसारक म्हणून काम करायचे असल्यास विज्ञान व खगोल विज्ञानाचा पुरेसा अभ्यास करणे गरजेचे असते. प्रथमत: आकाश निरीक्षणाची सवय जडणे अत्यावश्यक आहे. पुस्तकी ज्ञानापेक्षा निरीक्षणातून, अनुभवातून कायमचे ज्ञान मिळते.

आयएएसएस  या संस्थेत ९ वर्षापुढील विद्यार्थ्यांना अंतरिक्ष संशोधन, निरीक्षण, ग्रह-तारे यांचा अभ्यास, ग्रहणे, धुमकेतू, अवकाशातील आश्चर्य, सूर्यमाला, विश्व, ताऱ्यांचा जन्म आणि मृत्यू, आकाश दर्शन, उल्कावर्षाव, लघुग्रह, अशनी, ग्रहणे, दुर्बिणींचे प्रकार अशा अनेक विषयांचा अभ्यास शिकवला जाणार आहे. तसेच चित्र व ध्वनिफितीच्या साह्याने विद्यार्थ्यांना खगोलशास्त्राचा प्राचीन इतिहास सांगितला जाणार असून खगोलशास्त्रीय बाबींची उकलही या संस्थेंतर्गत करण्यात येणार आहे. या बरोबरच विद्यार्थ्यांना स्वत: चा टेलीस्कोप बनविण्याचे शिकविण्यात येणार आहे. रॉकेट, सॅटलाईट कसे बनते हे दाखवण्यात येत आहे. खगोलशास्त्राविषयी विद्यार्थ्यांना ज्ञान मिळावे, या उद्देशाने या संस्थेची  स्थापना करण्यात आली आहे. अंतराळात धाव घेऊ शकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पंखांना बळ देण्याचे काम यानिमित्ताने केले जाणार आहे. दुर्बिणीशिवायही खगोलीय घटनांचे निरीक्षण करता येते. बुध, शुक्र हे ग्रह सूर्यासमोर असताना दिसत नाहीत. परंतु ते नेहमी सूर्योदयापूर्वी पूर्वेला आणि सूर्यास्तानंतर पश्चिमेला काही तास दिसतात. नियमित निरीक्षणाने किंवा वार्षिक वेळापत्रकाच्या संदर्भाने आपण ग्रहांच्या उगविण्याची व मावळण्याची वेळ पाहू शकतो. हे दोन्ही ग्रह साध्या डोळ्यांनी पाहू शकतो. दुर्बिण (चार ते पाच इंच व्यासाची) असल्यास शुक्राच्या कळा पाहता येतात. मंगळ, गुरू, शनी हे ग्रहसुद्धा साध्या डोळ्यांनी पाहता येतात. दुर्बिणीने गुरूचे दोन समांतर पट्टे आणि चार उपग्रह पाहता येतात. शनीची रिंग पाहता येते. हे तीनही ग्रह रात्री पूर्वेकडून उगवल्यानंतर मावळेपर्यंत दररात्री पाहता येऊ शकतात. दररोज अवकाशात स्वत: भोवती व सूर्याभोवती फिरणारी पृथ्वी, दररोज अवकाशात उगवणारा व मावळणारा सूर्य, कलेकलेने मोठा होत जाणारा चंद्र, सूर्य-चंद्र-ताऱ्यांपासून मिळणारा प्रकाश, गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव आणि एकूणच आपल्या दैनंदिन घडामोडी या खगोलीय नियमानुसार घडत असतात. निसर्गाची व मानवाची प्रत्येक हालचाल ही विज्ञानाच्या नियमानुसार नियंत्रित होत असते. म्हणून आपण एकदा विज्ञानाचे नियम समजून घेतले तर आपल्या जीवनात दु:ख, चिंता कमी होऊन आनंद दुणावेल.आपल्यापासून जे लांब असते त्याची आपल्याला उत्सुकता असते. तेथे घडणाऱ्या घडमोडींची माहिती आपल्याला व्हावी असे माणसाला वाटत असते. यातूनच विज्ञान आणि संशोधनाच्या शाखा विकसित होत गेल्या. खगोलशास्त्र हा तर पूर्णत: कुतूहल आणि नावीन्याने भरलेला विषय आहे. यातूनच माणूस चंद्र, मंगळ या ग्रहांपर्यंत पोहचू शकला. पण तरीही असे अनेक प्रश्न आहेत जे आजही अनुत्तरीत आहेत. अवकाश निरीक्षक बनण्यासाठी विज्ञान शाखेच्या फारशा पदव्यांची गरज नाही. खगोलीय घडामोडी जाणण्याची व पाहण्याची आवड आहे. निरीक्षणासाठी वेळ आहे तो प्रत्येकजण खगोलप्रेमी, निरीक्षक व अभ्यासक बनू शकतो. बहुतांशी प्रगत देशांमध्ये देशाच्या अर्थसंकल्पाच्या सुमारे दोन टक्के हिस्सा हा विज्ञान संशोधनासाठी राखून ठेवलेला असतो. काही वर्षांपूर्वीपर्यंत भारतात हे प्रमाण अर्ध्या टक्क्यांच्या आसपास होते. गेल्या काही वर्षांत भारत अनेक नवनवीन वैज्ञानिक महाप्रकल्पांमध्ये सहभागी होत आहे. या सर्व प्रकल्पांमध्ये शेकडो कोटी रुपये गुंतवले जात आहेत. आणि त्याचबरोबर सध्याची आघाडीच्या वैज्ञानिकांची पिढी ही हळूहळू निवृत्तीकडे सरकत आहे. त्यामुळे या महाप्रकल्पांचा उपयोग करून घेण्यासाठी देशाला मोठ्या प्रमाणावर वैज्ञानिकांची गरज आहे. जे हुशार विद्यार्थी या घडीला संशोधनाचे क्षेत्र निवडतील त्यांना येत्या काही वर्षांत भारतीय संशोधन क्षेत्राचे नेतृत्व करण्याची संधी मिळेल. 

टॅग्स :Puneपुणेscienceविज्ञान