शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

पुनर्वसन झाल्याशिवाय शिक्के काढू देणार नाही; भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2020 21:00 IST

भामा-आसखेड धरणग्रस्तांच्या पुनर्वसनचा प्रश्न ३१ वर्षांपासून प्रलंबित

ठळक मुद्देभामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांचा इशारा : तीव्र आंदोलन करण्याचा दिला इशारापाचशेच्या वर धरणग्रस्त पॅकेजचे पैसे मिळण्याच्या रांगेत ६ महिन्यांपासून उभे

पाईट : भामा-आसखेड धरणग्रस्तांचे जोपर्यंत पुनर्वसन होत नोही, तोपर्यंत लाभक्षेत्रामध्ये संपादित केलेल्या जमिनीवरील शिक्के काढण्यास भामा-आसखेड धरणामध्ये बाधित झालेल्या धरणग्रस्त शेतकºयांनी विरोध दर्शविला आहे. तसा प्रयत्न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा धरणग्रस्तांनी दिला आहे. भामा-आसखेड धरणग्रस्तांच्या पुनर्वसनचा प्रश्न ३१ वर्षांपासून प्रलंबित आहे. यामध्ये पात्र १११ शेतकऱ्यांचे काहीअंशी पुनर्वसन झाले आहे; परंतु, कोर्टाने पुनर्वसनाचे आदेश दिलेल्या ५६४ पैकी अवघ्या ७० धरणग्रस्तांचे ७/१२ उतारे तयार झाले आहेत. यामुळे त्यांचा ताबा बाकी असून इतर ४९४ धरणग्रस्त जमीन मिळण्याचा प्रतीक्षेत आहेत.  शासनाने अपात्र ठरविलेल्या ३१५ धरणग्रस्त शेतकऱ्यांनी पॅकेजचा मार्ग स्वीकारला. यामध्ये पाचशेच्या वर धरणग्रस्त पॅकेजचे पैसे मिळण्याच्या रांगेत ६ महिन्यांपासून उभे आहेत. अशा परिस्थितीत धरणग्रस्तच्यिंा सर्व मागण्या पूर्ण करण्याची भामा-आसखेड धरणग्रस्त सातत्याने मागणी करीत असून शासनाकडून मात्र कासव गतीने काम चालू आहे. या सर्व गोष्टी होत असल्या तरी, दरम्यान शासनाने पाण्याचे प्रयोजन बदलले. पाणी पुणे महापालिकेला विकले. त्यासाठीची सर्व कामे अती जलदगतीने सुरू आहेत. पाण्याचे प्रयोजन बदलले म्हणून लाभक्षेत्रातील शेतकरी जमिनीवरील शिक्के काढण्याची मागणी करीत आहेत. ‘आम्ही आमच्या जमिनी दिल्या. आम्ही बेघर, भूमिहीन झालो. आमचा विचार कोण करणार?’ असा सवाल धरणग्रस्तांनी विचारला आहे. पाण्याचे प्रयोजन बदलण्यामध्ये धरणग्रस्त शेतकºयांचे कोणतेही हित नसून प्रयोजन बदलले तर लाभक्षेत्र बदलून त्या भागात आमचे पुनर्वसन करा. काहीही करा; पण प्रथम आमचे पुनर्वसन करा, अशी धरणग्रस्त शेतकºयांची मागणी आहे. यासोबतच राहिलेल्या सर्व शेतकºयांचा पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागल्याशिवाय जमिनीवरील शिक्के काढण्यास धरणग्रस्तांचा विरोध राहील............याबाबत भामा-आसखेड धरणग्रस्त आंदोलनातील प्रमुख सत्यवान नवले म्हणाले, ‘‘जोपर्यंत भामा-आसखेड धरणात बाधित झालेल्या शेवटच्या शेतकºयाचे पुनर्वसन होत नाही, तोपर्यंत धरणग्रस्तांसाठी संपादित झालेल्या जमिनीवरील शिक्के काढण्यास धरणग्रस्तांचा तीव्र विरोध असेल. त्यासाठी शासनाने तत्काळ पुनर्वसनाची प्रक्रिया पूर्ण करावी.’’....................

धरणग्रस्तांमध्ये दोन मतप्रवाह आहेत. काहींना जमिनीचा मोबदला रोख स्वरूपात पाहिजे, तर काहींना जमिनी हव्या आहेत. यामध्ये भामा-आसखेड धरणाच्या पाण्याचे प्रयोजन बदलले असून ज्या भागात पाणी मिळत नाही, तेथील जमिनी मागून त्यांच्यावर अन्याय करण्यासारखे होईल. चासकमान धरणातील लाभक्षेत्रातील मोठ्या प्रमाणावर क्षेत्र शिल्लक आहे. शिवाय, भामा-आसखेडच्या नदीपात्रातून शिरूर तालुक्याला जेथे पाणी मिळत आहे, अशा भागात प्रस्ताव भरून दिल्यास कोणावरही अन्याय होणार नाही, अशी भूमिका घेऊन प्रश्न तातडीने सोडविण्याचा प्रयत्न करू.-आमदार, दिलीप मोहिते 

टॅग्स :PuneपुणेDamधरणFarmerशेतकरी