शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

शाळांनी दोन तास कलाशिक्षणाला द्यावेत :सीबीएसईचा नवा नियम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2019 20:10 IST

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) संलग्न शाळांमध्ये पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमात कला शिक्षण (संगीत, नृत्य, नाटक, पाककला) बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला.

पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) संलग्न शाळांमध्ये पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमात कलाशिक्षण (संगीत, नृत्य, नाटक, पाककला) बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या शैक्षणिक वर्षांपासूनच करण्यात येणार आहे. शाळांनी दर आठवडयाला किमान दोन तास कला शिक्षणासाठी द्यावेत असे सीबीएसईकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

शाळांमधील शिक्षण आनंददायी व्हावे म्हणून सीबीएसईकडून काही बदल करण्यात येत आहेत. शाळांचे मुख्याध्यापक, राष्ट्रीय शिक्षण, संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी) आणि कला क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा करून हे बदल करण्यात येत आहेत. कला विषयांची कुठलीही परीक्षा घेतली जाणार नाही, मात्र विद्यार्थ्यांच्या वर्षभरातील एकूण अध्ययनाचे मूल्यमापन केले जाणार आहे. 

कला शिक्षणांतर्गत विद्यार्थ्यांकडून काही प्रयोग, प्रकल्प करून घेतले जाणार आहेत तसेच कलांची मुलभूत ओळख करून दिली जाईल असे सीबीएसईकडून स्पष्ट करण्यात आले आहे. कला शिक्षणामध्ये त्यांना काहीतरी शिकवण्यापेक्षा विद्याार्थ्यांना त्यातून आनंद मिळावा अशी अपेक्षा आहे. त्यामुळे हे शिक्षण समावेशक, संवादी आणि प्रयोगशील अशी अपेक्षा सीबीएसईने काढलेल्या परिपत्रकामध्ये व्यक्त केली आहे.कला शिक्षणामध्ये सीबीएसईने चार प्रकारांना प्राधान्य दिले आहे. त्यात संगीत, नृत्य, दृश्यकला आणि नाटक यांचा समावेश आहे. तर सहावी ते आठवीच्या विद्याार्थ्यांना पाककला हा विषय शिकविण्यात येणार आहे. पाककलेच्या विषयामध्ये पौष्टिक खाद्य, भारतातील पिके, वेगवेगळ्या प्रकारची धान्य, भाज्या, तेल कसे तयार होते, शेतीची योग्य पद्धत आदींचीही माहिती दिली जाणार आहे. त्याचबरोबर विविध राज्यांतील वैविध्यपूर्ण खाद्यासंस्कृतीची ओळख करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

टॅग्स :Educationशिक्षणCBSE Examसीबीएसई परीक्षाartकलाSchoolशाळाStudentविद्यार्थी