शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

शालेय पोषण आहार, विद्यार्थ्यांना भातासोबत मिळणार दुधाची भुकटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 00:59 IST

शालेय पोषण आहार : प्रायोगिक तत्त्वावर तीन महिन्यांसाठी समावेश

नीरा : राज्यात अतिरिक्त झालेल्या दूध व दुधाच्या भुकटीच्या संदर्भात शासनाने उपयोजनांना सुरुवात केली आहे. याअंतर्गत प्रायोगिक तत्त्वावर इयत्ता १ ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेच्या अंतर्गत दुधाची भुकटी देण्याचा निर्णय नुकताच शिक्षण विभागाने घेतला आहे. जिल्ह्यातील पोषण आहार योजनेसाठी पात्र असलेल्या सर्व शाळांना याचा लाभ होणार असून, तीन महिन्यांकरिता हा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येत आहे.

विद्यार्थ्यांची दैनंदिन उपस्थिती टिकावी; तसेच गळतीची समस्या दूर होऊन विद्यार्थ्यांना सकस अन्न मधल्या सुटीत मिळावे यासाठी शासनाने प्राथमिक स्तरावर शालेय पोषण आहार योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेंतर्गत मूगडाळ, तूरडाळ, मटकी, हरभरा, वाटाणा आदी कडधान्यांची उसळ किंवा खिचडीभात वेळापत्रकाप्रमाणे तयार केला जातो. यात आता शासनाच्या निर्णयाने दुधाच्या भुकटीची वाढ झाली आहे. शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या महिन्यात यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कर्नाटक राज्यातील ‘क्षीर भाग्य योजनेचा’ अभ्यास करून शालेय विद्यार्थ्यांना भुकटी वाटप करण्यावर शिक्केमोर्तब करण्यात आले. या निर्णयास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून, पूरक योजना कार्यान्वित करण्यासाठी शिक्षण विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून प्राथमिक विभागाचे शिक्षण संचालक या समितीचे सचिव म्हणून कामकाज पाहणार आहेत. दुधाच्या भुकटीपासून तयार करण्यात आलेले दूध विद्यार्थ्यांना देणे अपेक्षित असून, एका विद्यार्थ्याला एक महिन्यासाठी २०० गॅ्रम भुकटीचे एक पाकीट याप्रमाणे तीन महिन्यांसाठी प्रत्येक विद्यार्थ्याला तीन पाकिटे देण्यात येणार आहेत. भुकटीपासून पालकांनी घरी दूध तयार करून देणे अपेक्षित असल्याचे निर्णयात नमूद करण्यात आले आहे. दुधाच्या भुकटीचे वाटप एकाच दिवशी करण्यात येणार असून, हा दिवस ‘दूध भुकटी वाटप दिवस’ म्हणून जाहीर करण्यात येणार आहे.अतिरिक्त दुधाबाबत शासनाने घेतलेला निर्णय व्यवहार्य वाटत असला, तरी मुलांना घरी दूध तयार करून दिले जाईल याबाबत साशंकता आहे. अंगणवाडीकेंद्रांना गर्भवती मातांसाठी पुरविले जाणारे पूरक आहाराची अशी अनेक पाकिटे जनावरांना खाऊ घातल्याचे अनेकदा निदर्शनास आलेले आहे.

ग्रामीण भागात आजही ताज्या दुधाला जितके महत्त्व आहे तितके दुधाच्या भुकटीला नाही. त्यामुळे पालक हा उपक्रम कशाप्रकारे मनावर घेतात यावर या बदलाचे भवितव्य अवलंबून आहे. पालकांना दुधाच्या भुकटीपासून दूध कसे बनवायचे, याबाबतच्या सविस्तर सूचनाही शाळा प्रशासनाने याच दिवशी द्यायच्या आहेत. दरम्यान, या योजनेअंतर्गत पुरविण्यात येणारी भुकटी राज्यात उत्पादित केलेली असावी, अशी अट घालण्यात आली आहे. 

टॅग्स :PuneपुणेStudentविद्यार्थीfoodअन्न