शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

समलैंगिक विवाह हा चिंताजनक विषय; ८३.९ टक्के भारतीयांचे मत, सर्वेक्षणातून माहिती समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2023 12:06 IST

सर्वांना वाटते की समलैंगिक विवाहांचा भारतीय समाजावर विपरीत परिणाम होईल

पुणे : वैयक्तिक पातळीवर समलैंगिक विवाहांचा स्वीकार करण्याबाबत बहुतांश व्यक्तींचा दृष्टिकोन पारंपरिक आहे. समलैंगिक विवाहांना कायदेशीर मान्यता दिल्यास समाजावर विपरीत परिणाम होण्याची भीती बहुसंख्य व्यक्तींना वाटत आहे. ८३.९ टक्के लोकांच्या मते समलैंगिक विवाह हा भारतात चिंताजनक विषय आहे, तर केवळ १६.१ टक्के लोकांनी हा विषय गंभीर नसल्याचे मत व्यक्त केले आहे.

समलैंगिक विवाहांना कायदेशीर मान्यता देण्याच्या विषयावर पुण्यातील दृष्टी स्त्री अध्ययन प्रबोधन केंद्राने केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. दृष्टी स्त्री अध्ययन प्रबोधन केंद्र हे समाजातील स्त्रियांचे स्थान आणि संबंधित मुद्द्यांवर गेली २० वर्षांपेक्षा अधिक काळ संशोधन करत आहे. समलैंगिक विवाहांबाबत समाजमन जाणून घेणे आणि या विषयावर समाजात प्रचलित असलेले मत जाणून घेणे, हा या सर्वेक्षणाचा उद्देश होता.

दृष्टी स्त्री अध्ययन प्रबोधन केंद्राने १३ भाषांमध्ये हे सर्वेक्षण केले असून, यासाठी प्रतिसाद देणाऱ्यांची विभागणी १८ ते २५, २६ ते ४०, ४१ ते ६० आणि ६०पेक्षा अधिक अशा चार वयोगटांमध्ये, तर पुरुष, स्त्री व अन्य या तीन लिंगांमध्ये करण्यात आली होती.

..काय सांगताे अभ्यास

* ७५ टक्के लोकांना समलैंगिक विवाह ही नैसर्गिक घटना नसल्याचे वाटते.

* सर्वांना वाटते की समलैंगिक विवाहांचा भारतीय समाजावर विपरीत परिणाम होईल.

* प्रतिसाद देणाऱ्या सर्व वयोगटातील आणि लिंगाच्या बहुतांश व्यक्तींनी त्यांच्या किंवा जवळच्या कुटुंबातील समलैंगिक विवाहांना पाठिंबा न देण्याची भूमिका व्यक्त केली.

* भारतीय समाज समलिंगी विवाहास कायदेशीर मान्यता देण्यास तयार नाही. अशा प्रकारचा कायदा झाला तर त्याचे समाजावर दूरगामी दुष्परिणाम होतील, असे समाज मत आहे.

* समलैंगिकतेचा पुरस्कार केल्यास कुमार वयातील मुलामुलींवर त्याचे दुष्परिणाम होतील.

* बाहेरील देशांत हाेत असलेल्या दुष्परिणामांकडे आपण डोळसपणे पाहिले पाहिजे.

* कोणताही निर्णय घेण्यापूर्वी उद्भवू शकणाऱ्या समस्यांवर अध्ययन होणे गरजेचे आहे.

टॅग्स :Puneपुणेmarriageलग्नSocialसामाजिकGovernmentसरकारWomenमहिला