शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

इंदापूरात तालुक्यात लाळ खुरकत रोगाचं थैमान; लस उपलब्ध नसल्यानं पशुधन अडचणीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2021 19:13 IST

रोगाला जनावरं बळी पडत असल्याचं वास्तव असल्याची तक्रार करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे वास्तविक परिस्थितीमध्ये या साथीच्या रोगासाठी प्रशासन सज्ज असायला हवं

बारामती : संपूर्ण इंदापूर तालुका शेतीबाबत प्रगतशील आहे. शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाला प्राधान्य दिलं जातं. मागील काही दिवसांपासून कोरोना महामारी मुळे शेती मालाचे बाजारभाव पडले आहेत. तालुक्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात युवा शेतकरी व सुरक्षित बेकार तरुण दुध उत्पादनाचा व्यवसाय करत आहे. परंतु एक महिनाभरापासून तालुक्यात जनावरांमध्ये ‘लाळ खुरकत’ या रोगानं थैमान घातलंय. मोठ्या प्रमाणात या रोगाला जनावरं बळी पडत असल्याचं वास्तव असल्याची तक्रार करण्यात आली आहे.

याबाबत लासुर्णे (ता.इंदापुर) येथील भाजप चे भटक्या विमुक्त आघाडीचं पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस गजानन वाकसे यांनी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना, पशुधनविकास अधिकाऱ्यांना पत्र दिलंय. येथील कार्यालयीन अधिक्षक अशोक फलफले यांनी हे पत्र स्वीकारलं. यामध्ये वाकसे यांनी शेतकऱ्यांना दुर्दैवानं त्यांना यात प्रचंड अडचणीला तोंड द्यावे लागत असल्याचं नमूद केलंय.

या परिस्थितीमध्ये अडचणी आणखी वाढल्या आहेत. वास्तविक परिस्थितीमध्ये या साथीच्या रोगासाठी प्रशासन सज्ज असायला हवं. परंतु बहुतांश आरोग्य केंद्रात याची लसच उपलब्ध नाही. गावोगावी जाऊन लसीकरण केलेले नाही. ही बाब गंभीर आहे. पुणे जिल्ह्याच्या काही भागात लंगी या आजारानं डोकं वर काढलं आहे. या भयंकर परिस्थिती मध्ये महाराष्ट्र राज्य व पुणे जिल्हा आरोग्य विभाग यांनी तत्परता दाखवत उपाययोजना करावी. अशी मागणी वाकसे यांनी केली आहे. 

टॅग्स :IndapurइंदापूरPuneपुणेAnimal Abuseप्राण्यांवरील अत्याचारdocterडॉक्टरFarmerशेतकरी