शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

साहेब, इंदापूर तालुक्याला तुमच्या एका कॉलची नितांत गरज : राष्ट्रवादीच्या नेत्याची शरद पवारांना आर्तहाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2021 21:06 IST

फक्त पवारसाहेब आहेत तेच इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे अश्रू पुसू शकतील....

इंदापूर : साहेब, तुम्ही दिल्लीला फोन केला,आणि खताच्या किमती कमी झाल्या. तसाच एक आमच्या इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांना एक फोन करा आणि आम्हाला हक्काचे पाच टीएमसी पाणी मिळवून द्या.अशी आर्त हाक राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.शशिकांत तरंगे यांनी दिली आहे.

यासंदर्भात माहिती देताना युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शशिकांत तरंगे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी एक दिल्लीला फोन केलातर खताच्या किमती वठणीवर आल्या.दिल्लीत तर भाजपचे सरकार आहे. परंतु,राज्यात तर शरद पवारांच्या पुढाकाराने बनवलेले महाविकास आघाडी सरकार आहे. त्यामुळे फक्त तुमच्या एका कॉलची इंदापूर तालुक्याला नितांत गरज आहे.बारामती लोकसभा मतदारसंघात इंदापूर तालुका कायम आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे व आगामी काळात देखील त्याच पद्धतीने उभा राहणार आहे, अशी ग्वाही डॉक्टर शशिकांत तरंगे यांनी दिली.

शासकीय स्तरावरूनच इंदापूर तालुक्याला पुण्यातून येणारे पाच टीएमसी सांडपाणी शेतीसाठी देण्याचा निर्णय झाला होता.साठ गावातील शेतकरी आपण हा जो निर्णय दिला होता.या निर्णयामुळे कोरोनाची महामारी असताना देखील पाणी मिळणार या आशेच्या किरणाने शेतकरी खुश होता. मात्र, आपल्याच पक्षाचे जलसंपदामंत्री अचानकच सोलापूर जिल्ह्याच्या दबावाला बळी पडून,चुकीच्या गोष्टी ऐकून इंदापूर तालुक्याला मिळणारे पाच टीएमसी पाणी योजना स्थगित केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आयुष्यावर विरजण पडले आहे. शेतकऱ्यांचे कैवारी फक्त पवारसाहेब आहेत तेच इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे अश्रू पुसू शकतील असाही विश्वास डॉ. शशिकांत तरंगे यांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :IndapurइंदापूरWaterपाणीJayant Patilजयंत पाटीलSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस