शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

"साहेब अन् मी तेव्हाही वेगळे नव्हतो अन् आताही..."; अजित पवारांच्या भाषणावर टाळ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2023 14:25 IST

अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवारांची भेट घेऊन त्यांनाही भाजपसोबत येण्याची विनंती केली होती

पुणे/मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केल्यानंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनीही सत्तेत सहभागी होत मंत्रीपदाची शपथ घेतल्याने एकनाथ शिंदेंनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात दुसरा मोठा भूकंप देशाने पाहिला. अजित पवारांच्या भूमिकेला शरद पवारांचाच पाठिंबा आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र, शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट करत, अजित पवारांना पाठिंबा नसल्याचे म्हटले. तसेच, या बंडखोरांच्या मतदारसंघात जाऊन आपण जनतेशी संवाद साधणार असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. मात्र, अद्यापही काहींना शरद पवार व अजित पवार एकत्रच असल्याचे वाटते. त्यातच, अजित पवार गटाकडून सातत्याने तसे दाखवण्याचा प्रयत्नही केला जातो. 

अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवारांची भेट घेऊन त्यांनाही भाजपसोबत येण्याची विनंती केली होती. मात्र, पवारांनी ही विनंती फेटाळून लावत विरोधी पक्षांच्या आघाडीच्या बैठकीत सहभाग घेतला होता. मात्र, शरद पवार आमचे मार्गदर्शक आहेत, तेच आमच्या पक्षाचे प्रमुख आहेत, असे अजित पवार गटाकडून सांगण्यात येते. आता, पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील एका कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी पुन्हा एकदा तसेच संकेत दिले आहेत. माजी आमदार स्व. बाबुराव पाचरणे यांच्या स्मारक उद्घाटनासाठी अजित पवार आले होते. त्यावेळी, बोलताना अजित पवारांनी चांगलीच फटकेबाजी केली. 

मी आज इकडे येण्यासाठी सकाळी साडे पाच वाजताच निघालो होतो, लवकरच कार्यक्रम आटोपून पुढे जावं असं मनात होतो. तर, दादा तुम्ही सकाळी ७ वाजता कार्यक्रमाला जाता, पण तिथं लोकं कशी येतात? असं मला अनेकजण विचारतात. त्यावर, आपण लोकांना कशा सवयी लावतो, त्यावर ते अवलंबून असतं. आपल्याला पवारसाहेबांनी सकाळपासून कामाची सवय लावल्याचं अजित पवार यांनी म्हटलं. तसेच, यावेळी जुन्या आठवणी सांगताना त्यांनी सध्या राजकीय परिस्थितीवरही अलगदपणे भाष्य केलं. 

''अगदी सुरुवातीच्या काळात, पोपटरावांनाही आठवत असेल. पोपटराव हे साहेबांचे उमेदवार आणि बाबूराव माझा उमेदवार असा प्रचार झाला. त्यावेळी म्हटलं, साहेब आणि मी काही वेगळे आहेत का?. आम्ही तेव्हाही वेगळे नव्हतो आणि आताही वेगळे नव्हतो, काळजी करू नका, असे अजित पवारांनी म्हटले. त्यावेळी, उपस्थितांमध्ये हास्यकल्लोळ झाल्याचं पाहायला मिळालं. तर, अजित पवारांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादीतील फुटीवर चर्चा सुरू झाल्या आहेत. तसेच, अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील बंड नेमकं काय? हे कोडं अनुत्तरीतच राहिल्याचं बोललं जात आहे. 

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुण्यात लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. त्यामुळे, राष्ट्रवादीतील बंडानंतर शरद पवार आणि अजित पवार पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमासाठी एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. अजित पवार यांनी सकाळी केलेलं ते विधान आणि त्यानंतर एकाच व्यासपीठावरील उपस्थितीची चर्चा आज महाराष्ट्रात होत आहे. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसMumbaiमुंबई