शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

दंगली घडवणे हा तर 'मविआ' सरकारच्या नियोजनाचा भाग; पुण्यात भाजपची आंदोलनातून टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2021 11:40 IST

त्रिपुरा येथे मागील काही दिवसांपूर्वी अल्पसंख्याक नागरिकांवर हल्ले होत असल्याच्या निषेधार्थ राज्यातील विविध शहरांत दंगली घडल्या होत्या

पुणे : त्रिपुरा येथे मागील काही दिवसांपूर्वी अल्पसंख्याक नागरिकांवर हल्ले होत असल्याच्या निषेधार्थ राज्यातील विविध शहरांत पुकारलेल्या बंदला व काढलेल्या मोर्चांना हिंसक वळण लागले होते. काही ठिकाणी दगडफेक करण्यात आली. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.

या दंगली घडवण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने केले असल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. विरोधी पक्षनेतेही दंगलीबाबत राज्य सरकारवर टीका करू लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर पुण्यातही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले. दंगली घडवणे हा तर महाविकास आघाडी सरकारच्या नियोजनाचा भाग आहे अशी टिकाही आंदोलनकर्त्यांनी यावेळी केली आहे.

राज्यातील मालेगाव, औरंगाबाद, अमरावती, नांदेड, कारंजा लाड या शहरांत बंदचे आवाहन करण्यात आले होते. पुण्यातही ग्रामीण भागात दंगलीमुळे जमाव बंदी लागू करण्यात आली होती. आता मात्र परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. परंतु दंगली घडवण्यात आल्या कि नाही यावर अजूनही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पुण्यात आज सकाळी भाजपच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी 'हिंदू के सन्मान मै भाजप है मैदान मै' अशी घोषणाबाजी करत आंदोलनाला सुरुवात केली. 

जगदीश मुळीक म्हणाले,  त्रिपुरा मध्ये जी घटना घडली नाही ती घडल्याचं भासवून नांदेड , मालेगाव अमरावती याठिकाणी दंगली घडवण्यात आल्या आहेत. जे रजा अकादमीचे दंगेखोर होते. त्यांना पाठीशी घालण्याचं काम हे महाविकस आघाडी सरकार करत आहे. या दंगेखोरांना पाठीशी घालून जे नागरिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी आले होते. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम या सरकारने केले आहे. रजा अकादमीच्या कार्यकर्त्यांवर कारवाई झाली पाहिजे. महाविकस आघाडी सरकार दंगे थांबवण्यात अपयशी झाले. कारण हा तर या सरकारच्या नियोजनाचा एक भाग असल्याचे ते म्हणाले आहेत. 

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाMahavikas Aghadiमहाविकास आघाडीjagdish mulikजगदीश मुळीकPoliceपोलिस