शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

छत्री घेऊन दुचाकीवर स्वारी, घडेल जेलची वारी; तुम्हाला दंड नव्हे, तर थेट मिळू शकते कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2022 13:52 IST

दीपक होमकर  पुणे : पावसाळा सुरू झाल्यावर दररोज दुचाकीवरून प्रवास करणाऱ्यांची मोठी अडचण होते. वेळेत शाळा, कॉलेज किंवा नोकरीच्या ...

दीपक होमकर 

पुणे : पावसाळा सुरू झाल्यावर दररोज दुचाकीवरून प्रवास करणाऱ्यांची मोठी अडचण होते. वेळेत शाळा, कॉलेज किंवा नोकरीच्या ठिकाणी पोहोचणे गरजचेच. त्यात पाऊस पडला की मग उशीर होतो. रेनकोट घालून प्रवास करावा, मात्र कार्यालयात पोहोचल्यावर किंवा शाळेत पोहोचल्यावर तो काढून ठेवावा कुठे, याची पंचाईत. त्यामुळे शक्यता छत्री घेऊन प्रवास करण्याचा प्रयत्न अनेकांचा असतो. कारण छत्री कार्यालयात किंवा शाळा, कॉलेजमध्ये ठेवणे सोयीची असते. मात्र, गाडी चालविताना छत्री धरणार कशी, एकतर मागच्या सीटवर कोणाला तरी बसवून छत्री धरायला लावणे किंवा मग स्वत:च एका हाताने छत्री धरून प्रवास करणे. या दोन्ही गोष्टी दुचाकी चालकांसाठी अत्यंत धोकादायक आहेत. त्यामुळे असा धोकादायक प्रवास करताना पोलिसांची दृष्टी तुमच्यावर पडली तर तुम्हाला दंड नव्हे, तर थेट कोठडी मिळू शकते.

वाहतूक नियमांचे पालन करून वाहनचालक गाडी हाकत असतात. मात्र, पावसाळ्यात परिस्थिती बदलते. अचानक आलेल्या पावसापासून संरक्षण करण्यासाठी अनेकदा दुचाकीच्या मागे बसलेला दुचाकी चालकाच्या आणि त्याच्या डोक्यावर छत्री धरून प्रवास करीत असतात. असा प्रवास करणे धोकादायक आहे. कारण हवेमुळे छत्री उडून दुसऱ्या वाहनचालकाला ती लागून अपघात होण्याची भीती असते. शिवाय शेजारून जाणाऱ्या दुसऱ्या वाहनचालकाला छत्री लागून गंभीर इजा होण्याची ही शक्यता नाकारता येत नाही. पावसाळ्यात रस्ते निसरडे होतात. या स्थितीत वेगवान दुचाकी चालकास छत्री उडून अपघात होतात. त्यामुळे असे टाळण्यासाठी रेनकोट नसेल तर डोक्यावर छत्री, अथवा प्लास्टिकचा कागद धरून प्रवास केला जातो, असे करणे देखील धोकादायक आहे.

पावसात गाडी चालविताना घ्यायची काळजी

- पाऊस सुरू असताना गाडी चालविणे शक्यतो टाळाच.

- रस्त्यातच पाऊल लागला तर थांबा, इमारतीचा आडोसा घ्या.

- खूपच गडबड असेल तर गाडी अत्यंत सावकाश चालवा

- गाडीचे टायर गुळगुळीत झाले असतील तर तातडीने बदला

- हेल्मेट अवश्य वापराच.

- घराबाहेर पडताना रेनकोट सोबत ठेवा.

- रेनकोट ठेवण्यासाठी एखादी पिशवीही बरोबर असावी.

असा आहे नियम

मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ प्रमाणे धोकादायक वाहन चालविण्यासंदर्भातील दंड शिक्षेची तरतूद आहे. छत्री घेऊन प्रवास करणे हे या कायद्याअंतर्गत येते. त्यामुळे तुम्ही छत्री घेऊन प्रवास केला तर तुमच्यावर कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल होतो. या खटल्याची सुनावणी न्यायालयात होऊन संबंधिताला शिक्षा सुनावली जाते.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसbikeबाईकPoliceपोलिस