शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

तौक्ते चक्रीवादळाचा परिणाम! पुणे जिल्ह्यातील गावांमध्ये वादळी वाऱ्याने मोठे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2021 12:05 IST

मुळशीत उडाले घरांचे पत्रे, विद्युत तारा तुटण्याच्या प्रमाणात वाढ

ठळक मुद्देअजून काही काळ सतर्क राहण्याचे गावांना आवाहन

पुणे: तौक्ते चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीबरोबरच पश्चिम महाराष्ट्रातही वादळी वारे आणि पावसाचे प्रमाण वाढले आहे. जिल्हयातील ग्रामीण भागात जोरदार वादळी वाऱ्याने झाडापडीसोबतच घरांचे पत्रे उडण्याच्या घटना घडल्या आहेत. तर काही गावात विद्युत तारांचे खांब कोसळून ताराही तुटल्या आहेत. अशाच परिस्थितीत मुळशी तालुक्यात खाम्बोली गावातील अंगणवाडीचे पत्रे वादळी वाऱ्याने उडून गेल्याची घटना घडली आहे.

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर गावांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी लोकमतशी बोलताना सांगितले आहे. प्रशासन आणि पोलीस यंत्रणा मदतीसाठी सज्ज असल्याचे ते म्हणाले आहेत.

ग्रामीण भागात बैठी घरांचे प्रमाण सर्वाधिक आहे. अनेक घरांना पत्रे बसवण्यात आले आहेत. दरवर्षी पावसाळ्यात प्रशासन खबरदारी घेत असते. पण अचानक आलेल्या वादळाच्या तडाख्याने मोठे नुकसान होऊ लागले आहे. मुळशीतही खाम्बोली गावात अंगणवाडीचे पत्रे उडून गेले आहेत. तर गावात विद्युत तारा तुटल्या आहेत. 

आयुष प्रसाद म्हणाले, ग्रामीण भागातून वादळी वाऱ्यामुळे पत्रे उडून जाण्याच्या काल काही घटना घडल्या होत्या आम्ही गावातील सरपंच यांना आधीच खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. पत्रे उडून जाऊ नये म्हणून त्यावर जड वस्तू ठेवावी असे काही पर्यायही सुचवले आहेत. जिल्हाधिकारी यांच्या मदत व पुनर्वसन योजनेअंतर्गत नुकसान झालेल्या घरांचा पंचनामा करण्यात येणार आहे. तसेच त्यांना मदतही केली जाणार आहे. अजून काळ गावांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. त्या चक्रीवादळाचा धोका पूर्णपणे टळला नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.  

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसpirangutपिरंगुटPaudपौडcorona virusकोरोना वायरस बातम्या