शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

Maharashtra Rain: राज्यात पावसाची विश्रांती; जोर ओसरणार, पुढील ५ दिवस काही ठिकाणी येलो, ऑरेंज अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2024 12:25 IST

पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड जिल्ह्यांमध्ये पुढील तीन दिवस येलो अलर्ट देण्यात आला आहे

पुणे : गेल्या काही दिवसांपासून मध्य महाराष्ट्रात पावसाने चांगलाच जोर पकडला होता. तो आता ओसरणार आहे. मंगळवारपासून (६ ऑगस्ट) वरुणराजाला विश्रांती मिळणार आहे. सध्या कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. त्यादेखील दोन दिवसांत कमी होतील, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

विदर्भामध्ये मंगळवारी (६ ऑगस्ट) काही भागांत जोरदार पावसाचा अंदाज असून, येलो अलर्ट जारी केला आहे, तर कोकणातील रत्नागिरी आणि रायगड तसेच सातारा आणि पुणे जिल्ह्यातही काही भागात जोरदार पावसाचा येलो अलर्ट आहे. मराठवाड्यामध्ये काही भागात हलक्या सरी कोसळणार आहेत, तर इतर जिल्ह्यांमध्ये पाऊस विश्रांती घेण्याची शक्यता आहे. खान्देशातही काही भागात हलक्या ते मध्यम पाऊस वगळता जोरदार पावसाची शक्यता नसल्याचेही हवामान विभागाने स्पष्ट केले. गेल्या काही दिवसांपासूनच्या संततधार पावसामुळे पुणे जिल्ह्यातील सर्व धरणे जवळपास भरली आहेत. बुधवारी (७ ऑगस्ट) कोकणामधील अनेक ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. संपूर्ण विदर्भालाही काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज आहे. तर खानदेशातही काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.

कुठे, कोणता अलर्ट?

पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड जिल्ह्यांमध्ये पुढील तीन दिवस येलो अलर्ट देण्यात आला आहे. खान्देश, मराठवाड्यात ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर, विदर्भात काही जिल्ह्यांत ऑरेंज, तर अनेक भागांत येलो अलर्ट आहे.

राज्यातील सोमवारचा पाऊस

पुणे : ०.३ मिमी

कोल्हापूर : ३ मिमीमहाबळेश्वर : २१ मिमी

नाशिक : ०.९ मिमीसांगली : ०.३ मिमी

सातारा : ३ मिमीसोलापूर : ०.४ मिमी

मुंबई : २ मिमीरत्नागिरी : ६ मिमी

नागपूर : ०.३ मिमी

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसmonsoonमोसमी पाऊसTemperatureतापमानenvironmentपर्यावरणNatureनिसर्ग