शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी कोण बनणार? सरसंघचालक मोहन भागवतांचं सूचक विधान, म्हणाले...    
2
ज्या देशाच्या कारमधून पुतिन यांनी केला प्रवास; आता त्यांच्याचविरोधात उतरवले लढाऊ जहाज, तणाव वाढला
3
रोहित शर्मा नवा 'सिक्सर किंग'! पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी म्हणतो, "जो विक्रम झालाय तो..."
4
जुने बँक खाते बंद करताय? थांबा! 'या' ५ चुका केल्यास तुमच्या खिशातून कापले जातील एक्स्ट्रा चार्ज
5
“८ दिवसांत ई-वाहनांना टोलमाफीची अंमलबजावणी करा”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे निर्देश
6
अविवाहित मुलीच्या संपत्तीचा खरा वारसदार कोण? कायद्यानुसार कोणाचे असतात प्रथम अधिकार?
7
पोलिसांनी लाईनमनला केली अटक, संतापलेल्या वीज कर्मचाऱ्यांनी असा घेतला बदला, अखेरीस...
8
संतापजनक! "आधी ४ लाख भरा, मग मृतदेह न्या"; बिल पाहून नातेवाईकांचा रुग्णालयावर गंभीर आरोप
9
'या' कर्जमुक्त कंपनीच्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; ₹६० पेक्षा कमी आहे किंमत, दमानींचीही गुंतवणूक
10
Travel : भारतातून १००००० रुपये घेऊन थायलंड ट्रिपला निघताय? राहणं, खाणं आणि फिरणं एकूण किती होईल खर्च?
11
“देशात कधीही झाले नाही, ती परंपरा PM मोदी अन् CM फडणवीसांनी सुरू केली”; कुणी केली टीका?
12
Akola Live in Partner killed: २८ वर्षाच्या प्रेयसीची पवनने हत्या केली आणि पोलीस ठाण्यात जाऊन म्हणाला, 'तिने माझ्या घरात...'
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, सरकारनं 'या' महत्त्वाच्या नियमांत केला बदल; १५ डिसेंबरपासून लागू होणार
14
संतापजनक...! गुजरातमध्ये 6 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार, नराधमानं प्रायव्हेट पार्टमध्ये...; आरोपी 3 मुलांचा बाप!
15
३१ डिसेंबर आहे अखेरची तारीख, 'ही' २ कामं पटापट आटोपून घ्या; केली नाही तर समस्यांना सामोरं जावं लागेल
16
क्रिकेट कोचला बॅटने बेदम मारहाण; २० टाके पडले! संघात न घेतल्यानं तिघे भडकले, अन्....
17
प्रेम, धोका आणि ब्लॅकमेलिंग! व्यापाऱ्याचा महिला DSP वर कोट्यवधी रुपये हडपल्याचा गंभीर आरोप
18
शिंदेंचा ‘वाघ’ थेट बिबट्याच्या वेशात विधान भवनात; हात जोडून सरकारला विनवणी, “गेली २० वर्षे...”
19
ममता बॅनर्जींनी केंद्र सरकारच्या आदेशाचा कागद फाडला! कशावरून रंगला 'हाय-व्होल्टेज' ड्रामा?
20
पाकिस्तानात शूट झालाय रणवीर सिंगचा 'धुरंधर'? अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला- "तिथले गँगस्टर..."
Daily Top 2Weekly Top 5

मानाच्या गणेश मंडळांनी पाळली वेळ, पावित्र्य अन् शिस्तही! तरीही विसर्जन मिरवणुकीला विलंब, पाेलिसांकडे बाेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 18:53 IST

पुण्यातल्या मंडळांनी मात्र विक्रमी ३४ तास ४४ मिनिटे मिरवणूक चालवून २००५ सालचा ३३ तासांचा विक्रम माेडीत काढला. याबद्दल तीव्र नाराजी देखील व्यक्त केली जात आहे

पुणे: जगभरातील भाविकांनी पुण्यातील गणेशाेत्सवात सहभाग घेत आनंद मिळवला. विसर्जन मिरवणुकीतदेखील ते उत्साहाने सहभागी झाले हाेते. विशेष म्हणजे यंदाच्या विसर्जन मिरवणुकीने नवा विक्रम रचला आहे. एकीकडे मानाच्या गणपती मंडळांनी वेळ, पावित्र्य अन् शिस्तीचे पालन करत आदर्श घालून दिला आहे, याबद्दल पुणेकरांनी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचे काैतुक केले. इतर मंडळांनी मात्र विक्रमी ३४ तास ४४ मिनिटे मिरवणूक चालवून २००५ सालचा ३३ तासांचा विक्रम माेडीत काढला. याबद्दल तीव्र नाराजी देखील व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, राज्य सरकारने गणेशाेत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा जाहीर केला. त्याचे सर्वांनी काैतुकही केले. साेबतच निर्बंध शिथिल करून चुकीचा विक्रम करण्यास प्राेत्साहन दिल्याबद्दल नाराजीही व्यक्त करण्यात येत आहे. उत्सव आनंददायी, शांततेत, निर्विघ्न आणि वेळेत पार पडावा म्हणून पाेलिसांनी उत्सव सुरू हाेण्यापूर्वी आणि उत्सव काळातही सातत्याने मंडळांच्या पदाधिकाऱ्यांबराेबर बैठका घेतल्या. सूक्ष्म नियाेजन करत मिरवणुकीचा वेळ कमी करण्यावर भर दिल्याचे सांगितले. प्रत्यक्ष घडले उलटेच. मानाच्या गणपती मंडळांनी पाेलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत विसर्जन मिरवणूक वेळेआधी संपवून आदर्श निर्माण केला. अन्य बहुतांश मंडळांनी मात्र ना वेळेची मर्यादा पाळली, ना आवाजाची. तरीही पाेलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. मागील वर्षांपेक्षा चार तास उशिरापर्यंत मिरवणूक चालल्यानंतर पाेलिस आयुक्तांनी दिलेले स्पष्टीकरण आश्चर्यकारक हाेते. मिरवणूक एका ठराविक वेळेतच पार पाडली जावी यासाठी मी आग्रही नव्हतो, असे आयुक्त म्हणाले. मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिस दल कटिबद्ध होते, असे म्हणत वेळेच्या नियाेजनाबाबत हात झटकले. याबद्दल मानाच्या गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. उत्सवातील धार्मिकता, एकात्मता, पावित्र्य आणि आनंद टिकून राहावा, असा आमचा प्रयत्न आहे. तीच भाविकांचीदेखील धारणा आहे. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असे या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. उत्सवातील धांगडधिंगा कमी करण्याबाबत पाेलिसांसह सरकारनेही गांभीर्य बाळगणे आवश्यक आहे.

पुण्यातील मानाच्या गणपतींनी त्यांना मिळणारा मान हा फक्त मिरवणुकीचा क्रम ठरविण्याचा नव्हे, तर जबाबदारीचा भाग आहे, हे कृतीतून सिद्ध केले आहे. सूक्ष्म नियोजन करत ‘जल्लोषासोबत जबाबदारी’ हा संदेश दिला आहे. मानाचा पहिला श्री कसबा गणपती मंडळाने त्यांची विसर्जन मिरवणूक प्रशासनाने दिलेल्या वेळेच्या १५ मिनिटे आधी टिळक चाैकात आणत आदर्श घालून दिला. साेबतच अन्य चार मानाच्या मंडळांनीदेखील अगदी जबाबदारीने, दिलेला शब्द पाळत, जल्लोष, उत्साह व परंपरेला कोणताही छेद न देता वेळेत विसर्जन मिरवणूक पूर्ण केली, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. विसर्जन मिरवणूक वेळेत पूर्ण करण्यासोबतच ती परिपूर्ण कशी करता येईल, यावर विचार विनिमय होणे गरजेचे आहे. मानाच्या मंडळांमुळे विसर्जन मिरवणूक लांबते हे विधान आम्ही कृतीतून फोल ठरवले आहे. यापुढेदेखील पुण्याचा गणेशाेत्सव अधिक समृद्ध व आनंदी होण्याच्या दृष्टीने दिशा देत राहू, असा निर्धार मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :PuneपुणेPune Ganpati Festivalपुणे गणेशोत्सवGanesh Mahotsavगणेशोत्सव 2025PoliceपोलिसSocialसामाजिक