शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधानांबद्दल आदर ;पण... त्यांचे विद्युत दिवे बंद करण्याचे आवाहन अशास्त्रीयच

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2020 14:28 IST

ऊलट नागरिकांनी विद्यूत दिवे बंद करून विजेची समस्या निर्माण करू नये ; काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे आवाहन

ठळक मुद्देनागरिकांबरोबरच कार्यकर्त्यांनीही त्यांच्या घरातील विद्यूत दिवे बंद करू नयेत

पुणे: पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आदरच आहे, पण त्यांचे  दिवे लावाचे आवाहन अशास्त्रीयच आहे, त्यामुळे त्याचे पालन करण्याचा प्रश्नच येत नाही, ऊलट नागरिकांनी विद्यूत दिवे बंद करून विजेची समस्या निर्माण करू नये असे आवाहन शहरातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या नेत्यांंनी केले.नागरिकांबरोबरच कार्यकर्त्यांनीही त्यांच्या घरातील विद्यूत दिवे बंद करू नयेत असे त्यांनी सांगितले. काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. अभय छाजेड म्हणाले, विषयाचे गांभीर्य केंद्र सरकारला नाही हेच यातून सिद्ध झाले. एकतर केद्रीय मंत्रीमंडळ काय करते आहे तेच समजत नाही. आरोग्यमंत्री, ग्रुहमंत्री यांचे काही अस्तित्व दिसायला तयार नाही. पंतप्रधान दिसत आहेत तर ते असे अविवेकी आवाहन करत आहेत. विजेचे दिवे असे अचानक बंद झाले तर त्यातून विजेची गंभीर समस्या निर्माण होईल असे त्या विषयातील तज्ञ सांगत आहेत. त्याकडे दुर्लक्ष करून भाजपाचे कार्यकर्ते आता हा नवा कार्यक्रम राबवणार. त्याने काय होणार याचे ऊत्तर देशाला मिळणार आहे का?राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आमदार चेतन तुपे म्हणाले, पंतप्रधानांनी असे अशास्त्रीय आवाहन.करावे याचे आश्चर्य वाटते.सगळे जग या आजाराचा सामना करण्यासाठी विज्ञानाची कास धरते आहे आणि आपले पंतप्रधान टाळ्या थाळ्या वाजवायला व विजेचे दिवे बंद करून मेणबत्या पेटवायला सांगत आहेत. त्याऐवजी त्यांनी जनतेला आपण ही लढाई जिंकण्यासाठी कायकाय करतो आहोत ते सांगून जनतेला धैर्य, दिलासा द्यायला हवा होता. मी स्वत: दिवे बंद करणार नाही व मेणबत्त्या, टॉर्च ही लावणार नाही. कार्यकर्त्यांनी व जनतेनेही हेच करावे. शास्त्रीय दृष्टिकोन आहे असा कोणीही विवेकी माणूस हे करणारच नाही.शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे म्हणाले, या आवाहनाला काही अर्थच नाही. पंतप्रधान फार शक्तीशाली व्यक्ती असते. त्यांना मिळालेल्या अधिकारांनी त्यांना तसे बनवलेले असते. टाळ्या आणि थाळ्या वाजवून एक दिवसाच्या संचारबंदीवर पाणी ओतले गेले. तो अनूभव गाठीला असताना त्यांनी पुन्हा असे विचित्र आवाहन करण्याची गरज नव्हती. जनतेला आज विज्ञाननिष्ठ प्रयत्नांची गरज आहे. तेच करावे असे आमचे कार्यकर्त्यांना आणि नागरिकांनाही आवाहन आहे.

टॅग्स :PuneपुणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस