शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

भामा आसखेडचे दुसरे आवर्तन सुरू; नदी काठावरील काही शेतकऱ्यांच्या वीजपंपांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 6:23 PM

भामा आसखेडचे दुसरे आवर्तन सुरु करण्यात आले आहे. धरणातून मंगळवारी सायंकाळी ६०० क्युसेस वेगाने सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे शेतकऱ्यांमध्ये ‘कही खुशी कही गम’ अशी स्थिती झाली आहे.

ठळक मुद्देपाणी सोडण्याची पूर्वकल्पना जलसंपदा विभागाने दिली नसल्याने शेतकऱ्यांच्या वीज पंपांचे नुकसाननदीत पाणी असूनही पिके जळतील असे शेतकऱ्यांचे म्हणणे

आंबेठाण : भामा आसखेडचे दुसरे आवर्तन सुरु करण्यात आले आहे. धरणातून मंगळवारी सायंकाळी ६०० क्युसेस वेगाने सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे शेतकऱ्यांमध्ये ‘कही खुशी कही गम’ अशी स्थिती झाली आहे. पाणी सोडण्याची पूर्वकल्पना जलसंपदा विभागाने दिली नसल्याने नदी काठावरील काही शेतकऱ्यांच्या वीज पंपांचे नुकसान झाले. तर नदीला पाणी आल्याने बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.भामा आसखेड धरणातून मंगळवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास धरणाच्या दोन दरवाजांतून ६०० क्युसेस वेगाने पाणी सोडण्यात आले होते. बुधवारी सकाळपासून पाणी सोडण्याचा वेग वाढवून तो ९५० करण्यात आला. त्यामुळे नदीपात्र भरून वाहत होते. या पाण्याचा फायदा खेड, शिरूर, दौंड, हवेली या चार तालुक्यातील शेतकऱ्यांना होणार आहे. हे दुसरे आवर्तन असून दहा दिवस चालणार आहे.पाणी सोडण्याअगोदार दोन ते तीन तास पूर्वकल्पना द्यायला पाहिजे होती, असे पिंपरी खुर्द आणि गोनवडी गावच्या शेतकऱ्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. मात्र अचानक नदीतील पाणीत वाढ झाल्याने विजपंप नदीपात्रातून वर काढता आले नाही. यापैकी अनेक शेतकऱ्यांचे विजपंप चालू होते. त्यामुळे  विजपंपात पाणी गेल्याने विजपंप जळून गेले आहेत. त्यामुळे नदीत पाणी असूनही पिके जळतील असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.पाणी सोडण्यासाठी एक व चार नंबरचे दरवाजे १५ सेंटीमीटरने वर उचलण्यात आले आहेत. पाणी सोडण्यास सुरुवात करण्याआगोदर धरणातील पाणीसाठा ८४.११ टक्के होता. तर पाणी पातळी ६६९.१६ मीटर इतकी होती. आजपर्यंत धरण परिसरात १२९२ मिली पावसाची नोंद झाली आहे.सध्याच्या दुसऱ्या आवर्तनात भीमा आणि भामा नदीवरील एकूण असणारे १८ बंधारे भरले जाणार आहेत.धरणातील पाण्याचा फायदा खेड तालुक्यातील करंजविहिरे, आसखेड खुर्द, शेलू, भांबोली, वराळे, सावरदरी, कुरकुंडी, धामणे, कोये, किवळे, चांदूस, पिंपरी ब्रुदुक, रोहकल, भाम, गोणवडी, बोरदरा, पिंपरी खुर्द, कोरेगाव खुर्द, वाकी खुर्द, कोरेगाव खुर्द, वाकी ब्रुदुक, काळुस, भोसे व शेलगाव अशा अनेक गावातील शेतीपिकांना व गावच्या पाणी योजनांना होणार आहे. पाणी सोडण्यात आल्याने भामानदी काठावरील गावच्या शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

टॅग्स :Puneपुणे