शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

बेरोजगारांच्या प्रश्नांचा राजकीय पक्षांना विसर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2019 13:41 IST

प्रचारात लोकांच्या जीवन मरणाशी संबंधित असलेल्या प्रश्नांवर बोलण्याऐवजी भावनिक तसेच अस्मितेच्याच मुददयांचा आधार घेतला जात आहे.

ठळक मुद्देप्रचारामध्ये भावनिक मुददयांवरच भर : उच्चशिक्षितांच्या सर्व संघटना एकत्र येणारगेल्या ५ वर्षात देशभरातील दोन कोटी तरूणांना त्यांच्या नोकऱ्या गमवाव्या लागल्याचा अहवाल

- दीपक जाधव- पुणे : उच्चशिक्षण घेऊनही लाखो तरूणांना नोकरीसाठी वणवण भटकावे लागत आहे. रोजगाराचा हा प्रश्न दिवसेंदिवस तीव्र बनत चालला असतानाही राजकीय पक्षांना मात्र त्याच्या सोडवणूकीसाठी ठोस कृती कार्यक्रम देण्यात अपयश आले आहे. यापार्श्वभुमीवर उच्चशिक्षित पदवीधारकांच्या सर्व संघटनांना एकत्रित आणून बेरोजगारांच्या प्रश्नांवर व्यापक आंदोलन उभारण्यात येणार आहे.लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरूवात झाली आहे, राजकीय पक्षांचे नेते एकमेंकांवर तुटून पडत आहेत. मात्र या प्रचारात लोकांच्या जीवन मरणाशी संबंधित असलेल्या प्रश्नांवर बोलण्याऐवजी भावनिक तसेच अस्मितेच्याच मुददयांचा आधार घेतला जात आहे. एनएसएसओच्या अहवालानुसार गेल्या ५ वर्षात देशभरातील दोन कोटी तरूणांना त्यांच्या नोकऱ्या गमवाव्या लागल्याचा अहवाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. मात्र तरीही यावर कोणीही बोलताना दिसून येत नाही. त्यामुळे बेरोजगारांच्या प्रश्न राजकीय पक्षांपर्यंत पोहचविण्यासाठी डी.एड.-बी.एड. पात्रताधारक संघटना, नेट-सेट पात्रताधारक संघर्ष समिती, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी संघटना यासह उच्चशिक्षित पदवीधारकांच्या अनेक संघटनांना एकत्रित आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.शिक्षक भरती व्हावी यासाठी डी.एड.-बी.एड. संघटना, स्पर्धा परीक्षा नियमित व्हाव्यात यासाठी त्यांच्या संघटना स्वतंत्रपणे मोर्चे, उपोषण, धरणे आंदोलन करीत आहेत. मात्र ही आंदोलने केवळ तेवढया प्रश्नांपुरतीच व तुटकपणे होत आहेत. त्यामुळे प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी शासनावर त्याचा फारसा दबाव पडत नाही. त्यामुळे उच्चशिक्षित पदवीधारकांच्या या सर्व संघटनांना एकत्रित आणून व्यापक आंदोलन उभे करायचे आहे. त्यासाठी त्यांच्या पदाधिकाºयांची लवकरच एकत्रित बैठक घेणार असल्याचे डी.एड.-बी.एड. पात्रताधारक संघटनेचे राज्य अध्यक्ष संतोष मगर यांनी सांगितले. स्पर्धा परीक्षा वेळेवर व्हाव्यात, त्यांचे निकाल ४० दिवसांच्या आत लागावेत, स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेले अनेक उमेदवार ती पोस्ट न स्वीकारता त्यापेक्षा वरच्या पोस्टची तयारी करतात. त्यामुळे निकालानंतरही अनेक जागा रिक्त राहतात. या जागांवर लोकसेवा आयोगाला पुन्हा नव्याने प्रक्रिया राबवावी लागते. त्याऐवजी आयोगाने किमान ५० उमेदवारांची प्रतिक्षा यादी लावावी आदी मागण्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून अनेक दिवसांपासून केल्या जात आहेत. मात्र त्याला शासनाच्या पातळीवर अद्याप सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचे एमपीएससी राइट संघटनेचे समन्वयक महेश बडे यांनी केली आहे...............

रोजगार नोंदणी कार्यालय उरले नावापुरतेचराज्यातील प्रत्येक जिल्हयामध्ये रोजगार नोंदणी कार्यालय (एम्लॉयमेंट आॅफिस) आहे. पूर्वी या कार्यालयामध्ये दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर तरूण-तरूणींची नोंदणी करून घेतली जायची. नोकºयांची जाहिरात निघाल्यानंतर त्यांना कॉल लेटर पाठविले जायचे. मात्र स्पर्धा परीक्षा घेऊन नोकरी भरती करण्यास सुरूवात झाल्यानंतर हे कॉल लेटर पाठविणे जवळपास बंद झाले आहे. त्यामुळे या कार्यालयामार्फत नोकरी भरतीची नोंदणी करणेही बंद झाले आहे. त्यामुळे राज्यातील बेरोजगारांची नेमकी संख्या किती, त्यांचे शिक्षण किती झाले आहे याबाबतची कुठलीही ठोस आकडेवारी शासनाकडे उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांच्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी ठोस प्रयत्नही शासन पातळीवरून होताना दिसून येत नाहीत.

* बेरोजगारांच्या या आहेत प्रमुख मागण्या१. जिल्हा रोजगार नोंदणी कार्यालय सक्षम करण्यात यावे, प्रत्येक बेरोजगाराची नोंद या कार्यालयामार्फत ठेवावी. २.केरळ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर गट अ ते गट ड अशा सर्व परीक्षांचे आयोजन महाराष्टÑ लोकसेवा आयोगाकडून केले जावे.३. गट अ ते गट ड तसेच शिक्षक, बँक मॅनेजर, रेल्वे भरती, महामंडळांमधील भरती यांचे निश्चित वेळापत्रक वर्षाच्या सुरूवातीला जाहीर करावे.४. स्पर्धा परीक्षांचे निकाल ४० दिवसात लावावेत५. स्पर्धा परीक्षांच्या निकालानंतर किमान ५० उमेदवारांची प्रतिक्षा यादी लावावी६. तरूणांना लघुउद्योग उभारण्यासाठी प्रशिक्षण आणि कर्ज सुविधा मोठया संख्येने उपलब्ध कराव्यात.

 

टॅग्स :PuneपुणेPoliticsराजकारणLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकjobनोकरी