शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
2
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
3
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
4
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
5
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
6
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
7
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
8
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
9
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
10
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
11
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
12
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
13
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
14
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
15
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
16
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
17
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
18
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
19
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
20
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो

Pune: पुण्यात विधानपरिषदेला भाजपात एकदाच बंडखोरी अन् पराभव; बंडखोरीला थारा नाहीच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2024 14:04 IST

पक्षाचा आदेश डावलून कार्यकर्ते अथवा पदाधिकाऱ्याने बंडखोरी करीत अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याची परंपरा पुण्याला नाही

पुणे : विधानसभा निवडणूक सुरू आहे, आता दिवाळीनंतर प्रचाराला जोर येईल. पुणे त्याला अपवाद नाही. पुणे शहराला राजकारणात भाऊबंदकीचा इतिहास आहे, पण बंडखोरीचा नाही. विधानपरिषदेच्या एका जागेसाठी भारतीय जनता पक्षात १९९० ला एकदाच बंडखोरी झाली होती आणि त्यात बंडखोराचा पराभव झाला होता.

पक्षबदलही अलीकडचाच

पक्षाचा आदेश डावलून कार्यकर्ते अथवा पदाधिकाऱ्याने बंडखोरी करीत अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याची परंपरा पुण्याला नाही. एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश घेत निवडणूक लढण्याचा प्रकारही अगदी अलीकडचा आहे. सन १९७९ च्या लोकसभा निवडणुकीत मोहन धारिया जनता पक्षाकडून खासदार झाले, त्याआधी ते काँग्रेसकडून निवडून आले होते, पण तो आणीबाणीच्या वावटळीतील पक्षबदल होता.

विधानपरिषेदेला बंड

सन १९९० मध्ये विधानपरिषदेच्या पदवीधर मतदारसंघातून भाजपने प्रकाश जावडेकर यांना उमेदवारी जाहीर केली. त्याआधी नारायण वैद्य या जागेवरूनच आमदार झाले होते. पक्ष आपल्याला उमेदवारी देईल या खात्रीत ते होते. मात्र, पक्षाने उमेदवार बदलण्याचा निर्णय घेतला. वैद्य बंडखोरी करून उभे राहिले, पण त्यांचा पराभव झाला. जावडेकर प्रथमच आमदार झाले. पक्षाने सगळी यंत्रणा त्यांच्या मागे उभी केली. बंडखोर वैद्य यांना फार प्रतिसाद मिळाला नाही.

नाव घ्यावी अशी बंडखोरी नाही

बाकी १९५२ च्या निवडणुकीपासून पुण्यात विधानसभेच्या निवडणुकीला नाव घ्यावे अशी फार मोठी बंडखोरी झालेली दिसत नाही. काँग्रेस, कम्युनिस्ट, जनसंघ, हिंदुमहासभा हे प्रमुख राजकीय पक्ष होते. काँग्रेसचे वर्चस्व होते. कम्युनिस्ट त्यांच्याबरोबर स्पर्धा करत. ती इतकी जोरदार असायची की संयुक्त महाराष्ट्र समितीच्या कम्युनिस्ट उमेदवाराने १९५७ च्या निवडणुकीत तोपर्यंत काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला कसबा विधानसभा मतदारसंघ हिसकावला होता. संयुक्त महाराष्ट्र समितीचे त्यावेळी वारे होते, पण त्यावेळीही समितीमध्ये किंवा काँग्रेस वा अन्य पक्षांमध्ये बंडखोरी झाली नव्हती.

आठवणीत राहावी अशी बंडखोरी पुण्यात झालेली नाही. जिल्ह्यात एखादा अपवाद असू शकेल. याचे कारण पक्षनिष्ठेला महत्त्व, नेत्यांविषयी प्रचंड आदर हेच होते. नेत्यांचे नैतिक वजनच इतके होते की, त्यांचा फोन तर दूरच, पण निरोप आला तरी बंडाची भाषा करणारे गार होत असत. - उल्हास पवार, माजी आमदार, काँग्रेस

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४vidhan sabhaविधानसभाBJPभाजपाcongressकाँग्रेस