शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
2
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
3
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
4
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
5
लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
7
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
8
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
9
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
10
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
11
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
12
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
13
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
15
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
16
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
17
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
18
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
19
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
20
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा

"रश्मी ठाकरे या गाणं म्हणणे, चेहरा बदलणे आणि वाटेल ती विधाने करणे यात कधीच पडल्या नाहीत..!"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2020 20:28 IST

शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी भाजपला सणसणीत टोला..

ठळक मुद्देअन्यथा किरीट सोमय्या यांनी जाहीर मागावी

पुणे : मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना कधीच गाणं म्हणणे, चेहरा बदलणे आणि वाटेल ती विधाने करणे जमले नाही, अशा शब्दात विधान परिषदेच्या उपसभापती व शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी भाजपला सणसणीत टोला लगावला आहे. 

पुण्यात नीलम गोऱ्हे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी राज्यातील विविध घडामोडींवर भाष्य केले. गोऱ्हे म्हणाल्या, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे कुटुंबावर जे काही जमीन व्यवहाराचे आरोप केले आहे. त्याबद्दल एका महिन्याच्या कालावधीत पुरावे सादर करावे अन्यथा त्यांनी जाहीर मागावी असे खुले आव्हान देखील सोमय्या यांना दिले आहे.   

यावेळी गोऱ्हे यांनी भाजप नेते राम कदम यांचा देखील खरपूस शब्दात समाचार घेतला. त्या म्हणाल्या, कधीकाळी मुलींना उचलून आणण्यासारखी वक्तव्य करणारे नेतेच आता महिलांच्या सुरक्षेवर भाष्य करत आहे. हाच मोठा विनोद आहे. राज्य सरकार महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना कदापि पाठीशी घालणार नाही. 

किरीट सोमय्यांबद्दलचे वायकरांचे 'ते' वक्तव्य अगदी खरे.. 

किरीट सोमय्या हे ठाकरे कुटुंबियांवर जे काही आरोप करत आहे. किंवा नवनवीन विषय उकरून काढत आहे ते जेवणाच्या ताटातील लोणच्यासारखे आहेत. त्यांच्या आजपर्यंतच्या आरोपावर नक्कीच एक पुस्तक तयार होईल. त्यांना ज्या मुद्द्यावर आक्षेप तो घेऊन सोमय्या यांनी न्यायालयात जावे. परंतु, किरीट सोमय्या हे पाणचट आहेत, हे रवींद्र वायकर यांचे वक्तव्य मला अगदी खरे वाटते आहे.  

नारायण राणे हे वैफल्यग्रस्त...  नारायण राणे हे वैफल्यग्रस्त झाले आहे.  ते दुःखी आत्मा आहेत. त्यांची अवस्था विक्रम-वेताळसारखी झाली आहे.  त्यामुळे तोंडी येईल ती बडबड राणे करत आहे, अशा शब्दात गोऱ्हे यांनी दिवाळीनंतर महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस नक्कीच होणार असून ठाकरे सरकार कोसळेल या वक्तव्यावर टीकेची झोड उठवली.

टॅग्स :PuneपुणेPoliticsराजकारणNeelam gorheनीलम गो-हेUddhav Thackerayउद्धव ठाकरेAmruta Fadnavisअमृता फडणवीसBJPभाजपा