शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या इतिहासावर आक्षेप घेणाऱ्यांना राज ठाकरेंचं सणसणीत उत्तर; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2021 18:05 IST

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे म्हणजे इतिहासाबरोबर वर्तमानाची जाग आणणारा महापुरुष : राज ठाकरेंनी उधळली स्तुतीसुमनं

पुणे : बाबासाहेब पुरंदरे या व्यक्तिमत्वाला ६ वर्षांचा असताना पहिल्यांदा भेटलो. त्यानंतर त्यांना पाहत आणि वाचतच राहिलो. त्यांच्याकडून अनेकदा इतिहासातले प्रश्न समजून घेतले. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे ज्यावेळी इतिहास सांगतात तेव्हा ते वर्तमानात कसे भानावर या हे ही आवर्जून सांगतात. त्याचवेळी इतिहासातल्या चुका पुन्हा करू नका असेही सांगतात. त्यांच्या इतिहासात दंत कथांना अजिबात वाव नाही, अशा शब्दात पुरंदरे यांच्या इतिहासावर आक्षेप घेणाऱ्यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सणसणीत उत्तर दिले. 

आपल्या अमोघ वाणीतून शिवचरित्र घराघरात पोहोचविणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या शतकमहोत्सवी वर्षातील पदार्पणानिमित्त ’जीवनगाणी’, ’जयसत्य चॅरिटेबल ट्रस्ट’ आणि ’स्वरगंधार’ या संस्थांच्या वतीने पुरंदरे यांच्या भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अद्वितीय सुरांची देणगी लाभलेल्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या हस्ते शिवशाहिरांचे 99 व्या ज्योतींनी औक्षण करण्यात आले. यावेळी  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, ज्येष्ठ इतिहासकार गजानन मेहेंदळे, आमदार व माजी मंत्री आशिष शेलार उपस्थित होते.

राज ठाकरे म्हणाले, नुसता इतिहास ऐकायला गेले की रुक्ष वाटते, पण त्यांच्याकडून ऐकताना प्रसंग डोळ्यासमोर जिवंत होतात. बाबासाहेब म्हणजे इतिहासाबरोबर वर्तमानाची जाग आणणारा हा महापुरुष आहे. बाबासाहेबांकडून इतिहास समजून घ्यायला हवा. त्यांनी कधी इतिहासाला सोडले नाही. त्यांच्या इतिहासात दंतकथांना वाव नाही. त्यांनी अलंकारिक भाषा वापरली नसती तर ते किती कठीण होते हे कळले नसते.तुमच्या डोक्यात गोष्ट पक्की बसवतात.शिवचरित्र अनेकांनी लिहिले पण बाबासाहेबांनी ते घराघरात नि मनामनात पोहोचविले. एकदा विचारलं होत की तुम्ही पोवाडा म्हटला नाही तर शिवशाहीर कसे? इतिहास सांगण्यातून बोध घ्यावा.

राज ठाकरेंच्या भाषणाची 'हटके' सुरुवात मनसेप्रमुख राज ठाकरे हे त्यांच्या भाषणाची सुरुवात नेहमी जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो अशी करतात. मात्र आज राज ठाकरेंनी आपल्या भाषणाची 'हटके' सुरुवात केली. त्यांनी अर्ध्या चेहऱ्याच्या झाकलेल्या आणि अर्ध्या उघड्या चेहऱ्याच्या बांधवांनो अशी भाषणाची सुरुवात केली. यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. 

भाजप नेते आशिष शेलार म्हणाले, इतिहासकार, संशोधक, शाहिर, चित्रकार, कीर्तनकार सगळी रूपं बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वात दडली आहेत. ते स्वतः सहनशील, दयावान आणि क्षमाशील आहेत. लेखनावर प्रहार केले असतील पण काहीही न बोलता जगून दाखवले, हा खूप मोठा गुण आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हवे, समानता हवी असे सांगतानाच त्यांनी स्वतः जगून दाखविले आहे.

मेहेंदळे म्हणाले, ते इतिहास संशोधक आहेत ही त्यांची ओळख शिवशाहीर म्हणून झाकोळली आहे..ते इतिहास संशोधक मंडळाच्या विद्यापीठातील आहेत. मंडळाच्या त्रैमासिकात लेख प्रसिद्ध झाले..मंडळाच्या विद्यापीठातून बाहेर पडल्यानंतर ते ' शिवचरित्र' लिहू शकले. इतिहास रुक्ष भाषेत लिहिला जायला हवा असे नाही.मला जेव्हा 100 वर्षे लागतील तेव्हा बाबासाहेबांनी मला आशीर्वाद द्यावा.

ज्येष्ठ गायिका आशा भोसले म्हणाल्या, पाया पडावे अशी एकच व्यक्ती आहे ती म्हणजे बाबासाहेब दीड वर्षांनी बाहेर पडले आहे. मी फार शिकलेली नाही पण लेखांमुळे मराठी बोलता येते. साने गुरुजी, ह. ना आपटे, खांडेकर, बंगालची पुस्तके वाचली..वाचनाची खूप आवड होती..लेखकांना भेटण्याची ओढ वाटायची..1943 साली दहा वर्षांची असताना गाण्याचे पाहिले रेकॉर्डिंग केले..बहिणीचे लग्न कोल्हापूरला होते. गो. नी दांडेकर भेटले.पाठीमागून एक व्यक्ती हसले.आम्हाला आमचे वाढदिवस लक्षात राहात नाही आणि शिवाजी महाराजांचा वाढदिवस किंवा सगळं कसे लक्षात ठेवता? असा भाबडा प्रश्न केला. त्यांना मी आवडले. 58 वर्षांची बाबासाहेबांशी ओळख आहे.मी कुणाला मागत नाही, फक्त प्रेम मागते. 

 

बाबासाहेबांनी शंकराची पिंड दिल्यानंतर आयुष्य खूप छान झाले.ते फूल टवटवीत राहिलं पाहिजे..कुणाला त्रास द्यायचा नाही.मन स्वच्छ ठेवायचे.बाबासाहेब यांनी खूप प्रेम दिले.लेखकांनी माझं आयुष्य समृद्ध केले. देवाने मला आयुष्याची 50 वर्षे दिली आहेत..त्यातील २५ वर्षे बाबासाहेबाना देत आहे. त्यांना १ लाख रुपये देत आहे.

बाबासाहेब म्हणाले, लताने तुम्हाला कुणाचा आवाज आवडतो? मी थोडा थांबलो आणि ' कपबश्या' चा आहे असे म्हणालो.मंगेशकर कुटुंबीय आणि गो.नी. दांडेकर यांच्याशी जिव्हाळ्याचे नाते आहे.वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही. मी वेगळं काही करतोय असे वाटत नाही.मी शिवाजींचा पुजारी नाहीये.शिवाजी महाराजांच्या पराक्रमामुळे सर्वजण भारावतात..पुन्हा एकदा जन्माला यावं.. प्रेम करायला शिका प्रेम शिकवता येत नाही, ते आतून यावे लागते..राग, द्वेष नको

टॅग्स :PuneपुणेBabasaheb Purandareबाबासाहेब पुरंदरेRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसेShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजPoliticsराजकारण