शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

Raj Thackeray: तुमचं तर अजून लग्न झालं नाही, राज ठाकरेंनी राज्यपालांवर डागली तोफ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 20:55 IST

राज ठाकरेंनी भाषणाच्या सुरुवातीला कोरोना कालावधीचा उल्लेख करत लॉकडाऊन महिन्यातून दोनदा लावायला हवा, कधी कधी वाटतं मोदींना त्यासाठी पत्रही लिहावं, असे म्हटले.

पुणे - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १६ वा वर्धापनदिन पुणे शहरातील गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित करण्यात आला आहे. वर्धापनदिनासाठी गणेश कला क्रीडा मंदिर हाऊसफुल झाले आहे. राज्यभरातून हजारोंच्या संख्येने मनसैनिक आणि पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आहेत. राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला होता. त्यावरुन राज ठाकरे यांनी राज्यपालांना टोला लगावला. तसेच, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाई फुले यांच्या लग्नाबद्दल राज्यपालांनी केलेल्या भाष्यावरही त्यांनी प्रहार केला.  

राज ठाकरेंनी भाषणाच्या सुरुवातीला कोरोना कालावधीचा उल्लेख करत लॉकडाऊन महिन्यातून दोनदा लावायला हवा, कधी कधी वाटतं मोदींना त्यासाठी पत्रही लिहावं, असे म्हटले. त्यानंतर, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि सावित्रीबाई फुलेंसंदर्भात केलेल्या वक्तव्याचा समाचारही घेतला. कुणीतरी मला दाखवलं, ते इतने इतने छोटे थे कैसे शादी हो गयी मरे को पता नाही... तेव्हा लहानपणी व्हायची लग्न. तुमचं अजून नाही झालं... असे म्हणत राज ठाकरेंनी राज्यपाल कोश्यारींवर निशाणा साधला. यावेळी, उपस्थित प्रेक्षकांनी जल्लोष करत राज यांच्या भाषणाला दाद दिली. 

शिवाजी महाराज-रामदास स्वामींबद्दलही राज बोलले

राज ठाकरे म्हणाले, राज्यपालांना शिवाजी महाराज, रामदास स्वामी काही माहिती आहे का. नुसती भांडण लावायची, एकाच शौर्य आणि एकाची विद्वत्ता कमी करायची. राज्यपाल तुम्हाला रामदास स्वामी, शिवाजी महाराज कळतात का? आपला अभ्यास नसताना आपण बोलून जायचं कि, रामदास स्वामी यांनी जे लिहिलं आहे ते मी माझ्या घरात आहे इतकं चांगला महाराज यांच्या बद्दल लिहलंय ते कोणीच लिहलेले नाही. 

निश्चयाचा महामेरू। बहुत जनासी आधारू। अखंडस्थितीचा निर्धारू। श्रीमंत योगी।। हे रामदास स्वामींनी महाराजांबद्दल लिहिलंय. मात्र, असं उगाच काहीतरी सांगायचं. रामदास स्वामी हे महाराजांचे गुरू होते, असं कुठंही लिहिलेलं नाही, असेही राज यांनी म्हटले. तसेच, सावित्रीमाई फुले यांच्याबदद्लच्या टिपण्णीवरुनही निशाणा साधला.  

संकटांना घाबरायचं नसतं

लॉकडाऊनमध्ये कोकिळाही कुहू कुहूऐवजी कोविड कोविड... असं ओरडायला लागल्या होत्या. त्या वातावरणात भीती होती, पण कुटुंब जवळ आली. सर्वजण एकमेकांसोबत जेवायला लागली, एकमेकांची काळजी करायला लागली, असे म्हटले. संकटे येत असतात, संकटे येताना हातात हात घालून येत असतात. आमच्यावर अजूनही संकटे आहेत, आमच्या पक्षावर अजूनही संकट आहेत. पण, अशा संकटांना घाबरायचं नसतं, संकटांची एक वेगळीच मजा असते, असे म्हणत कोविडच्या आठवणी जागवत राज यांनी आता नव्या जोमाने संकटांवर मात करुन पुढे जाण्याचा सल्ला सर्वांनाच दिला. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेPuneपुणेMNSमनसेbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज