शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

Raj Thackeray: तुमचं तर अजून लग्न झालं नाही, राज ठाकरेंनी राज्यपालांवर डागली तोफ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 20:55 IST

राज ठाकरेंनी भाषणाच्या सुरुवातीला कोरोना कालावधीचा उल्लेख करत लॉकडाऊन महिन्यातून दोनदा लावायला हवा, कधी कधी वाटतं मोदींना त्यासाठी पत्रही लिहावं, असे म्हटले.

पुणे - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १६ वा वर्धापनदिन पुणे शहरातील गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित करण्यात आला आहे. वर्धापनदिनासाठी गणेश कला क्रीडा मंदिर हाऊसफुल झाले आहे. राज्यभरातून हजारोंच्या संख्येने मनसैनिक आणि पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आहेत. राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला होता. त्यावरुन राज ठाकरे यांनी राज्यपालांना टोला लगावला. तसेच, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाई फुले यांच्या लग्नाबद्दल राज्यपालांनी केलेल्या भाष्यावरही त्यांनी प्रहार केला.  

राज ठाकरेंनी भाषणाच्या सुरुवातीला कोरोना कालावधीचा उल्लेख करत लॉकडाऊन महिन्यातून दोनदा लावायला हवा, कधी कधी वाटतं मोदींना त्यासाठी पत्रही लिहावं, असे म्हटले. त्यानंतर, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि सावित्रीबाई फुलेंसंदर्भात केलेल्या वक्तव्याचा समाचारही घेतला. कुणीतरी मला दाखवलं, ते इतने इतने छोटे थे कैसे शादी हो गयी मरे को पता नाही... तेव्हा लहानपणी व्हायची लग्न. तुमचं अजून नाही झालं... असे म्हणत राज ठाकरेंनी राज्यपाल कोश्यारींवर निशाणा साधला. यावेळी, उपस्थित प्रेक्षकांनी जल्लोष करत राज यांच्या भाषणाला दाद दिली. 

शिवाजी महाराज-रामदास स्वामींबद्दलही राज बोलले

राज ठाकरे म्हणाले, राज्यपालांना शिवाजी महाराज, रामदास स्वामी काही माहिती आहे का. नुसती भांडण लावायची, एकाच शौर्य आणि एकाची विद्वत्ता कमी करायची. राज्यपाल तुम्हाला रामदास स्वामी, शिवाजी महाराज कळतात का? आपला अभ्यास नसताना आपण बोलून जायचं कि, रामदास स्वामी यांनी जे लिहिलं आहे ते मी माझ्या घरात आहे इतकं चांगला महाराज यांच्या बद्दल लिहलंय ते कोणीच लिहलेले नाही. 

निश्चयाचा महामेरू। बहुत जनासी आधारू। अखंडस्थितीचा निर्धारू। श्रीमंत योगी।। हे रामदास स्वामींनी महाराजांबद्दल लिहिलंय. मात्र, असं उगाच काहीतरी सांगायचं. रामदास स्वामी हे महाराजांचे गुरू होते, असं कुठंही लिहिलेलं नाही, असेही राज यांनी म्हटले. तसेच, सावित्रीमाई फुले यांच्याबदद्लच्या टिपण्णीवरुनही निशाणा साधला.  

संकटांना घाबरायचं नसतं

लॉकडाऊनमध्ये कोकिळाही कुहू कुहूऐवजी कोविड कोविड... असं ओरडायला लागल्या होत्या. त्या वातावरणात भीती होती, पण कुटुंब जवळ आली. सर्वजण एकमेकांसोबत जेवायला लागली, एकमेकांची काळजी करायला लागली, असे म्हटले. संकटे येत असतात, संकटे येताना हातात हात घालून येत असतात. आमच्यावर अजूनही संकटे आहेत, आमच्या पक्षावर अजूनही संकट आहेत. पण, अशा संकटांना घाबरायचं नसतं, संकटांची एक वेगळीच मजा असते, असे म्हणत कोविडच्या आठवणी जागवत राज यांनी आता नव्या जोमाने संकटांवर मात करुन पुढे जाण्याचा सल्ला सर्वांनाच दिला. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेPuneपुणेMNSमनसेbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज