शहरं
Join us  
Trending Stories
1
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
2
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
3
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
4
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
5
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
6
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
7
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
9
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
10
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
11
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
12
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
13
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
14
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
15
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
16
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
17
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
18
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
19
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

"पाण्याखाली गेलेल्या वाहनांचा मिळणार इन्शुरन्स"; पुण्यात राज ठाकरेंकडून पूरस्थितीचा आढावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2024 12:29 IST

राज ठाकरे यांनी एकता नगरमध्ये येऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा झालेल्या मुद्द्यांची माहिती दिली.

Raj Thackeray : पुण्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. अशातच मुळशी, खडकवासला, पानशेत आदी धरणांतून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पूरस्थिती पुन्हा उद्भवण्याचा धोका निर्माण झाला आहे. धरणातून विसर्ग सोडल्याने सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. गेल्यावेळीप्रमाणे पुन्हा एकता नगरमध्ये पाणी भरण्यास सुरुवात झाल्याने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकता नगरमध्ये येऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या चर्चेची माहिती दिली.

शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुण्यातील एकता नगरमध्ये दाखल झाले. राज ठाकरे यांनी एकता नगर भागातील पुरग्रस्तांची भेट घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीची माहिती नागरिकांना दिली. या बैठकीत पुण्यातील पुरासंदर्भात चर्चा करण्यात आल्याचे राज ठाकरे म्हणाले.

"आठवड्याभरापूर्वी येथे आले होतो. त्यानंतर मी याविषयी सरकारशी बोलेन आणि मार्ग काढेन असं सांगितलं होतं. त्याप्रमाणे काल मुख्यमंत्र्यांसोबत माझी बैठक झाली. महत्त्वाच्या तीन विषयांबाबत माझं बोलण झालं. मुळा मुठा कॉरिडॉरमधील अनधिकृत गोष्टी बाजूला काढण्यासंदर्भात चर्चा केली. त्याचे काम सुरु झालेलं आहे. दुसरा विषय पुनर्विकासाचा होता. तुम्हाला एफएसआय मिळत नसल्याने पुनर्विकासाचा विषय अडला होता.  पुनर्विकास होण्यासाठी जागा एफएसआय मिळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला आहे. एफएसआय वाढला तर पुनर्विकास होऊ शकेल आणि त्यासंदर्भातील पावले पुढच्या आठवडाभरामध्ये उचलली जातील. इथल्या तीन लाख नागरिकांचा पुनर्विकास होईल. तिसरा विषय हा पाण्याखाली गेलेल्या वाहनांचा होता. वाहने पाण्याखाली गेल्यानंतर विमा कंपन्या इन्शुरन्स देत नाहीयेत. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात पुणे महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी या दोघांनाही विमा कंपन्यांसोबत बोलून घेण्यास सांगितले आहे. विमा कंपन्यांकडून सगळ्या वाहनांचा इन्श्युरन्स मिळून द्यायचा आहे. मुळा मूठा रिव्हर फ्रंन्टसंदर्भात पुण्यातील नागरिकांची समिती करुन आणि महानगरपालिकेशी बोलूनच पुढचा कार्यक्रम होणार आहे. त्यासाठी संरक्षक भिंती बांधण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत," अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली.

दरम्यान, धरणांमधून विसर्ग सुरु करण्यात आल्यानंतर पालकमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भात एक पोस्ट लिहून पुणेकरांना इशारा दिला. "पुणे जिल्ह्यातील खडकवासला, पवना, मुळशी, चासकमान धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होत असून धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने या धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू करण्यात येत आहे. खडकवासला धरणातून सध्या २७ हजार १६ क्युसेक्स, मुळशीतून २७ हजार ६०९ क्युसेक्स, पवनातून ५ हजार क्युसेक्स, चासकमान धरणातून ८ हजार ५० क्युसेक्स वेगाने विसर्ग सुरु आहे," असे अजित पवार म्हणाले. 

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसRaj Thackerayराज ठाकरेfloodपूर