शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

कोरेगाव भीमाप्रकरणी मुख्यमंत्र्यांकडून ’राजधर्माचे’ पालन नाहीच : अर्जुन डांगळे यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2018 20:38 IST

भारतीय जनता पार्टीकडून एकीकडे संविधान बदलण्याची भाषा करताना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना जवळ घेण्याचा प्रयत्न केला जातो.

ठळक मुद्देकोरेगाव भीमा हिंसाचार आणि भाजप विरोधात करण्यात येणारी दलित आघाडी याविषयी पुण्यात बैठकमराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी आमची देखील भूमिका

पुणे :  परदेशात गेले की पंतप्रधान आपण गौतम बुध्दांच्या देशातुन आल्याचे सांगतात.सोयीनुसार महात्मा गांधींच्या विचारांचे दाखले देत सहानुभुती मिळविण्याचा प्रयत्त्न पक्षातील नेते करतात. त्यांना विदेशात मात्र गोळवलकर आणि हेडगेवारांचे नाव घेण्याची हिंमत होत नाही. एकीकडे संविधान बदलण्याची भाषा करताना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना जवळ घेण्याचा प्रयत्न केला जातो. गोळवलकर आणि हेडगेवार यांच्या विचारांवर वाढ झालेल्या भारतीय जनता पार्टी पुढे नेमका आदर्श कुणाचा आहे? असा सवाल रिपब्लिकन जनता पक्षाचे संस्थापक व अध्यक्ष अर्जुन डांगळे यांनी उपस्थित केला. तसेच कोरेगाव भीमा प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडून  ‘‘राजधर्माचे’’ पालन झाले नसून त्यात त्यांची पेशवाई वृत्ती दिसून आल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.  कोरेगाव भीमा हिंसाचार आणि भाजप विरोधात करण्यात येणारी दलित आघाडी याविषयी पुण्यात बैठक पार पडली. त्यासंदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाभरातून कार्यकर्ते उपस्थित होते. यात सुनील पगारे, अरविंद नागटिळक, शंकर वाघमारे, दयानंद बनसोडे, हिरालाल भोसले, आशुतोष भोसले यांचा सहभाग होता. कोरेगाव भीमाप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी भिडे आणि एकबोटे यांना पाठीशी घातल्याचा आरोप डांगळे यांनी केला. ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी आता भानामतीचा खेळ थांबवून नेमक्या किती आंबेडकरी आणि नक्षली कार्यकर्त्यांना अटक केली हे सांगावे. कारण नसताना आंबेडकरी व नक्षल कार्यकर्त्यांकडून हिंसाचार घडविला जात असल्याचे चित्र उभे केले जात आहे. दहशतवादाच्या नावाखाली दिशाभूल करणा-या मुख्यमंत्र्यांनी आता भानामतीचा खेळ थांबवावा. कोरेगाव भीमाच्या हिंसाचाराची पाळेमुळे ही गोळवलकरांच्या ‘‘बंच आॅफ थॉटस’’ मध्ये दिसून येतात.  पक्षाच्यावतीने संविधान सन्मान अभियान राज्यातील वेगवेगळ्या शहरांमध्ये राबविण्यास सुरुवात झाली असून येत्या ६ डिसेंबर रोजी शिवाजी पार्क येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. आगामी काळातील निवडणूकांमध्ये भाजपला पराभूत करण्यासाठी नागरिकांना जोरदार आवाहन करण्यात येणार आहे. यावेळी शैलेंद्र मोरे यांची पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली. * मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी आमची देखील भूमिका आहे. मात्र त्यांना स्वतंत्र गटातून आरक्षण देण्यात यावे. ओबीसी किंवा आदिवासींच्या आरक्षणाला धक्का न लावता त्यांना आरक्षण देण्यात यावे. सध्या काही धर्मांध शक्ती अ‍ॅट्रॉसिटीच्या नावाखाली समाजात वेगळे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करीत आहेत. असे सांगून गुजरात मधील सरदार सरोवर येथे उभारण्यात आलेल्या सरदार पटेल यांच्या पुतळयाविषयी भाष्य करताना डांगळे म्हणाले, पटेलांच्या पुतळयाला विरोध नाही. त्यांनी सर्वात प्रथम संघावर बंदी घालण्याचा आदेश दिला होता. मात्र हे करत असताना पंडित नेहरुंचे अवमुल्यन करणे चुकीचे आहे. 

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचार