शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

कोरेगाव भीमाप्रकरणी मुख्यमंत्र्यांकडून ’राजधर्माचे’ पालन नाहीच : अर्जुन डांगळे यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2018 20:38 IST

भारतीय जनता पार्टीकडून एकीकडे संविधान बदलण्याची भाषा करताना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना जवळ घेण्याचा प्रयत्न केला जातो.

ठळक मुद्देकोरेगाव भीमा हिंसाचार आणि भाजप विरोधात करण्यात येणारी दलित आघाडी याविषयी पुण्यात बैठकमराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी आमची देखील भूमिका

पुणे :  परदेशात गेले की पंतप्रधान आपण गौतम बुध्दांच्या देशातुन आल्याचे सांगतात.सोयीनुसार महात्मा गांधींच्या विचारांचे दाखले देत सहानुभुती मिळविण्याचा प्रयत्त्न पक्षातील नेते करतात. त्यांना विदेशात मात्र गोळवलकर आणि हेडगेवारांचे नाव घेण्याची हिंमत होत नाही. एकीकडे संविधान बदलण्याची भाषा करताना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना जवळ घेण्याचा प्रयत्न केला जातो. गोळवलकर आणि हेडगेवार यांच्या विचारांवर वाढ झालेल्या भारतीय जनता पार्टी पुढे नेमका आदर्श कुणाचा आहे? असा सवाल रिपब्लिकन जनता पक्षाचे संस्थापक व अध्यक्ष अर्जुन डांगळे यांनी उपस्थित केला. तसेच कोरेगाव भीमा प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडून  ‘‘राजधर्माचे’’ पालन झाले नसून त्यात त्यांची पेशवाई वृत्ती दिसून आल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.  कोरेगाव भीमा हिंसाचार आणि भाजप विरोधात करण्यात येणारी दलित आघाडी याविषयी पुण्यात बैठक पार पडली. त्यासंदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाभरातून कार्यकर्ते उपस्थित होते. यात सुनील पगारे, अरविंद नागटिळक, शंकर वाघमारे, दयानंद बनसोडे, हिरालाल भोसले, आशुतोष भोसले यांचा सहभाग होता. कोरेगाव भीमाप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी भिडे आणि एकबोटे यांना पाठीशी घातल्याचा आरोप डांगळे यांनी केला. ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी आता भानामतीचा खेळ थांबवून नेमक्या किती आंबेडकरी आणि नक्षली कार्यकर्त्यांना अटक केली हे सांगावे. कारण नसताना आंबेडकरी व नक्षल कार्यकर्त्यांकडून हिंसाचार घडविला जात असल्याचे चित्र उभे केले जात आहे. दहशतवादाच्या नावाखाली दिशाभूल करणा-या मुख्यमंत्र्यांनी आता भानामतीचा खेळ थांबवावा. कोरेगाव भीमाच्या हिंसाचाराची पाळेमुळे ही गोळवलकरांच्या ‘‘बंच आॅफ थॉटस’’ मध्ये दिसून येतात.  पक्षाच्यावतीने संविधान सन्मान अभियान राज्यातील वेगवेगळ्या शहरांमध्ये राबविण्यास सुरुवात झाली असून येत्या ६ डिसेंबर रोजी शिवाजी पार्क येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. आगामी काळातील निवडणूकांमध्ये भाजपला पराभूत करण्यासाठी नागरिकांना जोरदार आवाहन करण्यात येणार आहे. यावेळी शैलेंद्र मोरे यांची पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली. * मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी आमची देखील भूमिका आहे. मात्र त्यांना स्वतंत्र गटातून आरक्षण देण्यात यावे. ओबीसी किंवा आदिवासींच्या आरक्षणाला धक्का न लावता त्यांना आरक्षण देण्यात यावे. सध्या काही धर्मांध शक्ती अ‍ॅट्रॉसिटीच्या नावाखाली समाजात वेगळे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करीत आहेत. असे सांगून गुजरात मधील सरदार सरोवर येथे उभारण्यात आलेल्या सरदार पटेल यांच्या पुतळयाविषयी भाष्य करताना डांगळे म्हणाले, पटेलांच्या पुतळयाला विरोध नाही. त्यांनी सर्वात प्रथम संघावर बंदी घालण्याचा आदेश दिला होता. मात्र हे करत असताना पंडित नेहरुंचे अवमुल्यन करणे चुकीचे आहे. 

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचार