शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

अवकाळी पावसाने बळीराजाला झोपवलं; राज्यात तब्बल ६५ हजार हेक्टर क्षेत्राचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2021 21:08 IST

काढणीला आलेलं सोन्यासारखं पीक अवकाळी पावसाने झोपवलं..

राजू इनामदार- 

पुणे: राज्यातील १८ जिल्ह्यांमधील ८० तालुक्यांमधील ६५ हजार हेक्टरवरील शेतीला अवकाळी पावसाचा फटका बसला. कृषी व महसूल विभागाचा हा प्राथमिक अहवाल आहे. रब्बीच्या हंगामातील पिके काढणीला आली असतानाच हा अवकाळी पाऊस झाला. काही ठिकाणी पिके काढून उघड्यावरच ठेवली होती. अचानक झालेल्या पावसात ती भिजली व खराब झाली. एकूण ६५ हजार हेक्टर क्षेत्र पावसाने झोडपले. तर पुणे जिल्ह्यात या अवकाळी पावसाने ७३ हेक्टरचे नुकसान केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 

त्यात पुणे, बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम, जळगाव, नाशिक, जालना, अहमदनगर या जिल्ह्यांचा समावेश आहे. गहू, बाजरी, कांदा,मका तसेच भाजीपालाही या पावसात सापडला.महसूल व कृषी विभागाच्या वतीने नुकसान झालेल्या ठिकाणांचे रितसर पंचनामे करण्यात येत आहेत. ३३टक्केपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकर्याला सरकारच्या वतीने २ हेक्टरची नुकसान भरपाई देण्यात येते.

पुणे जिल्ह्यातील एकाच दिवसाच्या शनिवारी दि.(२० मार्च) अवकाळी पावसाने जिल्ह्यातील २ तालुक्यातील ७ गावांमधल्या १०७ शेतकर्यांंचे ७३ हेक्टरवरील पिकाचे नुकसान केले. रब्बी हंगामातील काढणीला आलेले व काढलेले कांदा पिक या पावसात भिजून खराब झाले. उन्हाळी खरबूज पिकही पावसाच्या तडाख्यात सापडले.

खेड व शिरूर या दोन तालुक्यातील ७ गावांंना अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला. खेडमधील ४४ व शिरूरमधील ६३ असे १०७ शेतकरी बाधीत झाले. त्यांचे हाती आलेले कांदा, गहू, बाजरी, टोमॅटो हे पीक ऐन वेळच्या पावसाने खराब झाले.

शिरूर तालुक्यातील २ गावांमध्ये ४५ हेक्टरवरचा कांदा खराब झाला. खेडमधील ५ गावांमध्ये हा जोराचा पाऊस झाला. ५ हेक्टरवरील गहू नष्ट झाला. बाजरी, मका, टोमँटो या पिकाचेही असेच नुकसान झाले आहे. सातही गावांमधील अडीच हेक्टरवरील भाजीपालाही पावसात सापडला. शिरूरमधील १३ हेक्टरवरील आंब्यांच्या कैऱ्या पावसाने थेट जमिनीवर आणल्या. ऊन्हाळी खरबूजाचे पीक काहीजण आवर्जून घेतात. तेही पावसाने झोपवले.कृषी खात्याचा हा प्राथमिक अंदाज आहे.

महसूल तसेच कृषी खात्याने संयुक्त पाहणी करून पंचनामे सुरू केले आहेत. ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले असेल तर सरकारकडून २ हेक्टरची नुकसान भरपाई मिळते. प्राथमिक पाहणीतील हे नुकसान असले तरी अंतिम पाहणीनंतर त्यात फरक पडू शकतो अशी माहिती कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीagricultureशेतीRainपाऊसcollectorजिल्हाधिकारीState Governmentराज्य सरकार