शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

पाऊस सुटीवर, आता टँकरवरच भागवावी लागतेय तहान! पुरंदर, शिरूरमध्ये पाणीटंचाई

By नितीन चौधरी | Updated: August 19, 2023 15:34 IST

पूर्वीच्या टँकर सुरू असलेल्या तालुक्यांपैकी भोर तालुक्यातील टँकर बंद केले आहेत...

पुणे : जुलैत पावसाने जोरदार हजेरी लावल्याने जिल्ह्यात २६ टँकर सुरू होते. मात्र, ऑगस्टमध्ये पुन्हा पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यातील टँकरची संख्या ४० झाली आहे. जिल्ह्यातील पाच तालुक्यांत अद्याप पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असून पुरंदर, शिरूर या तालुक्यात नव्याने टँकर सुरू करण्यात आले आहेत. पूर्वीच्या टँकर सुरू असलेल्या तालुक्यांपैकी भोर तालुक्यातील टँकर बंद केले आहेत.

जिल्ह्यात मार्चपासून पाण्याची टंचाई जाणवण्यास सुरुवात झाल्यानंतर टँकर सुरू झाले होते. त्यानंतर ही टँकरची संख्या ६० वर पोहोचली. मात्र, जुलैत चांगला पाऊस झाल्याने ही संख्या घटून २६ पर्यंत खाली आली. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत स्थिती कायम होती. मात्र, त्यानंतर दोन आठवड्यांत पावसाचा जोर ओसरल्याने पुन्हा पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली.

जिल्ह्यात मार्चपासून आंबेगाव, खेड, जुन्नर आणि भोर तालुक्यात टँकर सुरू झाले होते. आता त्यात आणखी दोन तालुक्यांची भर पडली आहे. पुरंदर आणि शिरूर तालुक्यांमध्ये पाणीटंचाई स्थिती निर्माण झाल्याने त्या ठिकाणी अनुक्रमे ७ आणि १३ टँकर सुरू आहेत. त्यामुळे सध्या जिल्ह्यात ५ तालुक्यांमध्ये ४० टँकरने ३६ गावांसह २७१ वाड्या वस्त्यांमधील ९८ हजार २२४ लोकसंख्येला पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्याचवेळी पूर्वीच्या टँकर सुरू असलेल्या तालुक्यांपैकी भोर तालुक्यात पावसामुळे पाण्याची टंचाई स्थिती सुधारली आहे. त्यामुळे त्या ठिकाणी टँकर बंद झाले आहेत, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली.

आंबेगाव तालुक्यात सहा टँकरने सात गावांसह ४४ वाड्या वस्त्या, तर जुन्नर तालुक्यात सहा टँकरने पाच गावांसह ५८ वाड्या वस्त्या, खेडमधील ११ गावांसह ६२ वाड्या वस्त्यांमध्ये आठ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. एकूण ४० टँकरपैकी ३७ खासगी टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पाणीपुरवठ्यासाठी आतापर्यंत २३ खासगी विहिरी ताब्यात घेण्यात आल्या असून टँकरच्या १४९ फेऱ्या झाल्या आहेत.

पुणे विभागातही १३६ टँकर-

पुणे जिल्ह्यापाठोपाठ सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यांमध्ये टँकरच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. या चार जिल्ह्यांमध्ये आजमितीला १३६ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मात्र, कोल्हापूर येथील राधानगरी धरण भरल्याने तेथील पाण्याची चिंता सध्या मिटली आहे. सातारा जिल्ह्यात ६१ टँकरने ५६ गावांसह ३४३ वाड्या वस्त्यांना तर सांगली जिल्ह्यात २७ टँकरने २३ गावांसह १६९ वाड्यावस्त्यांना पाणीपुरवठा सुरू आहे. सोलापूर जिल्ह्यात नऊ गावांसह ७४ वाड्या वस्त्यांना नऊ टँकर सुरू आहेत.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडWaterपाणीPurandarपुरंदरShirurशिरुर