शहरं
Join us  
Trending Stories
1
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
4
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
5
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
6
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
7
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
8
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
9
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
10
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
11
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
12
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
13
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
14
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
15
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
16
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
17
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
18
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
19
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
20
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल

Indian Railway: सणासुदीमुळे रेल्वे बुकिंग फुल्ल; विमानांची उड्डाणेही वाढली

By नितीश गोवंडे | Updated: October 3, 2022 14:59 IST

विमानाचा प्रवास आजही मध्यमवर्गीयांच्या आवाक्याबाहेर असल्याने त्यांचे प्रथम प्राधान्य रेल्वेलाच असते....

पुणे : दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आल्यामुळे लोकांनी सुट्यांचे नियोजन करण्यास सुरूवात केली आहे. पुण्याहून सुटणाऱ्या ९८ टक्के रेल्वेचे बुकिंग फुल्ल झाल्यामुळे आता गावी कसे जायचे? हा प्रश्न लोकांना पडला आहे. याऊलट कोरोनानंतर रविवारी पहिल्यांदाच पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून १७२ प्रवासी विमानांची ये-जा झाली, त्याद्वारे २५ हजार प्रवाशांनी प्रवास केल्याची नोंद करण्यात आली आहे. ही संख्या दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे आणखीन वाढणार असून विमानाच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

विमानाचा प्रवास आजही मध्यमवर्गीयांच्या आवाक्याबाहेर असल्याने त्यांचे प्रथम प्राधान्य रेल्वेलाच असते. पुणे स्टेशनवरून सुटणाऱ्या रेल्वेंपैकी ९८ टक्के रेल्वे फुल्ल झाल्याने परराज्यात जाण्याऱ्या प्रवाशांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे अजून पर्यंत रेल्वे बोर्डाकडून दिवाळी विशेष रेल्वे सुरू करण्यासंदर्भात कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे दिवाळी विशेष रेल्वे सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.

पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात औद्योगीकरण झाल्यामुळे राज्यातील विविध भागातून मोठ्या संख्येने नागरिक कामानिमित्त शहर आणि परिसरात आले आहेत. तसेच पुणे हे विद्येचे माहेर घर म्हणून देखील ओळखले जाते, त्यामुळे लाखो विद्यार्थी शिक्षणासाठी येथे येतात. दिवाळीत विद्यार्थ्यांना १५ ते २० दिवस सुट्टी असते त्यामुळे बहुतांश पालक दिवाळी निमित्त गावी जातात किंवा फिरायला जाण्याचे नियोजन करतात. त्यामुळे पुण्यातून सुटीच्या कालावधीत विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात जाणाऱ्या नागरिकांचे प्रमाण अधिक आहे.

मध्य रेल्वेकडून गणेशोत्सव, छटपुजा आणि उन्हाळी सुट्टी विशेष रेल्वेन चालवल्या जातात. याच प्रकारे दिवाळी विशेष रेल्वे कधी सुरू करणार हा प्रश्न विचारला जात आहे. पुण्याहून उत्तर भारतात जाणाऱ्या विमानांच्या संख्येत देखील वाढ करण्यात आली असून, दिवसाला १५ ते १७ हजार प्रवासी विमानाने ये-जा करतात पण नुकताच २५ हजारांचा टप्पा गाठल्याने इतर ठिकाणच्या विमानांच्या संख्येत देखील वाढ होणे गरजेचे आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रrailwayरेल्वे