शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

Indian Railway: सणासुदीमुळे रेल्वे बुकिंग फुल्ल; विमानांची उड्डाणेही वाढली

By नितीश गोवंडे | Updated: October 3, 2022 14:59 IST

विमानाचा प्रवास आजही मध्यमवर्गीयांच्या आवाक्याबाहेर असल्याने त्यांचे प्रथम प्राधान्य रेल्वेलाच असते....

पुणे : दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आल्यामुळे लोकांनी सुट्यांचे नियोजन करण्यास सुरूवात केली आहे. पुण्याहून सुटणाऱ्या ९८ टक्के रेल्वेचे बुकिंग फुल्ल झाल्यामुळे आता गावी कसे जायचे? हा प्रश्न लोकांना पडला आहे. याऊलट कोरोनानंतर रविवारी पहिल्यांदाच पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून १७२ प्रवासी विमानांची ये-जा झाली, त्याद्वारे २५ हजार प्रवाशांनी प्रवास केल्याची नोंद करण्यात आली आहे. ही संख्या दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे आणखीन वाढणार असून विमानाच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

विमानाचा प्रवास आजही मध्यमवर्गीयांच्या आवाक्याबाहेर असल्याने त्यांचे प्रथम प्राधान्य रेल्वेलाच असते. पुणे स्टेशनवरून सुटणाऱ्या रेल्वेंपैकी ९८ टक्के रेल्वे फुल्ल झाल्याने परराज्यात जाण्याऱ्या प्रवाशांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे अजून पर्यंत रेल्वे बोर्डाकडून दिवाळी विशेष रेल्वे सुरू करण्यासंदर्भात कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे दिवाळी विशेष रेल्वे सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.

पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात औद्योगीकरण झाल्यामुळे राज्यातील विविध भागातून मोठ्या संख्येने नागरिक कामानिमित्त शहर आणि परिसरात आले आहेत. तसेच पुणे हे विद्येचे माहेर घर म्हणून देखील ओळखले जाते, त्यामुळे लाखो विद्यार्थी शिक्षणासाठी येथे येतात. दिवाळीत विद्यार्थ्यांना १५ ते २० दिवस सुट्टी असते त्यामुळे बहुतांश पालक दिवाळी निमित्त गावी जातात किंवा फिरायला जाण्याचे नियोजन करतात. त्यामुळे पुण्यातून सुटीच्या कालावधीत विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात जाणाऱ्या नागरिकांचे प्रमाण अधिक आहे.

मध्य रेल्वेकडून गणेशोत्सव, छटपुजा आणि उन्हाळी सुट्टी विशेष रेल्वेन चालवल्या जातात. याच प्रकारे दिवाळी विशेष रेल्वे कधी सुरू करणार हा प्रश्न विचारला जात आहे. पुण्याहून उत्तर भारतात जाणाऱ्या विमानांच्या संख्येत देखील वाढ करण्यात आली असून, दिवसाला १५ ते १७ हजार प्रवासी विमानाने ये-जा करतात पण नुकताच २५ हजारांचा टप्पा गाठल्याने इतर ठिकाणच्या विमानांच्या संख्येत देखील वाढ होणे गरजेचे आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रrailwayरेल्वे