शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही, मोदींनी आश्वासन दिले', ट्रम्प यांचा मोठा दावा
2
एसटी बँकेच्या बैठकीत संचालकांमध्ये फ्रीस्टाईल; बाटल्यांची फेकाफेक, शिवीगाळ, आरोप-प्रत्यारोप
3
"माझी चूक काय? २० वर्ष मी पक्षासोबत एकनिष्ठ राहिली, तरीही..."; भाजपा महिला आमदाराला अश्रू अनावर
4
संपादकीय: ‘मविआ’ला जेव्हा जाग येते...
5
आजचे राशीभविष्य, १६ ऑक्टोबर २०२५: विविध क्षेत्रात लाभ, पदोन्नतीचीही शक्यता! 'या' राशींसाठी आजचा दिवस खास
6
१० राशींवर धनलक्ष्मीची अनंत कृपा, ५ राजयोगाने सोनेरी दिवस; भरपूर पैसा-भरभराट, शुभ-वरदान काळ!
7
ट्रम्प आणि मोदी : ‘जुळवून’ घेण्यासाठी दिल्लीत हालचाली
8
महिलेचे नाव वेगवेगळ्या एपिक नंबरसह, दुपारी ३ वाजता वेबसाईटवर होती, सहा वाजता गायब...; निवडणूक आयोग अनभिज्ञ...
9
माजी पालिका आयुक्तांची अटक बेकायदा; कोर्टाचा ईडीला दणका
10
Rain Alert: अवकाळीची शक्यता, १३ जिल्ह्यांना यलो अलर्ट; कोणत्या दिवशी, कुठे कोसळणार...
11
निवडणूक आयोगाचा धादांत खोटेपणा उघडकीस!
12
आता शहरी नक्षलवादाविरुद्ध लढा : मुख्यमंत्री फडणवीस
13
सोनं वाढतंय, आणखी वाढीच्या अपेक्षेने गुंतवणूकदार टाकू लागले सोन्यात पैसा
14
‘अरे हीरो, क्या हाल है भाई?’, रोहित-गिल यांनी मारली मिठी
15
मुंबईकरांचा संकटमोचक आला धावून...; रणजी करंडक : सिद्धेशच्या शतकाने मुंबईचे पुनरागमन
16
सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोची विश्वविक्रमी ‘किक’; विश्वचषक पात्रता फेरीत केले सर्वाधिक गोल
17
यशस्वी जैस्वालचे पुन्हा अव्वल पाचमध्ये आगमन
18
वर्चस्व गाजवूनही पाकचे एका गुणावर समाधान; पावसाच्या व्यत्ययामुळे इंग्लंडचा पराभव टळला
19
‘राष्ट्रकुल’चे यजमानपद अहमदाबादला; कार्यकारी मंडळाची शिफारस
20
औषधांच्या कठाेर गुणवत्ता तपासणीसाठी आता कायदा; विषारी सिरप प्रकरणानंतर केंद्र सरकारने घेतला निर्णय

औरंगाबाद घटनेनंतर रेल्वे सतर्क ; रेल्वेमार्गांवर वाढविली गस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2020 18:09 IST

औरंगाबाद येथे मजूरांना मालगाडीने चिरडल्याने आता पुणे रेल्वे विभागाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. रेल्वे मार्गावर गस्त वाढविण्यात येत आहे.

पुणे : औरंगाबाद येथील घटनेनंतर पुणे विभागातील सर्व रेल्वे मार्गांवर लोकांनी येऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणावर गस्त वाढविण्यात आली आहे. लोहमार्ग पोलिस, रेल्वे सुरक्षा दलासह सर्व विभागांना सतर्क राहण्याबाबत सुचना दिल्या आहेत. तसेच चालकांनाही अत्यंत काळजीपुर्वक गाडी चालविण्याच्या सुचना देण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक रेणु शर्मा यांनी ‘लोकमत’ला दिली.

औरंगाबाद येथे शुक्रवारी पहाटे मालगाडीने १६ मजूरांना चिरडल्यानंतर रेल्वे यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. तसेच त्याच दिवशी सायंकाळी उरळी ते लोणी स्थानकादरम्यान मालगाडी चालकाच्या सतर्कतेमुळे दुर्घटना टळली. सुमारे १५ ते २० जण रेल्वेमार्गावरच ठाण मांडून बसले होते. पण चालकाने वेळीच ब्रेक लावल्याने त्यांचे प्राण वाचले. यापार्श्वभुमीवर रेल्वे प्रशासनाने सर्वच मार्गांवर गस्त वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पुणे विभागातील पुणे ते लोणावळा, पुणे ते दौंड आणि पुणे ते मिरज या मार्गांवर गस्त वाढविली आहे.

याविषयी बोलताना रेणु शर्मा म्हणाल्या, मागील दोन दिवसांपासून सर्व मार्गांवरील गस्त वाढविण्यात आली आहे. आरपीएफ, अभियांत्रिकी, संचलन यांसह विविध विभागांना याबाबत सुचना दिल्या आहेत. लोहमार्ग पोलिसांकडूनही गस्त घालण्यात येत आहे. प्रामुख्याने चालकांना सतर्क राहून गाडी चालविण्यास सांगण्यात आले आहे. सध्या मालगाडी आणि विशेष प्रवासी गाड्या सुरू आहेत. त्यामुळे मार्गावरून कोणीही चालताना दिसले तर त्यांना तातडीने दुर केले जाईल. त्यांना जीव धोक्यात न घालण्याबाबत सांगून तिथून हटविले जात आहे. रस्त्यानेच पायी जाण्याच्या सुचना दिल्या जात आहेत.

रस्त्यानेच प्रवास करालॉकडाऊनमुळे रेल्वे वाहतुक पुर्णपणे बंद असल्याचे लोकांना वाटत आहे. पण पहिल्या दिवसापासून केवळ प्रवासी वाहतुक बंद आहे. मालगाड्या नियमितपणे धावत आहेत. तसेच काही दिवसांपासून श्रमिक स्पेशल गाड्याही सोडण्यात येत आहेत. त्यामुळे कोणत्या ट्रॅकवरून कोणती गाडी कधी येईल, हे सांगता येत नाही.  पण परराज्यात जाणारे अनेक मजुर रेल्वे ट्रॅकवरूनच पायी जात आहेत. तसेच विश्रांतीसाठीही ट्रॅकचाच आधार घेत आहेत. याच कारणामुळे शुक्रवारची घटना घडली आहे. त्यामुळे रेल्वेने लोकांना रेल्वे ट्रॅकवरून किंवा जवळून न चालून जीव धोक्यात न घालता रस्त्यानेच चालावे, असे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे. 

टॅग्स :railwayरेल्वेAccidentअपघातPoliceपोलिस