शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

राहुल गांधींनी अंदमानच्या काेठडीत चार दिवस राहून दाखवावं : माधुरी मिसाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2019 18:05 IST

राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा भारतीय जनता पक्षाच्यावतीने पुण्यातील सावरकर स्मारक येथे निषेध केला.

पुणे : सावरकरांनी तरुणांच्या मनात स्वातंत्र्याची ज्याेत पेटवली. सावरकरांनी अंदमानला 12 वर्षे काळ्यापाण्याची शिक्षा भाेगली. काळ्यापाण्याची शिक्षा काय असते हे राहुल गांधींना माहित नसेल. ते कधी अंदमानला गेलेही नसतील. राहुल गांधींनी अंदमानच्या काळ काेठडीत चार दिवस राहुन दाखवावं असं म्हणत भाजपाच्या आमदार तथा भाजपाच्या पुण्याच्या शहराध्यक्षा माधुरी मिसाळ यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध केला. 

राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्याचा भारतीय जनता पक्षाच्यावतीने पुण्यातील सावरकर स्मारक येथे निषेध केला. यावेळी ''हाेय मी सावरकर'' असे लिहीलेले फलक यावेळी कार्यकर्त्यांनी हातात घेतले हाेते. राहुल गांधींचा निषेध करणाऱ्या घाेषणा यावेळी देण्यात आल्या. 

यावेळी बाेलताना मिसाळ म्हणाल्या, सावरकरांच्या नखाची सर सुद्धा राहुल गांधी यांना नाही. ते राहुल सावरकर हाेऊच शकत नाहीत. गांधी नाव असले तरी ते गांधीजींच्या विचारांवर चालू शकत नाहीत. सावरकरांनी तरुणांच्या ह्रदयात स्वातंत्र्याची ज्याेत लावली. स्वातंत्र्यासाठी सावरकरांनी 12 वर्षे काळ्यापाण्याची शिक्षा भाेगली. काळ्यापाण्याची शिक्षा काय असते हे राहुल गांधींना माहित नसेल. ते कधी अंदमानला गेलेही नसतील. राहुल गांधींनी अंदमानच्या काळ काेठडीत चार दिवस राहुन दाखवावं. काॅंग्रेस स्वातंत्र्यवीरांवर टीका करुन कुठल्या थराला गेली याचा काॅंग्रेसने विचार करावा. देशातील जनता काॅंग्रेसला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. 

शिवसेनेबाबत बाेलताना त्या म्हणाल्या, शिवसेना आता लेचीपेची झाली आहे. राहुल गांधीच्या वक्तव्यावर संजय राऊत यांनी आधी ट्विट केलं आणि नंतर ते बदललं. राष्ट्रभिमान बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला शिकवला. हिंदुत्व टिकवण्यासाठी बाळासाहेब ठाकरे शेवटपर्यंत लढते. आता हिंदुत्वावर टीका हाेत असताना यावर शिवसेना गप्प बसत आहे. 

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाRahul Gandhiराहुल गांधीVinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकर