शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

Maharashtra: खायचे तरी काय? रब्बीची पेरणी केवळ ३२ टक्केच! परतीच्या पावसाने ओढ दिल्याने फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2023 09:52 IST

हरभऱ्याची लागवड मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत केवळ ७० टक्के इतकीच झाली आहे....

पुणे : परतीच्या पावसाने ओढ दिल्याने राज्यातील रब्बी पिकांची पेरणी झालेल्या क्षेत्रावर मोठा परिणाम झाल्याचे चित्र आहे. दोन महिने उलटून गेले तरी आतापर्यंत सरासरीच्या केवळ ३२ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. रब्बी ज्वारीची पेरणी गेल्या वर्षीइतकी झाली आहे. हरभऱ्याची लागवड मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत केवळ ७० टक्के इतकीच झाली आहे.

राज्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र ५३ लाख ९६ हजार ९६९ हेक्टर इतके आहे. आतापर्यंत १७ लाख ४१ हजार ७९ हेक्टरवर रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. सरासरीच्या तुलनेत हे क्षेत्र ३२.२६ टक्के इतके आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा झालेली पेरणी सुमारे ७८ टक्के इतकी आहे. राज्यात आतापर्यंत ८ लाख २० हजार हेक्टरवर रब्बी ज्वारीची पेरणी झाली आहे. सरासरीच्या तुलनेत हे क्षेत्र केवळ ४६.७७ टक्के इतके आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे क्षेत्र ९७ टक्के इतके होते.

आतापर्यंत केवळ ८७ हजार २१६ हेक्टरवरच गव्हाची पेरणी झाली असून, सरासरीच्या तुलनेत हे क्षेत्र केवळ ८.३२ टक्के इतके आहे. आतापर्यंत ७ लाख २६ हजार ८२ हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी झाली असून, सरासरीच्या तुलनेत हे क्षेत्र ३३.७४ टक्के इतके आहे. मक्याच्या लागवडीत घट झाली. आतापर्यंत केवळ ७९ हजार ३१२ हेक्टरवर पेरणी झाली आहे. करडईची पेरणी १५ हजार २६६ हेक्टरवर झाली आहे. गेल्या वर्षी हेच क्षेत्र १४ हजार ३६ हेक्टर इतके होते.

पुणे विभागात सर्वाधिक ५ लाख ३५ हजार ५४० हेक्टरवर रब्बी पिकांची पेरणी झाली असून, सरासरी प्रमाण ४६.६० टक्के आहे. त्याखालोखाल लातूर विभागात ५ लाख २८ हजार २७२ हेक्टर अर्थात सरासरीच्या ३८.७३ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सर्वांत कमी पेरणी नाशिक विभागात केवळ १८ हजार ७५७ हेक्टर अर्थात सरासरीच्या तुलनेत केवळ ३.६९ टक्के इतकी झाली आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत रब्बी ज्वारीचे क्षेत्र ९७ टक्के इतके झाले आहे. त्यात आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे. उसाच्या तोडणीनंतर हरभऱ्याच्या लागवडीत डिसेंबरअखेर वाढ होण्याची अपेक्षा आहे.

- दिलीप झेंडे, संचालक, विस्तार व प्रशिक्षण, कृषी विभाग, पुणे

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेRainपाऊस