शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

गतीशील लोकशाही हा सर्वांत मोठा प्रश्न : गोविंद निहलानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2019 20:24 IST

जसा काळ बदलतो तसे नवनवीन सामाजिक प्रश्न सातत्याने विकसित होत असतात. भारतीय लोकशाही ही स्थिर नव्हे तर ती गतीशील स्वरूपाची  आहे. लोकशाही विकसित होण्याची प्रक्रिया ही निरंतर होत असल्याने काही प्रश्न बदलतात तर काही वगळले जातात

पुणे : जसा काळ बदलतो तसे नवनवीन सामाजिक प्रश्न सातत्याने विकसित होत असतात. भारतीय लोकशाही ही स्थिर नव्हे तर ती गतीशील स्वरूपाची  आहे. लोकशाही विकसित होण्याची प्रक्रिया ही निरंतर होत असल्याने काही प्रश्न बदलतात तर काही वगळले जातात. सध्याच्या काळात आपण लोकशाहीच्या संक्रमणावस्थेतून जात असून, गतीशील लोकशाही हा सर्वांत मोठा प्रश्न आहे, असे सांगत ज्येष्ठ दिग्दर्शक गोविंद निहलानी यांनी नयनतारा सहगल या मुद्यावर थेट भाष्य करणे टाळले. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील  ‘पिफ फोरम’चे उदघाटन गोविंद निहलानी आणि ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांच्या हस्ते झाले. त्यानंतर महोत्सवाचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल यांनी निहलानी यांच्याशी संवाद साधला असताना त्यांनी सामाजिक व्यवस्था, असहिष्णुता या मुद्यांवर सावध भूमिका घेतली. कलात्मक लिखाणात लेखकाची स्वत:ची विचारप्रक्रिया फारमहत्त्वाची असते आणि ती कुणीही तुम्हाला शिकवू शकत नाही. तुमच्यातच ती असायला हवी असे ते म्हणाले. निहलानी म्हणाले,  माझा  चित्रपटांकडे पाहण्याचा दृष्टीकोन विकसित होण्यात ज्येष्ठ नाटककार व लेखक विजय तेंडुलकर यांचा मोठा वाटा आहे. लेखक म्हणून त्यांच्या कामात सखोलता होती. मला तर त्यांच्याकडून खूप शिकायला मिळालेच,  भारतीय चित्रपटांसाठी त्यांचे योगदान मोठे आहे. परंतु माझ्या मते त्यांना या माध्यमातून जी जी अपेक्षित ओळख मिळायला हवी होती ती मिळाली  नाही.              ’गांधी’ चित्रपटाच्या अनुभवाविषयी विचारले असता ते म्हणाले,   रिचर्डअटनबरो यांच्या  ‘गांधी’ चित्रपटसाठी   ‘सेकंड युनिट’ दिग्दर्शक म्हणून माझी निवड होईल असे वाटले नव्हते. तोपर्यंत   ‘आक्रोश’ हा माझा एकच चित्रपट प्रदर्शित झाला होता. परंतु त्यांच्या चमूने माझा चित्रपटबारकाईने पाहिला होता.  ‘गांधी’साठी काम करताना व्यवस्थापनाचे उत्तम धडेमला मिळाले. या चित्रपटाची पटकथा चित्रपटाच्या प्रत्येक विद्याथर््याने वाचायला हवी. तीन तासांत महात्मा गांधीचे ८० वर्षांचे आयुष्य बसवणे ही सोपी गोष्ट नाही. चित्रपटामध्ये तंत्रज्ञानाच्या वापराबाबत त्यांनी सकारात्मक चित्र मांडले. आता सर्व गोष्टी ‘डिजिटल’ झाल्या आहेत, परंतु बदलते तंत्रज्ञान हे काम अधिकाधिक चांगले व्हावे यासाठीच असते. त्यामुळे आपण ते कायम स्वीकारायला हवे. सुरूवातीला आम्ही  ‘सेल्युलॉईड’ माध्यमात चित्रपट बनवत असू आणि त्या माध्यमात बनलेला चित्रपट  पाहणे हा एक निराळा आणि सुंदर अनुभव होता. तंत्रज्ञान नेहमीच आपल्याला   ‘क्रिएट आॅर पेरिश’ असे आव्हान देत असते. परंतु आताचे नवीन तंत्रज्ञान उत्तम असून प्रतिमानिर्मितीचे नवे आयाम त्यामुळे खुले झाले असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

टॅग्स :PIFFपीफFilmfare Awardफिल्मफेअर अवॉर्डGovind nihlaniगोविंद निहलानी