शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

पुरंदर उपसा योजना खोळंबली, शेतकरी आला अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 02:46 IST

दुष्काळी पुरंदर तालुक्याला बारमाही बागायतदार बनविण्याचे स्वप्न पूर्ण करणा-या पुरंदर उपसा जलसिंचन योजना सध्या पुरेशी मागणी असूनही दर निश्चित केले नसल्याने शासनाच्या १९% दराचे पाणी सोडण्यात ही योजना खोळंबली आहे.

भुलेश्वर  - दुष्काळी पुरंदर तालुक्याला बारमाही बागायतदार बनविण्याचे स्वप्न पूर्ण करणाºया पुरंदर उपसा जलसिंचन योजना सध्या पुरेशी मागणी असूनही दर निश्चित केले नसल्याने शासनाच्या १९% दराचे पाणी सोडण्यात ही योजना खोळंबली आहे.राज्यातील बहुतांशी योजना वीजबिलापोटी बंद आहेत. सर्वसामान्य शेतकरी अडचणीत येत आहेत. उपसा सिंचन योजनेच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या प्रयत्नातून उपसा सिंचन योजनेच्या एकुण वीजबिलापैकी ८१ टक्के विजेचा भार राज्य शासन भरणार आहे. उरलेले १९ टक्के वीजबिल उपसा सिंचन योजनेच्या लाभार्थी शेतकºयांनी भरण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. पुरंदर उपसा जलसिंचन योजना ही तीन हंगामात चालवली जाते. खरीप हंगामातील पाण्याचा दर एक एमसीएफटी पाण्यासाठी पंच्चावन्न हजार रुपये मोजावे लागत होते. तर रब्बी हंगामासाठी सत्तावन्न हजारांपर्यंत हा दर वाढत जायचा व उन्हाळी हंगामासाठी हाच दर साठ हजारांपर्र्यंत गेला.पुरंदर उपसा जलसिंचन योजना अनेक गावांना वरदान ठरत आहे. पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे पाणी वाघापूर येथील घाटुळीआई मंदिराजवळ आल्यानंतर ते दिवे, माळशिरस, राजेवाडी पाईपलाईन द्वारे देण्यात येते. यात पाण्याचे विभाजन करुन त्या लाईनवरील शेतकºयांना दिले जाते. पाणी महाग असले तरी पुरंदर तालुक्यातील शेतकरी पैसे जमा करुन पाणी घ्यायचे व विविध पिके करतात.सध्या उन्हाळी हंगामात १९ टक्के दराने पाणी मिळणार असल्याने पुरंदरचा शेतकरी सुखावला आहे. पुरंदर उपसा जलसिंचन योजनेच्या आॅफिसमध्ये तसे परिपत्रकही आले आहे. मात्र पाणी आकारणी दर निश्चित करण्यात न आल्याने एक मार्चपासून सुरु होणारी पुरंदर उपसा जलसिंचन योजना आजही पुरेशी मागणी असूनही बंद आहे. खरे तर एक मार्च अगोदरच दर निश्चित होणे गरजेचे होते. मात्र अद्यापही दर निश्चित करण्यात आले नाही. यामुळे शेतकºयांकडून नक्की किती पैसे घ्यायचे याचा मेळ बसवण्यात आला नाही. यामुळे एक मार्चपासून शेतकºयांनी मागणी करुनही पैसे स्वीकारण्यास कोणीही तयार नाही. यामुळे शेतकरी वर्गामध्ये निराशेचे वातावरण निर्माण झाले.उन्हाळी हंगामाचे फॉर्म भरण्यास सुरुवात...पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे उन्हाळी हंगामातील पाण्याची मागणी नोंदवताना मागणी फॉर्म भरुन देण्यात सुरुवात झाली आहे. या फॉर्मला शेतकºयांचा सातबारा जोडावा लागणार आहे. कालपासून अनेक शेतकरी फॉर्म नेऊन मागणी नोंदवत आहेत. फॉर्म भरुन दिल्यानंतर १९ टक्के दराने पैसे स्वीकारण्यात येणार आहेत.योजनेची चोरी वाढली...पुरंदर उपसा जलसिंचन योजनेला पाणी चोरी काही नवीन नाही. गळणाºया एअरवॉलमधून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते. याचा भुर्दंड पाणी घेणारांवर पडतो. पाणी पुरेशा दाबाने मिळू शकत नाही. मागणी केलेल्या शेतकºयांना पाणी देताना पाठीमागे कोणीही या योजनेचे वॉल फिरवून मागणी नसतानाही पाणी घेतात. यामुळे ही योजना अडचणीत येते.दुरुस्ती झालीच नाही...पुरंदर उपसा जलसिंचन योजना पाऊस पडल्यापासून बंद आहे ती आजतागायत. या कालावधीत या योजनेची झालेली दुरवस्था दूर करण्यात यावी अशी मागणी लाभार्थी गावातील शेतकºयांनी केली होती. मात्र योजना बंद असूनदेखील कोणत्याही प्रकारची डागडुजी करण्यात आली नाही. या योजनेचे अनेक एअरवॉल मोठ्या प्रमाणात गळतात. यामुळे लाखो लिटर पाणी वाया जाते. मागणी करूनही ही कामे पूर्ण न केल्यामुळे ज्या वेळी ही योजना सुरु होईल त्या वेळेस गळणाºया एअरवॉलमधून लाखो लिटर पाणी वाया जाणार आहे.कर्मचा-यांची संख्या कमी...पुरंदर उपसा योजनेला सुरुवातीपासूनच कर्मचाºयांची संख्या कमी आहे. यामुळे पाण्याचे पैसे भरताना लगेच पावती दिली जात नाही. योजनेच्या लाईनवर अधिकाºयांना फिरता येत नाही. शेतकºयांची मागणी, पैसे गोळा करणे, पावती देणे, पाण्याचे वाटप करणे, शेतक-यांशी संवाद साधणे, पाणीसंस्था उभ्या करणे इत्यादी कामांसाठी कर्मचाºयांची संख्या कमी आहे. ती वाढविण्याची मागणी लाभार्थी गावातील शेतकरी करीत आहेत.

टॅग्स :Puneपुणे