शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
2
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
3
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
4
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
5
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
6
"सरकार निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचे काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
7
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
8
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...
9
धक्कादायक! या डेटिंग ॲपवरून महिलांचे हजारो फोटो लीक, प्रायव्हसी आली धोक्यात
10
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
11
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
12
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
13
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
14
सॉवरेन गोल्ड बाँडची कमाल...! ८ वर्षांत दिला २५०% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
15
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
16
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
17
टेलिव्हिजनवरील या अभिनेत्रीला लागला मोठा जॅकपॉट, रणबीरच्या 'रामायण'मध्ये झाली एन्ट्री
18
हृदयद्रावक! "माझी दोन्ही मुलं गेली, देवाने मला...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
19
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
20
Shravan Somvar 2025: श्रावण सोमवारनिमित्त मित्रांना, नातेवाईकांना पाठवा श्लोकरूपी शुभेच्छा संदेश!

'पुरंदर विमानतळ हे आमच्या प्रेतावरूनच होईल', बी. जी. कोळसे-पाटील यांचा सरकारला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 11:09 IST

जमिनी ताब्यात घ्यायच्या एमआयडीसीच्या माध्यमातून त्या अंबानी-अदानी यांसारख्या उद्योगपतींच्या घशात घालायच्या, हे केंद्राचे काम

सासवड : पुरंदर तालुक्यात होणारे नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ हे शेतकऱ्यांच्या फायद्याचे नसून किंवा त्यांचे विकासाचे नसून हे निव्वळ मोठमोठ्या उद्योगपतींच्या व्यवसायासाठी आहे. राज्यकर्ते आणि पुढारी हे तुम्हाला खरं सांगत नाहीत. हल्लीचे केंद्र सरकार आणि राज्य सरकार देशाचे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांना शेतकऱ्यांच्या विकासाचे काहीही देणे-घेणे नाही, ते बोलतात एक आणि करतात वेगळे. जमिनी ताब्यात घ्यायच्या एमआयडीसीच्या माध्यमातून त्या अंबानी-अदानी यांसारख्या उद्योगपतींच्या घशात घालायच्या. एकदा जमीन गेल्यावर आपल्याला कोणीही विचारणार नाही. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत विमानतळ प्रकल्प होऊ देणार नाही. तरीही सरकार प्रकल्प करणार असेल तर तो आमच्या प्रेतावर जरूर करावे, असा खणखणीत इशारा माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी राज्य सरकारला दिला.

नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळविरोधात पारगाव मेमाणे येथे सातही गावांतील शेतकऱ्यांची निर्धार सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत माजी सरन्यायाधीश बी. जी. कोळसे-पाटील यांनी शेतकऱ्यांना विरोधाच्या लढ्यासाठी भक्कम असा आधार आणि पाठिंबा दिला.

यापूर्वी आम्ही अशाच उद्योगपतींना दिलेल्या मुंबई जवळच्या ४५ गावांच्या जमिनी पुन्हा शेतकऱ्यांना न्यायालयीन लढ्यामार्फत हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट यांच्या माध्यमातून मिळवून दिलेल्या आहेत. पुरंदरच्या विमानतळामुळे येथील सात गावांतील सात हजार एकर जमीन ही गरीब शेतकऱ्यांची काढून त्यांना देशोधडीला लावायचे. माता-भगिनी यांचे प्रपंच उघड्यावर आणायचे आणि पुन्हा त्यांना उसनं अवसान आणून खोट्या पद्धतीने लाडक्या बहिणी म्हणायचे, असा कारभार या राज्यकर्त्यांचा आहे. त्यांना सामान्य गोरगरीब जनतेचे काहीही देणे-घेणे नाही. पुढारी फक्त मते मागायला येतात, पैसे देऊन मते विकत घेतात आणि त्यालाही सामान्य जनता फसते. पुरंदरच्या विमानतळाला जमीन देण्यासाठी येथील सातही गावांतील शेतकऱ्यांचा ठाम विरोध आहे. आणि यासाठी आम्हाला मरण पत्करावे लागले तरी चालेल, आमच्या प्रेतावरून शासनाला विमानतळ करावे लागेल, अशा स्वरूपाची प्रतिज्ञा उपस्थित हजारो शेतकऱ्यांनी बी. जी. कोळसे-पाटील यांच्यासह घेतली.

जमीन खरेदी-विक्री व्यवहारांना बंदी

नुकतेच राज्य शासनाने प्रकल्प बाधित पारगाव, एखतपूर, खानवडी, मुंजवडी, कुंभारवळण, वनपुरी, उदाचीवाडी या गावांतील भूसंपादनाबाबत सर्व्हे नंबर, गट नंबर शेतकऱ्यांच्या नावाचे प्रसिद्ध केल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच या सात गावातील क्षेत्र औद्योगिक क्षेत्र घोषित केल्याने जमिनीवरील खरेदी-विक्रीच्या व्यवहारांना बंदी घातली आहे. येत्या काही दिवसांत जमिनीवर एमआयडीसीचे जमीन अधिग्रहणाचे शिक्के मारण्याची प्रक्रिया शासनस्तरावर सुरू होणार आहे.

टॅग्स :PuneपुणेadvocateवकिलFarmerशेतकरीPurandarपुरंदरAirportविमानतळpassengerप्रवासीCentral Governmentकेंद्र सरकारagitationआंदोलन