शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

'पुरंदर विमानतळ हे आमच्या प्रेतावरूनच होईल', बी. जी. कोळसे-पाटील यांचा सरकारला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 11:09 IST

जमिनी ताब्यात घ्यायच्या एमआयडीसीच्या माध्यमातून त्या अंबानी-अदानी यांसारख्या उद्योगपतींच्या घशात घालायच्या, हे केंद्राचे काम

सासवड : पुरंदर तालुक्यात होणारे नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ हे शेतकऱ्यांच्या फायद्याचे नसून किंवा त्यांचे विकासाचे नसून हे निव्वळ मोठमोठ्या उद्योगपतींच्या व्यवसायासाठी आहे. राज्यकर्ते आणि पुढारी हे तुम्हाला खरं सांगत नाहीत. हल्लीचे केंद्र सरकार आणि राज्य सरकार देशाचे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांना शेतकऱ्यांच्या विकासाचे काहीही देणे-घेणे नाही, ते बोलतात एक आणि करतात वेगळे. जमिनी ताब्यात घ्यायच्या एमआयडीसीच्या माध्यमातून त्या अंबानी-अदानी यांसारख्या उद्योगपतींच्या घशात घालायच्या. एकदा जमीन गेल्यावर आपल्याला कोणीही विचारणार नाही. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत विमानतळ प्रकल्प होऊ देणार नाही. तरीही सरकार प्रकल्प करणार असेल तर तो आमच्या प्रेतावर जरूर करावे, असा खणखणीत इशारा माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी राज्य सरकारला दिला.

नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळविरोधात पारगाव मेमाणे येथे सातही गावांतील शेतकऱ्यांची निर्धार सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत माजी सरन्यायाधीश बी. जी. कोळसे-पाटील यांनी शेतकऱ्यांना विरोधाच्या लढ्यासाठी भक्कम असा आधार आणि पाठिंबा दिला.

यापूर्वी आम्ही अशाच उद्योगपतींना दिलेल्या मुंबई जवळच्या ४५ गावांच्या जमिनी पुन्हा शेतकऱ्यांना न्यायालयीन लढ्यामार्फत हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट यांच्या माध्यमातून मिळवून दिलेल्या आहेत. पुरंदरच्या विमानतळामुळे येथील सात गावांतील सात हजार एकर जमीन ही गरीब शेतकऱ्यांची काढून त्यांना देशोधडीला लावायचे. माता-भगिनी यांचे प्रपंच उघड्यावर आणायचे आणि पुन्हा त्यांना उसनं अवसान आणून खोट्या पद्धतीने लाडक्या बहिणी म्हणायचे, असा कारभार या राज्यकर्त्यांचा आहे. त्यांना सामान्य गोरगरीब जनतेचे काहीही देणे-घेणे नाही. पुढारी फक्त मते मागायला येतात, पैसे देऊन मते विकत घेतात आणि त्यालाही सामान्य जनता फसते. पुरंदरच्या विमानतळाला जमीन देण्यासाठी येथील सातही गावांतील शेतकऱ्यांचा ठाम विरोध आहे. आणि यासाठी आम्हाला मरण पत्करावे लागले तरी चालेल, आमच्या प्रेतावरून शासनाला विमानतळ करावे लागेल, अशा स्वरूपाची प्रतिज्ञा उपस्थित हजारो शेतकऱ्यांनी बी. जी. कोळसे-पाटील यांच्यासह घेतली.

जमीन खरेदी-विक्री व्यवहारांना बंदी

नुकतेच राज्य शासनाने प्रकल्प बाधित पारगाव, एखतपूर, खानवडी, मुंजवडी, कुंभारवळण, वनपुरी, उदाचीवाडी या गावांतील भूसंपादनाबाबत सर्व्हे नंबर, गट नंबर शेतकऱ्यांच्या नावाचे प्रसिद्ध केल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच या सात गावातील क्षेत्र औद्योगिक क्षेत्र घोषित केल्याने जमिनीवरील खरेदी-विक्रीच्या व्यवहारांना बंदी घातली आहे. येत्या काही दिवसांत जमिनीवर एमआयडीसीचे जमीन अधिग्रहणाचे शिक्के मारण्याची प्रक्रिया शासनस्तरावर सुरू होणार आहे.

टॅग्स :PuneपुणेadvocateवकिलFarmerशेतकरीPurandarपुरंदरAirportविमानतळpassengerप्रवासीCentral Governmentकेंद्र सरकारagitationआंदोलन