शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

शॉर्टकटसाठी पुणेकरांची पसंती ‘उलटे’ येण्याला..

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2018 02:08 IST

गेल्या आठवड्यामध्ये बिबवेवाडीतील भारत ज्योती बस थांब्याजवळ अशाच प्रकारे आॅटोरिक्षा आणि मोटारीचा अपघात झाला.

लक्ष्मण मोरे

पुणे : वाहतूक नियमांचे पालन आणि पुणेकर यांचा तसा ३६चा आकडा आहे, हे काही नवे नाही; मात्र अलीकडच्या काळात वाहनचालक ‘शॉर्टकट’ मारण्यासाठी सरळ नो एंट्रीमध्ये घुसतात; तसेच विरुद्ध बाजूने जाण्याच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. काही वाहनचालकांची ही बेदरकारी जिवावर बेतू लागली आहे. गेल्या तीन वर्षांत वाहतूक पोलिसांनी केलेल्या या दोन्ही प्रकारच्या एकूण ४ लाख २३ हजार २९० कारवायांमध्ये ७ कोटी ३६ लाख ७९ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

गेल्या आठवड्यामध्ये बिबवेवाडीतील भारत ज्योती बस थांब्याजवळ अशाच प्रकारे आॅटोरिक्षा आणि मोटारीचा अपघात झाला. या अपघातात मोटारीने दिलेल्या धडकेत आॅटोरिक्षामधील सीएनजी गॅसने पेट घेतला. या आगीमध्ये रिक्षाचालक आणि एक प्रवासी भाजल्याने गंभीर जखमी झाले होते. रिक्षाचालक किशोर नरके (वय २७, रा. पर्वती) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रवाशाच्या फिर्यादीवरून मोटारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चालकाची एक चूक जिवावर बेतली आहे. वाहनचालकांमध्ये वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत असलेली उदासीनता अपघातांना निमंत्रण देत आहे.राज्याचे तत्कालीन पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी राज्यभरात विरुद्ध बाजूने येणाऱ्या आणि नो एंट्रीमध्ये वाहन घालणाºया वाहनचालकांविरुद्ध मोहीम उघडली होती. अशा नियमभंग करणाºया वाहनचालकांविरुद्ध सक्त कारवाईचे आदेशही त्यांनी दिलेले होते. या कारवाईमुळे मोठ्या प्रमाणावर फरकही पडला होता; मात्र अलीकडे कारवाई थंडावल्याने पुणे शहरामध्ये जागोजाग वाहनचालक विरुद्ध बाजूने येण्याचे प्रमाण वाढले आहे. याकडे वाहतूक शाखेने गांभीर्याने लक्ष घालणे आवश्यक आहे. विरुद्ध बाजूने येण्याला दुचाकी, तीनचाकी, ट्रक, बस, मोटारी कोणत्याही वाहनाचा अपवाद राहिलेला नाही. पुणे शहरातील बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता, कर्वे रस्ता, नगर रस्ता, सातारा रस्ता अशा महत्त्वाच्या रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवरही विरुद्ध बाजूने वाहन दामटविण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. या वाहनचालकांना जाब विचारण्याचा प्रयत्न केल्यास उलट त्यांच्याच दमदाटीचा सर्वसामान्यांना सामना करावा लागतो. अनेकदा पोलीस समोर असूनही हे प्रकार घडतात. त्याकडेही दुर्लक्ष केले जाते. वास्तविक नियमांचे पालन करणाºया वाहनचालकांना संरक्षण देण्यासोबतच दोषी वाहनचालकांवर कारवाई करणे आवश्यक आहे.शासन आणि प्रशासनाचे वाहतूकविषयक धोरण उदासीन आहे. ‘आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी’ असं काहीसं चित्र आहे. पोलीस, महापालिका यांसह नागरिकांमध्येही उदासीनता आहे. वाहतूक संस्कृती रुजविण्याची आवश्यकता आहे. उलट नियमभंगाला प्रोत्साहन मिळेल अशीच स्थिती सध्या आहे. विरुद्ध बाजूने येणारे आणि नो एंट्रीमधून येणाºया वाहनचालकांमुळे अनेकदा अपघात घडतात; मात्र त्याकडे पोलीस दुर्लक्ष करतात. लोकांना शिस्त लागू शकते; मात्र त्यासाठी कारवाईसोबतच प्रभावी प्रबोधनाची आवश्यकता आहे.- जुगल राठी, वाहतूक प्रश्नाचे अभ्यासकरस्त्यावर घडत असलेल्या अपघातांमध्ये बेशिस्तीमुळे सर्वाधिक अपघात घडतात. त्यामध्ये सर्वाधिक प्रमाण विरुद्ध बाजूने येणाºया वाहनांमुळे घडतात. सरळ जाणाºया वाहनचालकाला अचानक विरुद्ध बाजूने आल्यास सावरता येत नाही. वाहनावरील ताबा सुटतो. अलीकडे लोकांची भावना मीच ठरवणार कुठून जायचे ते, अशी झालेली आहे. द्रुतगती मार्ग, एमआयडीसी जवळील महामार्ग, राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांवर विरुद्ध बाजूने येणाºयांचे प्रमाण खूप आहे. राज्यामध्ये सरासरी दररोज ३५ लोकांचा अपघातात मृत्यू होतो. त्यामुळेच महासंचालक असताना विरुद्ध बाजुने येणाºयांविरुद्ध मोहिम उघडली होती.- प्रवीण दीक्षित,माजी पोलीस महासंचालकसहन करावी लागते वाहनचालकांची अरेरावी1विरुद्ध बाजूने आलेल्या किंवानो एंट्रीमधून आलेल्या वाहनचालकांना सरळ येणाºया वाहनचालकांनी जाब विचारल्यास दोषी वाहनचालकांच्या अरेरावीचा सामना करावा लागतो. अनेकदा यामुळे रस्त्यावरच किरकोळ स्वरूपाचे वाद उद्भवल्याचेहीपाहायला मिळते. त्यामुळे याबद्दल काही बोलायचे की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.2चौकातील वाहतूक पोलिसांकडे गेल्यास ‘तुमचे तुम्ही पाहून घ्या’ अशी उत्तरे मिळत असल्याचा अनुभव वाहनचालकांना येतो. त्यामुळे यावर अंकुश कसा येणार, असा प्रश्न आहे. शाळा-महाविद्यालये, दवाखाने, स्थानिक मंडई, मार्केट आणि शासकीय कार्यालयांजवळील रस्त्यांवर विरुद्ध बाजुने येण्याचे प्रमाण अधिक आहे.

टॅग्स :Puneपुणे