शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
2
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
3
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
4
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
5
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
6
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
7
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
8
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
9
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
10
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
11
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
12
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
13
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
15
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
16
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
17
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
18
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
19
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
20
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
Daily Top 2Weekly Top 5

शहरासाठी सगळ्यात गंभीर आव्हान मादक द्रव्यांचा विळखा : माधव भांडारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2025 12:48 IST

- आपल्या पुढच्या पिढ्या बर्बाद होत आहेत, त्याच्याविरोधात लढा देण्याची गरज आहे

पुणे बदल हा काळानुरूप होतच असतो. १०० वर्षांपूर्वीचे पुणे आणि आजचे पुणे हे बदललेले दिसणारच. बदल होणे यात गैर काही नाही. कधी बदल आपल्या मनासारखा होतो, तर कधी होत नाही. आज शहरासाठी बोलायचे झाले तर सगळ्यात गंभीर आव्हान म्हणजे मादक द्रव्यांचा पडलेला विळखा, हे आहे. आपल्या पुढच्या पिढ्या बर्बाद होत आहेत, त्याच्याविरोधात लढा देण्याची गरज आहे, असे मत भाजपचे ज्येष्ठ नेते माधव भांडारी यांनी व्यक्त केले.वेध अस्वस्थ मनाचा, आपण अनुभवलेले पुणे-महाराष्ट्र? आणि मरणावस्थेत, हरवत चाललेले पुणे-महाराष्ट्र या विषयावर शनिवारी (दि. १५) आयाेजिलेल्या चर्चासत्रात ते बाेलत हाेते. याप्रसंगी पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल, सूर्यकांत पाठक, अंकुश काकडे आणि गणेश शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. पराग ठाकूर, शिरीष मोहिते आणि उदय जगताप यांनी या चर्चासत्राचे आयोजन केले होते.भांडारी म्हणाले की, भारतीय संस्कृती, वातावरण आज बदलत चालले आहे. एखाद्या दुसऱ्या राजकीय पक्षाच्या व्यक्तीच्या मुला-मुलीच्या लग्नाला जायचे की नाही, असा प्रश्न पडतो. शहरात प्रामुख्याने उत्तर भारतीय मुले-मुली शिकण्यासाठी विविध खासगी महाविद्यालयांत येतात. त्यांना शिक्षण सोडून आई-बापाच्या पैशांवर मजा करायची असते. या वर्गामुळे अनेक समस्या उद्भवत आहेत. त्यावर उपाय म्हणून शहरातील खासगी शिक्षण संस्थांच्या प्रमुखांना एकत्र आणून चर्चा घडवणे गरजेचे आहे.अंकुश काकडे म्हणाले की, आपण एखाद्या गावाचा, शहराचा विकास खूप मोठा झाला की आनंदी, समाधानी असतो; पण पुणेकर समाधानी आहेत का? असा उपहासात्मक प्रश्न उपस्थित केला. पूर्वी आम्ही रस्त्यावर कबड्डी खेळायचो, घरासमोर ओट्यावर बसायचो. आता घरातून बाहेर पडल्यावर रस्ता ओलांडण्यासाठी १० मिनिटे लागतात, अशी आपली दुरवस्था झाली आहे. याला कोणती एक सरकारी यंत्रणा जबाबदार नाही, तर आपण सगळे दोषी आहोत.उपायुक्त गिल म्हणाले की, आज अल्पवयीन गुन्हेगारांचे प्रमाण वाढले आहे. मुलाच्या दप्तरात कोयता सापडतो त्यावेळी त्याचे दप्तर तपासायचे कुणी पालकांनी, शिक्षकांनी की पोलिसांनी? हे महत्त्वाचे आहे. आई ओरडली म्हणून मुले घर सोडून जातात, याचे कारण पिढीतील अंतर हे आहे. यासाठी पालकांनी मुलांचे चांगले मित्र बनणे गरजेचे आहे. पाल्याला विश्वासात घेऊन त्याच्याशी संवाद साधणे गरजेचे आहे. मुलाची संगत कुणाशी आहे. याची माहिती घेणे गरजेचे आहे. शहरातील श्रीमंतांनी एकत्र येऊन गरिबांसाठी त्यांच्या मुलांसाठी काही ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे.सूर्यकांत पाठक म्हणाले की, गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिलेला नाही. पुण्याची संस्कृती बिघडवायला बाहेरून आलेले लोक कारणीभूत आहे. गणेश शिंदे म्हणाले की, वक्त्यांमध्येदेखील स्पर्धा लागली आहे. ते मुळात स्वत:पासून सुधारणा करण्याची गरज आहे. इतिहासाकडे बघताना त्यांनी, ज्याप्रमाणे चारचाकी वाहनात समोर बघण्यासाठी मोठी काच असते आणि मागे बघण्यासाठी छोटा आरसा असतो त्याप्रमाणे छोट्या आरशात दिसेल तेवढेच इतिहासाकडे बघितले पाहिजे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिस