शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
3
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
4
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
5
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
6
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
7
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
8
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
9
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
10
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
11
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
12
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
13
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
14
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
15
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
16
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
17
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
18
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
19
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
20
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश

शहरासाठी सगळ्यात गंभीर आव्हान मादक द्रव्यांचा विळखा : माधव भांडारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2025 12:48 IST

- आपल्या पुढच्या पिढ्या बर्बाद होत आहेत, त्याच्याविरोधात लढा देण्याची गरज आहे

पुणे बदल हा काळानुरूप होतच असतो. १०० वर्षांपूर्वीचे पुणे आणि आजचे पुणे हे बदललेले दिसणारच. बदल होणे यात गैर काही नाही. कधी बदल आपल्या मनासारखा होतो, तर कधी होत नाही. आज शहरासाठी बोलायचे झाले तर सगळ्यात गंभीर आव्हान म्हणजे मादक द्रव्यांचा पडलेला विळखा, हे आहे. आपल्या पुढच्या पिढ्या बर्बाद होत आहेत, त्याच्याविरोधात लढा देण्याची गरज आहे, असे मत भाजपचे ज्येष्ठ नेते माधव भांडारी यांनी व्यक्त केले.वेध अस्वस्थ मनाचा, आपण अनुभवलेले पुणे-महाराष्ट्र? आणि मरणावस्थेत, हरवत चाललेले पुणे-महाराष्ट्र या विषयावर शनिवारी (दि. १५) आयाेजिलेल्या चर्चासत्रात ते बाेलत हाेते. याप्रसंगी पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल, सूर्यकांत पाठक, अंकुश काकडे आणि गणेश शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. पराग ठाकूर, शिरीष मोहिते आणि उदय जगताप यांनी या चर्चासत्राचे आयोजन केले होते.भांडारी म्हणाले की, भारतीय संस्कृती, वातावरण आज बदलत चालले आहे. एखाद्या दुसऱ्या राजकीय पक्षाच्या व्यक्तीच्या मुला-मुलीच्या लग्नाला जायचे की नाही, असा प्रश्न पडतो. शहरात प्रामुख्याने उत्तर भारतीय मुले-मुली शिकण्यासाठी विविध खासगी महाविद्यालयांत येतात. त्यांना शिक्षण सोडून आई-बापाच्या पैशांवर मजा करायची असते. या वर्गामुळे अनेक समस्या उद्भवत आहेत. त्यावर उपाय म्हणून शहरातील खासगी शिक्षण संस्थांच्या प्रमुखांना एकत्र आणून चर्चा घडवणे गरजेचे आहे.अंकुश काकडे म्हणाले की, आपण एखाद्या गावाचा, शहराचा विकास खूप मोठा झाला की आनंदी, समाधानी असतो; पण पुणेकर समाधानी आहेत का? असा उपहासात्मक प्रश्न उपस्थित केला. पूर्वी आम्ही रस्त्यावर कबड्डी खेळायचो, घरासमोर ओट्यावर बसायचो. आता घरातून बाहेर पडल्यावर रस्ता ओलांडण्यासाठी १० मिनिटे लागतात, अशी आपली दुरवस्था झाली आहे. याला कोणती एक सरकारी यंत्रणा जबाबदार नाही, तर आपण सगळे दोषी आहोत.उपायुक्त गिल म्हणाले की, आज अल्पवयीन गुन्हेगारांचे प्रमाण वाढले आहे. मुलाच्या दप्तरात कोयता सापडतो त्यावेळी त्याचे दप्तर तपासायचे कुणी पालकांनी, शिक्षकांनी की पोलिसांनी? हे महत्त्वाचे आहे. आई ओरडली म्हणून मुले घर सोडून जातात, याचे कारण पिढीतील अंतर हे आहे. यासाठी पालकांनी मुलांचे चांगले मित्र बनणे गरजेचे आहे. पाल्याला विश्वासात घेऊन त्याच्याशी संवाद साधणे गरजेचे आहे. मुलाची संगत कुणाशी आहे. याची माहिती घेणे गरजेचे आहे. शहरातील श्रीमंतांनी एकत्र येऊन गरिबांसाठी त्यांच्या मुलांसाठी काही ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे.सूर्यकांत पाठक म्हणाले की, गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिलेला नाही. पुण्याची संस्कृती बिघडवायला बाहेरून आलेले लोक कारणीभूत आहे. गणेश शिंदे म्हणाले की, वक्त्यांमध्येदेखील स्पर्धा लागली आहे. ते मुळात स्वत:पासून सुधारणा करण्याची गरज आहे. इतिहासाकडे बघताना त्यांनी, ज्याप्रमाणे चारचाकी वाहनात समोर बघण्यासाठी मोठी काच असते आणि मागे बघण्यासाठी छोटा आरसा असतो त्याप्रमाणे छोट्या आरशात दिसेल तेवढेच इतिहासाकडे बघितले पाहिजे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिस