शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

शहरासाठी सगळ्यात गंभीर आव्हान मादक द्रव्यांचा विळखा : माधव भांडारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2025 12:48 IST

- आपल्या पुढच्या पिढ्या बर्बाद होत आहेत, त्याच्याविरोधात लढा देण्याची गरज आहे

पुणे बदल हा काळानुरूप होतच असतो. १०० वर्षांपूर्वीचे पुणे आणि आजचे पुणे हे बदललेले दिसणारच. बदल होणे यात गैर काही नाही. कधी बदल आपल्या मनासारखा होतो, तर कधी होत नाही. आज शहरासाठी बोलायचे झाले तर सगळ्यात गंभीर आव्हान म्हणजे मादक द्रव्यांचा पडलेला विळखा, हे आहे. आपल्या पुढच्या पिढ्या बर्बाद होत आहेत, त्याच्याविरोधात लढा देण्याची गरज आहे, असे मत भाजपचे ज्येष्ठ नेते माधव भांडारी यांनी व्यक्त केले.वेध अस्वस्थ मनाचा, आपण अनुभवलेले पुणे-महाराष्ट्र? आणि मरणावस्थेत, हरवत चाललेले पुणे-महाराष्ट्र या विषयावर शनिवारी (दि. १५) आयाेजिलेल्या चर्चासत्रात ते बाेलत हाेते. याप्रसंगी पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल, सूर्यकांत पाठक, अंकुश काकडे आणि गणेश शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. पराग ठाकूर, शिरीष मोहिते आणि उदय जगताप यांनी या चर्चासत्राचे आयोजन केले होते.भांडारी म्हणाले की, भारतीय संस्कृती, वातावरण आज बदलत चालले आहे. एखाद्या दुसऱ्या राजकीय पक्षाच्या व्यक्तीच्या मुला-मुलीच्या लग्नाला जायचे की नाही, असा प्रश्न पडतो. शहरात प्रामुख्याने उत्तर भारतीय मुले-मुली शिकण्यासाठी विविध खासगी महाविद्यालयांत येतात. त्यांना शिक्षण सोडून आई-बापाच्या पैशांवर मजा करायची असते. या वर्गामुळे अनेक समस्या उद्भवत आहेत. त्यावर उपाय म्हणून शहरातील खासगी शिक्षण संस्थांच्या प्रमुखांना एकत्र आणून चर्चा घडवणे गरजेचे आहे.अंकुश काकडे म्हणाले की, आपण एखाद्या गावाचा, शहराचा विकास खूप मोठा झाला की आनंदी, समाधानी असतो; पण पुणेकर समाधानी आहेत का? असा उपहासात्मक प्रश्न उपस्थित केला. पूर्वी आम्ही रस्त्यावर कबड्डी खेळायचो, घरासमोर ओट्यावर बसायचो. आता घरातून बाहेर पडल्यावर रस्ता ओलांडण्यासाठी १० मिनिटे लागतात, अशी आपली दुरवस्था झाली आहे. याला कोणती एक सरकारी यंत्रणा जबाबदार नाही, तर आपण सगळे दोषी आहोत.उपायुक्त गिल म्हणाले की, आज अल्पवयीन गुन्हेगारांचे प्रमाण वाढले आहे. मुलाच्या दप्तरात कोयता सापडतो त्यावेळी त्याचे दप्तर तपासायचे कुणी पालकांनी, शिक्षकांनी की पोलिसांनी? हे महत्त्वाचे आहे. आई ओरडली म्हणून मुले घर सोडून जातात, याचे कारण पिढीतील अंतर हे आहे. यासाठी पालकांनी मुलांचे चांगले मित्र बनणे गरजेचे आहे. पाल्याला विश्वासात घेऊन त्याच्याशी संवाद साधणे गरजेचे आहे. मुलाची संगत कुणाशी आहे. याची माहिती घेणे गरजेचे आहे. शहरातील श्रीमंतांनी एकत्र येऊन गरिबांसाठी त्यांच्या मुलांसाठी काही ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे.सूर्यकांत पाठक म्हणाले की, गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिलेला नाही. पुण्याची संस्कृती बिघडवायला बाहेरून आलेले लोक कारणीभूत आहे. गणेश शिंदे म्हणाले की, वक्त्यांमध्येदेखील स्पर्धा लागली आहे. ते मुळात स्वत:पासून सुधारणा करण्याची गरज आहे. इतिहासाकडे बघताना त्यांनी, ज्याप्रमाणे चारचाकी वाहनात समोर बघण्यासाठी मोठी काच असते आणि मागे बघण्यासाठी छोटा आरसा असतो त्याप्रमाणे छोट्या आरशात दिसेल तेवढेच इतिहासाकडे बघितले पाहिजे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिस