शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

अनेक वर्षांपासून अडकलेले शेतकऱ्यांचे रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास

By नितीन चौधरी | Updated: March 16, 2025 14:01 IST

जिल्ह्यात गेल्या महिनाभरात १४६ किलोमीटरचे ११७ रस्ते खुले करण्यात आले

पुणे : शेतजमिनींमधील बंद झालेले वहिवाटीचे रस्ते मोकळे करण्यासंदर्भात तहसीलदारांचे अधिकार आता नायब तहसीलदारांनादेखील देण्याचा निर्णय जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी घेतला आहे. त्यामुळे रस्त्यांच्या प्रकरणांवर जलदगतीने सुनावणी होऊन ते शेतकऱ्यांना वहिवाटीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून अडकलेले रस्ते जिल्हा प्रशासनाने खुले केले आहेत. जिल्ह्यात गेल्या महिनाभरात १४६ किलोमीटरचे ११७ रस्ते खुले करण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

ब्रिटिश काळात पारंपरिक वहिवाटीत असलेले रस्ते नकाशांवर आणण्यात आले. त्यानंतर आतापर्यंत अशा रस्त्यांना नकाशावर स्थान मिळालेले नाही. पूर्वी जमिनींना व्यावसायिक दर नव्हता. जमीनमालकदेखील वहिवाटीत असणाऱ्या रस्त्यांचा शेजारील शेतकऱ्यांना सहज वापर करू देत होते. कालांतराने जमिनींचे भाव गगनाला भिडल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातून जाणारे रस्ते बंद केले. या संदर्भात प्रत्यक्ष रस्त्याचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे तक्रारी दाखल केल्या. मात्र, काही प्रकरणे न्यायालयात असल्याने तहसीलदारांनाही त्यात निर्णय देता येत नाही.

राज्य सरकारच्या मामलेदार कोर्ट १९०५च्या कायद्यातील कलम ५ नुसार तहसीलदारांनी अशा प्रकरणांमध्ये निर्णय घेणे अपेक्षित असते. तहसीलदारांकडील कार्यभार बघता त्यांना अशा प्रकरणांमध्ये सुनावणी घेण्यास बराच अवधी लागत असल्याचे दिसून आले. त्यामुळेच जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांच्या या अधिकाराचे विकेंद्रीकरण करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार आता हे अधिकार तहसीलदारांसह नायब तहसीलदारांनादेखील देण्यात आले आहेत. त्यामुळे रस्ते अडवणुकी संदर्भातील प्रकरणे वेगाने मार्गी लागणार आहेत.

नकाशातील रस्त्यांसंदर्भात तक्रारी असल्यास भूमिअभिलेख अधिकार विभागाकडून त्याची मोजणी केली जाते. एक व दोन बिंदू रस्ता असल्यास हा रस्ता संबंधित जमीनमालकाच्या मूळ क्षेत्रातच मोजला जातो. मात्र, दोन रेषांनी दाखविण्यात आलेला रस्ता संबंधित सर्व्हे क्रमांकाच्या व्यतिरिक्त क्षेत्रात मोजला जातो. भूमिअभिलेख विभागाने अशा स्वरूपाची मोजणी केल्यानंतर रस्त्याची प्रत्यक्ष लांबी रुंदी कळते. एखादा शेतकरी प्रत्यक्ष शेतातून रस्ता देण्यास असहमत असल्यास त्याच्या बांधावरून रस्त्याची आखणी केली जाते. अशा प्रकरणांमध्ये संबंधित शेतकरी व व गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी एकत्रित घेऊन त्यावर तोडगा काढण्याचे काम तहसीलदार करत असतात. 

तहसीलदार अशी सर्व प्रकरणे चालवू शकत नसल्याने आता नायब तहसीलदारांनादेखील अशी प्रकरणे चालवण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांनी प्रदान केले आहे. - नामदेव टिळेकर, उपजिल्हाधिकारी, कुळकायदा शाखा

सरकारच्या शंभर दिवसांच्या कार्यक्रमांमध्ये ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय वहिवाटीचा रस्ता आहे. असे रस्ते खुले करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. - सुहास मापारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी 

तहसीलदार-- रस्त्यांची संख्या-- लांबी (किमी)

आंबेगाव ४--४.४३

इंदापूर १२--२१

खेड २१--१६.८५

जुन्नर ८--८

दौंड ५--५.८

बारामती १०--६.३

भोर ८--९

मावळ १४--२३.८

मुळशी ८--८

शिरूर १५--३७

लोणी काळभोर--६--३

हवेली ३--३

वेल्हे--३--३.८

एकूण ११७--१४५.९८

 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रAgriculture Schemeकृषी योजनाAgriculture Sectorशेती क्षेत्रAgricultural Science Centerकृषी विज्ञान केंद्र