शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
2
स्कुबा डायव्हिंग करताना ५२ वर्षीय प्रसिद्ध गायकाचा मृत्यू, चाहत्यांना मोठा धक्का
3
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
4
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
5
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
6
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
7
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
8
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
9
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
10
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
11
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
12
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
13
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
14
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
15
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
16
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
17
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
18
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
19
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
20
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती

पुण्याला ८१ दिवसासाठी उरले ७ टीएमसी पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2019 20:27 IST

पुणे महापालिका आणि जलसंपदा विभाग यांच्यातील पाणी कराराची मुदत संपुष्टात आली आहे..

ठळक मुद्देकाटकसरीने पाणी वापरावे; जलसंपदा विभागाचे पालिकेला पत्रकालवा समितीच्या बैठकीत पालिकेला येत्या १५ जुलैपर्यंत १३५० एमएलडी पाणी देण्याचा निर्णय पुढील अडीच महिन्यात सुमारे अर्धा टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन होण्याची शक्यता

पुणे: महापालिका परिसर व जिल्ह्यातील काही ग्रामीण भागाला पाणी पुरवठा करणा-या खडकवासला धरणात प्रकल्पात ७.०८ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध असून जलसंपदा विभागाने येत्या १५ जुलैपर्यंत पाण्याचे नियोजन केले आहे. परिणामी पुढील ८१ दिवसांसाठी आता केवळ सात टीएमसी पाणी उरले आहेत. पालिका प्रशासनाने अजूनही पाणीवापराबाबत काटकसर सुरू केलेली नाही.त्यातच पालिकेने उन्हाळ्यात पाणी जपून वापरावे, असे पत्र जलसंपदा विभागातर्फे पालिकेला पाठविण्यात आले आहे.त्यामुळे धरणातील उपलब्ध पाणी पुरणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.पुणे महापालिका आणि जलसंपदा विभाग यांच्यातील पाणी कराराची मुदत संपुष्टात आली आहे.तरीही जलसंपदा विभागाकडून पालिकेला मंजूर क्षमतेपेक्षा अधिक पाणी दिले जात आहे. जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांच्या उपस्थितीत झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत पालिकेला येत्या १५ जुलैपर्यंत १३५० एमएलडी पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे पालिका परिसरात कोणतीही पाणी कपात न करता पाणी दिले जात आहे.तसेच शेतीसाठी सुध्दा गेल्या १४ दिवसापासून पाणी सोडण्यात आले असून एकूण २.६८ टीएमसी पाणी सोडले जाणार आहे. आत्तापर्यंत सुमारे १.४५ टीएमसी पाणी कालव्यातून ग्रामीण भागापर्यंत दिले गेले असून अजूनही १.५ टीएमसी पाणी सोडले जाणार आहे. त्याचप्रमाणे पुढील अडीच महिन्यात सुमारे अर्धा टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन होण्याची शक्यता असल्याने पालिकेने उपलब्ध पाणी काटकसरीने वापरण्याची आवश्यकता आहे.त्यामुळेच पालिकेने महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या नियमावलीनुसार पाणी वापरावे,असे पत्र जलसंपदा विभागातर्फे पालिकेला पाठविण्यात आले आहे.सध्या खडकवासला धरण प्रकल्पात केवळ ७ टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून पालिकेला १३५० एमएलडी पाणी देण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीने घेतला आहे. मात्र, पालिकेकडून १४०० ते १४५५ एमएलडी पाण्याचा वापर केला जात आहे.परंतु,पालिकेने अधिकचे पाणी वापरले तर येत्या १५ जुलैपर्यंत नागरिकांना पाणी पुरवणे कठिण जाणार आहे.त्यामुळे पालिकेने आत्तापासूनच काटकसरीने पाणी वापरणे गरजेचे आहे.--------------------खडकवासला धरण प्रकल्पात सध्या ७ टीएमसी एवढा साठा असून पुढील ८१ दिवस पुण्याताला सुमारे ४ टीएमसी पाण्याची आवश्यकता भासणार आहे.तसेच ग्रामीण भागासाठी सोडण्यात आलेले पाणी इंदापूरपर्यंत पोहचले असून आता दौंड भागात शेतीसाठी पाणी दिले जात आहे.त्यामुळे अजून दीड टीएमसी पाणी द्यावे लागणार असल्याने धरणातील ५.५ टीएमसी पाणीसंपणार आहे.तसेच अर्धा टीएमसी पाणी बाष्पिभवनात जाणार असल्याने येत्या १५ जुलैपर्यंत धरणातील ६.५ टीएमसी पाणी संपेल.मात्र,१३५० एमएलडी पाणी वापर झाला तरच हे शक्य आहे.परंतु,सध्या पालिकेकडून १४५० पेक्षा जास्त पाणी वापर केला जात असल्याने पाऊस लांबल्यास पाण्याचा तुटवडा जाणवणार आहे.

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका