शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याला ८१ दिवसासाठी उरले ७ टीएमसी पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2019 20:27 IST

पुणे महापालिका आणि जलसंपदा विभाग यांच्यातील पाणी कराराची मुदत संपुष्टात आली आहे..

ठळक मुद्देकाटकसरीने पाणी वापरावे; जलसंपदा विभागाचे पालिकेला पत्रकालवा समितीच्या बैठकीत पालिकेला येत्या १५ जुलैपर्यंत १३५० एमएलडी पाणी देण्याचा निर्णय पुढील अडीच महिन्यात सुमारे अर्धा टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन होण्याची शक्यता

पुणे: महापालिका परिसर व जिल्ह्यातील काही ग्रामीण भागाला पाणी पुरवठा करणा-या खडकवासला धरणात प्रकल्पात ७.०८ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध असून जलसंपदा विभागाने येत्या १५ जुलैपर्यंत पाण्याचे नियोजन केले आहे. परिणामी पुढील ८१ दिवसांसाठी आता केवळ सात टीएमसी पाणी उरले आहेत. पालिका प्रशासनाने अजूनही पाणीवापराबाबत काटकसर सुरू केलेली नाही.त्यातच पालिकेने उन्हाळ्यात पाणी जपून वापरावे, असे पत्र जलसंपदा विभागातर्फे पालिकेला पाठविण्यात आले आहे.त्यामुळे धरणातील उपलब्ध पाणी पुरणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.पुणे महापालिका आणि जलसंपदा विभाग यांच्यातील पाणी कराराची मुदत संपुष्टात आली आहे.तरीही जलसंपदा विभागाकडून पालिकेला मंजूर क्षमतेपेक्षा अधिक पाणी दिले जात आहे. जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांच्या उपस्थितीत झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत पालिकेला येत्या १५ जुलैपर्यंत १३५० एमएलडी पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे पालिका परिसरात कोणतीही पाणी कपात न करता पाणी दिले जात आहे.तसेच शेतीसाठी सुध्दा गेल्या १४ दिवसापासून पाणी सोडण्यात आले असून एकूण २.६८ टीएमसी पाणी सोडले जाणार आहे. आत्तापर्यंत सुमारे १.४५ टीएमसी पाणी कालव्यातून ग्रामीण भागापर्यंत दिले गेले असून अजूनही १.५ टीएमसी पाणी सोडले जाणार आहे. त्याचप्रमाणे पुढील अडीच महिन्यात सुमारे अर्धा टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन होण्याची शक्यता असल्याने पालिकेने उपलब्ध पाणी काटकसरीने वापरण्याची आवश्यकता आहे.त्यामुळेच पालिकेने महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या नियमावलीनुसार पाणी वापरावे,असे पत्र जलसंपदा विभागातर्फे पालिकेला पाठविण्यात आले आहे.सध्या खडकवासला धरण प्रकल्पात केवळ ७ टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून पालिकेला १३५० एमएलडी पाणी देण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीने घेतला आहे. मात्र, पालिकेकडून १४०० ते १४५५ एमएलडी पाण्याचा वापर केला जात आहे.परंतु,पालिकेने अधिकचे पाणी वापरले तर येत्या १५ जुलैपर्यंत नागरिकांना पाणी पुरवणे कठिण जाणार आहे.त्यामुळे पालिकेने आत्तापासूनच काटकसरीने पाणी वापरणे गरजेचे आहे.--------------------खडकवासला धरण प्रकल्पात सध्या ७ टीएमसी एवढा साठा असून पुढील ८१ दिवस पुण्याताला सुमारे ४ टीएमसी पाण्याची आवश्यकता भासणार आहे.तसेच ग्रामीण भागासाठी सोडण्यात आलेले पाणी इंदापूरपर्यंत पोहचले असून आता दौंड भागात शेतीसाठी पाणी दिले जात आहे.त्यामुळे अजून दीड टीएमसी पाणी द्यावे लागणार असल्याने धरणातील ५.५ टीएमसी पाणीसंपणार आहे.तसेच अर्धा टीएमसी पाणी बाष्पिभवनात जाणार असल्याने येत्या १५ जुलैपर्यंत धरणातील ६.५ टीएमसी पाणी संपेल.मात्र,१३५० एमएलडी पाणी वापर झाला तरच हे शक्य आहे.परंतु,सध्या पालिकेकडून १४५० पेक्षा जास्त पाणी वापर केला जात असल्याने पाऊस लांबल्यास पाण्याचा तुटवडा जाणवणार आहे.

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका