शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
6
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
7
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
8
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
9
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
10
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
11
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
12
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
13
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
14
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
15
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
16
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
17
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
18
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
19
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा

पुण्याला ८१ दिवसासाठी उरले ७ टीएमसी पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2019 20:27 IST

पुणे महापालिका आणि जलसंपदा विभाग यांच्यातील पाणी कराराची मुदत संपुष्टात आली आहे..

ठळक मुद्देकाटकसरीने पाणी वापरावे; जलसंपदा विभागाचे पालिकेला पत्रकालवा समितीच्या बैठकीत पालिकेला येत्या १५ जुलैपर्यंत १३५० एमएलडी पाणी देण्याचा निर्णय पुढील अडीच महिन्यात सुमारे अर्धा टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन होण्याची शक्यता

पुणे: महापालिका परिसर व जिल्ह्यातील काही ग्रामीण भागाला पाणी पुरवठा करणा-या खडकवासला धरणात प्रकल्पात ७.०८ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध असून जलसंपदा विभागाने येत्या १५ जुलैपर्यंत पाण्याचे नियोजन केले आहे. परिणामी पुढील ८१ दिवसांसाठी आता केवळ सात टीएमसी पाणी उरले आहेत. पालिका प्रशासनाने अजूनही पाणीवापराबाबत काटकसर सुरू केलेली नाही.त्यातच पालिकेने उन्हाळ्यात पाणी जपून वापरावे, असे पत्र जलसंपदा विभागातर्फे पालिकेला पाठविण्यात आले आहे.त्यामुळे धरणातील उपलब्ध पाणी पुरणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.पुणे महापालिका आणि जलसंपदा विभाग यांच्यातील पाणी कराराची मुदत संपुष्टात आली आहे.तरीही जलसंपदा विभागाकडून पालिकेला मंजूर क्षमतेपेक्षा अधिक पाणी दिले जात आहे. जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांच्या उपस्थितीत झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत पालिकेला येत्या १५ जुलैपर्यंत १३५० एमएलडी पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे पालिका परिसरात कोणतीही पाणी कपात न करता पाणी दिले जात आहे.तसेच शेतीसाठी सुध्दा गेल्या १४ दिवसापासून पाणी सोडण्यात आले असून एकूण २.६८ टीएमसी पाणी सोडले जाणार आहे. आत्तापर्यंत सुमारे १.४५ टीएमसी पाणी कालव्यातून ग्रामीण भागापर्यंत दिले गेले असून अजूनही १.५ टीएमसी पाणी सोडले जाणार आहे. त्याचप्रमाणे पुढील अडीच महिन्यात सुमारे अर्धा टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन होण्याची शक्यता असल्याने पालिकेने उपलब्ध पाणी काटकसरीने वापरण्याची आवश्यकता आहे.त्यामुळेच पालिकेने महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या नियमावलीनुसार पाणी वापरावे,असे पत्र जलसंपदा विभागातर्फे पालिकेला पाठविण्यात आले आहे.सध्या खडकवासला धरण प्रकल्पात केवळ ७ टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून पालिकेला १३५० एमएलडी पाणी देण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीने घेतला आहे. मात्र, पालिकेकडून १४०० ते १४५५ एमएलडी पाण्याचा वापर केला जात आहे.परंतु,पालिकेने अधिकचे पाणी वापरले तर येत्या १५ जुलैपर्यंत नागरिकांना पाणी पुरवणे कठिण जाणार आहे.त्यामुळे पालिकेने आत्तापासूनच काटकसरीने पाणी वापरणे गरजेचे आहे.--------------------खडकवासला धरण प्रकल्पात सध्या ७ टीएमसी एवढा साठा असून पुढील ८१ दिवस पुण्याताला सुमारे ४ टीएमसी पाण्याची आवश्यकता भासणार आहे.तसेच ग्रामीण भागासाठी सोडण्यात आलेले पाणी इंदापूरपर्यंत पोहचले असून आता दौंड भागात शेतीसाठी पाणी दिले जात आहे.त्यामुळे अजून दीड टीएमसी पाणी द्यावे लागणार असल्याने धरणातील ५.५ टीएमसी पाणीसंपणार आहे.तसेच अर्धा टीएमसी पाणी बाष्पिभवनात जाणार असल्याने येत्या १५ जुलैपर्यंत धरणातील ६.५ टीएमसी पाणी संपेल.मात्र,१३५० एमएलडी पाणी वापर झाला तरच हे शक्य आहे.परंतु,सध्या पालिकेकडून १४५० पेक्षा जास्त पाणी वापर केला जात असल्याने पाऊस लांबल्यास पाण्याचा तुटवडा जाणवणार आहे.

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका