शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

पुणेकरांना वर्षभर पाणीटंचाई भासणार नाही; खडकवासलासहीत तिन्ही धरणं भरली १०० टक्के

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2021 13:23 IST

खडकवासला धरणातून मुठा नदीत काल सायंकाळी सहा वाजता ५१३६ क्युसेकने पाणी सोडण्यात आले

ठळक मुद्देब्रिटिश कालीन दगडी भाटघर धरणं भरलं १०० टक्केपिंपरी - चिंचवडला पाणीपुरवठा करणारं पवना धरणही १०० भरलं टक्के

पुणे : पुणे जिल्ह्यात गणरायाच्या आगमनापासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्य़ातील अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पुणे शहराला टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांमधूनपाणीपुरवठा केला जातो. शहरातही पावसाचा जोर वाढल्यानं खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणे १०० टक्के  भरली आहेत. चारही धरणं पूर्ण क्षमतेनं भरलेली असल्याने या धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

जिल्ह्य़ाच्या सीमेवरील उजनी धरणात ६७ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणांसह वडज, कळमोडी, चासकमान, आंद्रा, पवना, कासारसाई, मुळशी,  गुंजवणी, निरा देवघर, भाटघर आणि वीर या जिल्ह्य़ातील अन्य धरणांमधूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

शहराला हंगामात प्रथमच २२ जुलैला खडकवासला धरण १०० टक्के भरले. पानशेत धरण ३ ऑगस्ट, तर वरसगाव धरण १९ ऑगस्ट रोजी १०० टक्के भरले. खडकवासला धरणसाखळीमधील टेमघर धरण १३ सप्टेंबरला भरल्याने चारही धरणांमधील पाणीसाठा २९.१५ अब्ज घनफू ट (टीएमसी) म्हणजेच १०० टक्के  झाला आहे. 

दिवसभरात टेमघर धरण परिसरात ४५ मिलिमीटर, वरसगाव आणि पानशेत धरण क्षेत्रांत प्रत्येकी २७ मि.मी., तर खडकवासला धरणक्षेत्रात ११ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. चारही धरणे १०० टक्के  भरली असल्याने टेमघर धरणातून ३०० क्युसेक वेगाने, वरसगाव धरणातून २६६५ क्युसेकने, पानशेत धरणातून २६९२ क्युसेकने, तर खडकवासला धरणातून मुठा नदीत काल सायंकाळी सहा वाजता ५१३६ क्युसेकने पाणी सोडण्यात आले, अशी माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली. दरम्यान ब्रिटिश कालीन दगडी भाटघर धरणं १०० टक्के भरलं असून धरणाच्या ४५ स्वयंचलीत ४५ पैकी ११ स्वयंचलित दरवाजातून ११७१ क्युसेसने प्रती सेकंद पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. यामुळे निरानदी काठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे. गतवर्षीच्या तुलनेत पाऊस कमी असल्यानं धरण २१ दिवस उशिराने भरलं आहे. भाटघर धरणचा पाणीसाठा २४ टीएमसी आहे.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड आणि परिसराला पाणीपुरवठा करणारे पवना धरणही १०० टक्के भरले आहे. या धरणातून दिवसभरात २१०० क्युसेकने पाणी नदीत सोडण्यात आले. जिल्ह्य़ातील अन्य धरणांच्या परिसरातही जोरदार पाऊस सुरू असल्याने बहुतांश धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

 

टॅग्स :Puneपुणेkhadakwasala-acखडकवासलाDamधरणWaterपाणीRainपाऊस