शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पुणेकरांना थंडीत गरमीचा अनुभव! हवामान बदलाचा फटका नागरिकांच्या आरोग्यावर

By श्रीकिशन काळे | Updated: November 7, 2023 15:29 IST

अरबी समुद्रात ढगांची निर्मिती झाली असून, त्यामुळे महाराष्ट्रातील सातारा, रत्नागिरी, सांगली, कोल्हापूर परिसरात पावसाचा अंदाज

पुणे : शहरासह राज्यामध्ये कमाल व किमान तापमानामध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नोव्हेंबरमधील थंडी कुठेही जाणवत नाही. उलट थंडीच्या काळात गरमी जाणवत आहे. या हवामान बदलाचा फटका नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. अनेकांना खोकला, ताप, सर्दी होत आहे. अरबी समुद्रात ढगांची निर्मिती झाली असून, त्यामुळे महाराष्ट्रातील सातारा, रत्नागिरी, सांगली, कोल्हापूर परिसरात पावसाचा अंदाज आहे.

दरवर्षी दिवाळीपूर्वीच थंडीचा कडाका जाणवत असतो. परंतु, यंदा मात्र दिवाळी आली तरी देखील थंडी पडायच्या ऐवजी गरमी होत आहे. राज्यात किमान व कमाल तापमान वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. कोकणात कमाल तापमानाचा पारा ३६ अंशांच्या वरच असून, उर्वरित राज्यातही कमाल तापमानात वाढ झाली आहे. सोमवारी (दि. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणात उन्हाची ताप अधिक असल्याने डहाणू येथे उच्चांकी ३६.४ अंश सेल्सिअस, उर्वरित राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ३२ ते ३५ अंशाच्या दरम्यान नोंदवले गेले आहे.

ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात वाढ कायम असून, बहुतांश ठिकाणी पारा १५ अंशाच्या वरच आहे आहे. पावसाला पोषक हवामान असल्याने मंगळवारी (दि. ७) दक्षिण कोकणातील रत्नागिरी, दक्षिण मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यात पावसाची इशारा हवामान विभागाने दिला आहे.

अरबी समुद्रामध्ये मोठ्या प्रमाणावर ढगांची निर्मिती झाली आहे. त्यामुळे गोव्यापासून ते कोकण, सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी, कोल्हापूर या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. पुणे, जिल्ह्यातही काही भागात पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहणार आहे. मध्य महाराष्ट्रात ११ नोव्हेंबरनंतर ढग जाऊन आकाश निरभ्र राहणार आहे. ७ ते ९ ढगाळ वातावरण पुण्यात राहील. हलका पावसाची शक्यता आहे. - अनुपम कश्यपी, प्रमुख, भारतीय हवामानशास्त्र अंदाज विभाग, पुणे

टॅग्स :Puneपुणेenvironmentपर्यावरणSocialसामाजिकHealthआरोग्यTemperatureतापमान