शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

पुणेकरांना थंडीत गरमीचा अनुभव! हवामान बदलाचा फटका नागरिकांच्या आरोग्यावर

By श्रीकिशन काळे | Updated: November 7, 2023 15:29 IST

अरबी समुद्रात ढगांची निर्मिती झाली असून, त्यामुळे महाराष्ट्रातील सातारा, रत्नागिरी, सांगली, कोल्हापूर परिसरात पावसाचा अंदाज

पुणे : शहरासह राज्यामध्ये कमाल व किमान तापमानामध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नोव्हेंबरमधील थंडी कुठेही जाणवत नाही. उलट थंडीच्या काळात गरमी जाणवत आहे. या हवामान बदलाचा फटका नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. अनेकांना खोकला, ताप, सर्दी होत आहे. अरबी समुद्रात ढगांची निर्मिती झाली असून, त्यामुळे महाराष्ट्रातील सातारा, रत्नागिरी, सांगली, कोल्हापूर परिसरात पावसाचा अंदाज आहे.

दरवर्षी दिवाळीपूर्वीच थंडीचा कडाका जाणवत असतो. परंतु, यंदा मात्र दिवाळी आली तरी देखील थंडी पडायच्या ऐवजी गरमी होत आहे. राज्यात किमान व कमाल तापमान वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. कोकणात कमाल तापमानाचा पारा ३६ अंशांच्या वरच असून, उर्वरित राज्यातही कमाल तापमानात वाढ झाली आहे. सोमवारी (दि. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणात उन्हाची ताप अधिक असल्याने डहाणू येथे उच्चांकी ३६.४ अंश सेल्सिअस, उर्वरित राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ३२ ते ३५ अंशाच्या दरम्यान नोंदवले गेले आहे.

ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात वाढ कायम असून, बहुतांश ठिकाणी पारा १५ अंशाच्या वरच आहे आहे. पावसाला पोषक हवामान असल्याने मंगळवारी (दि. ७) दक्षिण कोकणातील रत्नागिरी, दक्षिण मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यात पावसाची इशारा हवामान विभागाने दिला आहे.

अरबी समुद्रामध्ये मोठ्या प्रमाणावर ढगांची निर्मिती झाली आहे. त्यामुळे गोव्यापासून ते कोकण, सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी, कोल्हापूर या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. पुणे, जिल्ह्यातही काही भागात पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहणार आहे. मध्य महाराष्ट्रात ११ नोव्हेंबरनंतर ढग जाऊन आकाश निरभ्र राहणार आहे. ७ ते ९ ढगाळ वातावरण पुण्यात राहील. हलका पावसाची शक्यता आहे. - अनुपम कश्यपी, प्रमुख, भारतीय हवामानशास्त्र अंदाज विभाग, पुणे

टॅग्स :Puneपुणेenvironmentपर्यावरणSocialसामाजिकHealthआरोग्यTemperatureतापमान