शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

पुणेकरांनो सावधान, आता शहरात रात्री आठनंतर सकाळी ७ नंतर संचारबंदीचाही आदेश लागू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2021 20:33 IST

रविवारपासून (२८ मार्च) रात्री आठनंतर संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत.

पुणे : कोरोना संसर्गामुळे शहरात रात्री ८ ते दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदीचे (५ किंवा ५ पेक्षा अधिक लोकांना एकत्र येणे वा फिरण्यास मनाई करणारा) आदेश लागू करण्यात आला आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कलम १८८ तसेच साथ रोग अधिनियमातील तरतुदींनुसार गुन्हे दाखल करण्यात येतील, असे आदेश सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिले आहेत.

रविवारपासून (२८ मार्च) रात्री आठनंतर संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. पुढील आदेशापर्यंत दररोज रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदीचे आदेश लागू राहणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. यापूर्वी रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत शहरात संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले होते.

संचारबंदीच्या आदेशातून अत्यावश्यक सेवा, जीवनावश्यक सेवा तसेच वस्तू याबाबतच्या सवलती व इतर निर्बंध समाविष्ट असतील.संचारबंदीचे आदेश लागू केल्यानंतर रात्री कामावरुन घरी परतणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी तसेच वैद्यकीय कारणासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांची अडवणूक करण्यात येऊ नये, असे आदेश शहरातील सर्व पोलीस ठाण्यातील प्रमुखांना देण्यात आले आहेत.

संचारबंदीच्या काळात एखादी व्यक्ती कामावरुन घरी निघाली असेल तर त्यांच्यावर कारवाई होणार नाही. मात्र, त्यासाठी त्यांनी कार्यालयीन ओळखपत्र बाळगावे. मात्र, रात्री ८ नंतर एखादी व्यक्ती विनाकारण फिरत असेल तर त्यांच्यावर कलम १८८ नुसार कारवाई करण्यात येईल, असे डॉ. शिसवे यांनी नमूद केले.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी