शहरं
Join us  
Trending Stories
1
२० वर्षांचा ईएमआय १५ वर्षांत संपणार, घर-वाहन कर्ज झाले आणखी स्वस्त, ‘आरबीआय’कडून रेपो दरात कपात
2
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
3
इंडिगो विमान संकट, रेल्वेने मोर्चा सांभाळला, ३७ ट्रेनमध्ये वाढवले ११६ डबे, या दोन स्टेशनदरम्यान धावणार विशेष ट्रेन
4
RBI नं रेपो दरात कपात करताच 'या' दोन सरकारी बँकांनी कर्ज केली स्वस्त; पाहा काय आहेत नवे दर?
5
आजचे राशीभविष्य, ०६ डिसेंबर २०२५: कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उद्भवतील, नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता
6
रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
7
अजबच! अचानक खेळपट्टीने गिळला चेंडू आणि सामनाच करावा लागला रद्द, WBBL मध्ये नेमकं काय घडलं?   
8
आरक्षण देणाऱ्या मुख्यमंत्र्यांप्रति अनाथ कृतज्ञ होतात तेव्हा...; वर्षा निवासस्थानी पार पडला भावुक सोहळा
9
विशेष लेख: ‘आधी, नंतर आणि शेवटीही फक्त भारतीयच!’  
10
वर्षात चार वेळा ईएमआय झाला कमी!घर, कार घेणे स्वस्त; आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा
11
मध्य रेल्वे मनी लाँड्रिंग: ‘क्लोजर रिपोर्ट’ विशेष न्यायालयाने स्वीकारला, आठ अधिकाऱ्यांचे प्रकरण काय?
12
‘नगरां’च्या निवडणुकीची २१ डिसेंबरलाच मतमोजणी; खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम
13
पुतीन परतले, पुढे...?
14
शाकाहारी असाल तरच तुम्हाला फ्लॅट देणार! मराठी माणसाला नाकारले घर?
15
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
16
शिक्षकांचे संच मान्यता निकष, टीईटी सक्तीविरोधात आंदोलन; मुंबईमध्ये शाळा बंदला संमिश्र प्रतिसाद
17
कामगार युनियनवरून ठाकरेंची शिवसेना-भाजपमध्ये राडा, वरळीत तणाव; पोलिसांचा कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज
18
दोन दिवसीय भारत दौऱ्याची सांगता, पुतिन रशियाला जाण्यासाठी रवाना; PM मोदींचे मानले विशेष आभार
19
‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?
20
सेवा-समर्पणाच्या वाटेवरच्या ध्येयनिष्ठ प्रवाशाची कहाणी
Daily Top 2Weekly Top 5

पुणे जिल्ह्यात पावसाने गाठली सरासरी, आतापर्यंत ६५७ मिलिमीटर पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 20:35 IST

- सरासरीच्या ९३ टक्के, इंदापूर अद्याप सत्तरीच्या आतच, पीक परिस्थिती उत्तम

पुणे : जिल्ह्यात जूनमध्ये झालेल्या दीडपट पावसामुळे तीन महिन्यांमध्ये सरासरी भरून काढली असून एकूण ९३ टक्के पाऊस झाला आहे. जुलै व ऑगस्टमध्ये पावसाचे प्रमाण सरासरीच्या अनुक्रमे ७४ आणि ८१ टक्के इतके आहे. या पावसामुळे पीक उत्तम बहरल्याने चांगले उत्पादन मिळण्याची आशा कृषी विभागाने व्यक्त केली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक २०१ टक्के पाऊस मावळ तालुक्यात झाला असून इंदापूर तालुक्यात मात्र ६८ टक्के पावसाची नोंद झाली आहे. ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात झालेल्या पावसाने पिकांना जीवदान मिळाले आहे.

यंदा मान्सूनने वेळेवर हजेरी लावली. मात्र, जूनचा शेवटचा आठवडा व जुलैचे पहिले दोन आठवडे पावसाचे प्रमाण कमी राहिले. त्यामुळे जिल्ह्याच्या मावळ, मुळशी, भोर, वेल्हा आणि पश्चिम भागातील तालुक्यांमध्ये भाताच्या पुनर्लागवडीवर परिणाम झाला. अन्य ठिकाणी मात्र, सोयाबीन, मका, बाजरी, भुईमूग, उडीद, मूग या पिकांची लागवड वेळेत झाली.

जिल्ह्यात जून महिन्यात सरासरी १७६ मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा मात्र प्रत्यक्षात २४९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सरासरीच्या तुलनेत हा पाऊस १४१ टक्के इतका पडला. जुलै महिन्यात सुरुवातीचे दोन आठवडे पावसाने काही प्रमाणात दडी मारल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून आले. त्यामुळे सरासरी ३०९ मिलिमीटर पावसाच्या तुलनेत प्रत्यक्षात २३० मिलिमीटर पाऊस झाला. ऑगस्ट महिन्यातही सुरुवातीचे दोन आठवडे पावसाचे प्रमाण कमी होते. तर त्यानंतरच्या पंधरवड्यात पावसाने हजेरी लावल्याने काहीसा दिलासा मिळाला. ऑगस्टमध्ये सरासरी २२० मिलिमीटर पाऊस पडतो. प्रत्यक्षात १७७ मिलिमीटर अर्थात ८१ टक्के पाऊस पडला.

पहिल्या दोन आठवड्यांमध्ये पावसाने दडी मारल्याने इंदापूर, बारामती, दौंड, पुरंदर या पूर्व भागातील तालुक्यांमध्ये पिके सुकू लागली होती. सबंध जिल्ह्यात या काळात केवळ १५ ते २० टक्केच पाऊस झाला होता. मात्र, १५ ऑगस्टनंतर झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील पिकांना मोठा दिलासा मिळाला. त्यामुळे पीक परिस्थितीमध्ये झपाट्याने बदल होऊन आता पिकांची परिस्थिती उत्तम असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी दिली. पश्चिम भागात भाताची लागवड उशिरा झाली तरी आता पीक चांगल्या अवस्थेत आहे. सबंध जिल्ह्यात पाऊस चांगला झाला असल्याने उत्पादनातही वाढ होण्याची शक्यता काचोळे यांनी यावेळी व्यक्त केली.

मावळ तालुक्यात सर्वाधिक २१० टक्के पावसाची नोंद झाली असून त्या खालोखाल ११४ टक्के पाऊस खेड व ११३ टक्के पाऊस भोर तालुक्यात झाला आहे. सर्वांत कमी पाऊस इंदापूर तालुक्यात ६८ टक्के झाला असून बारामती व पुरंदर तालुक्यात प्रत्येकी ७७ टक्के पावसाची नोंद झाली आहे.

तालुकानिहाय पाऊस

तालुका पाऊस (मिमी) टक्के

हवेली ४५०--८१

मुळशी १३८२--९९.७

भोर ९६२--११३

मावळ २१२७--२०९.८

वेल्हा १८१४--८५

जुन्नर ३०७--८०.८

खेड ४७१--११४.९

आंबेगाव ५६८--१०४.७

शिरूर २३४--१०३.७

बारामती १६०--७७.३

इंदापूर १८३.७--६८.७

दौंड २३२--१०८.७

पुरंदर २५६--७७.६

एकूण ६५७--९३.२

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडRainपाऊस