शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस कमी होणार, उघडीप मिळाल्यास पेरण्या मार्गी लागणार, राज्यात पुढील पाच दिवसांतील स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 13:47 IST

सध्या झालेला पाऊस अनपेक्षित असून पावसाचा जोर कमी झाल्यास व उघडीप मिळाल्यास पेरणी योग्य वापसा स्थिती तयार होणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणी करावी, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.

पुणे : गेल्या आठवडाभर पावसाने राज्याला झोडपून काढल्यानंतर आता पुढील पाच दिवसांत पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे. कोकण वगळता मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात मोठ्या पावसाची शक्यता नसून पुढील दोन दिवसांत हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. त्यानंतर पावसाचा जोर आणखी कमी होणार आहे, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. दरम्यान, सध्या झालेला पाऊस अनपेक्षित असून पावसाचा जोर कमी झाल्यास व उघडीप मिळाल्यास पेरणी योग्य वापसा स्थिती तयार होणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणी करावी, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. पावसाचा जोर कमी होणारमॉन्सूनने गुरुवारी राज्यात प्रगती केली नसती तरी छत्तीसगड, ओडिशा बंगालचा उपसागर व ईशान्येकडील काही राज्यांत धडक दिली आहे. पुढील दोन दिवसांत बिहार आणि पश्चिम बंगालमधील उर्वरित भागांमध्ये प्रगती करण्यासाठी वातावरण अनुकूल असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले. याबाबत भारतीय हवामानशास्त्र विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सानप म्हणाले, “मॉन्सूनच्या वाऱ्यांमधील जोर कमी झाला आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यावरील कमी दाबाचे क्षेत्र विरले असून अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टाही विरला आहे. तर बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पूर्व भागातील विशेष करून ओडिशा, बिहार व पश्चिम बंगालमध्ये सध्या पाऊस होत आहे. या स्थितीमुळे राज्यात पुढील चार ते पाच दिवसांमध्ये कोकण वगळता मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात मोठ्या पावसाची शक्यता नाही. या भागांमध्ये पुढील दोन दिवसांत काही ठिकाणी हलका ते मध्यम व त्यानंतर हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणात पुढील दोन दिवस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर तेथेही पाऊस कमी होईल.

 वापसा येण्यास मदत होईल

गेल्या आठवड्याभरात राज्यात बहुतांश जिल्ह्यांमध्ये मोठा पाऊस झाला आहे. मे महिन्यात अशा स्वरूपाचा पाऊस यापूर्वी झालेला नाही. आता उघडीप मिळाल्यानंतर शेतात वापसा येण्यास मदत होईल. त्यासाठी किमान पाच सहा दिवस लागतील. वापसा आल्यानंतर पेरणीला सुरुवात करता येईल. कोकणातील शेतकऱ्यांना आता भात रोपे टाकण्यासाठी ही उत्तम वेळ आहे. राज्यात कापूस व सोयाबीन या दोन पिकांखालील क्षेत्र मोठे आहे. अतिवृष्टी झालेल्या विदर्भ मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी वापसा आल्यानंतर बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी. पावसाचे प्रमाण कमी असलेल्या ठिकाणी शेतकऱ्यांनी जमिनीतील ओलाव्याचा अंदाज घेऊन पेरणी करावी, असा सल्ला कृषी संचालक विनयकुमार आवटे यांनी दिला आहे.

मॉन्सूनच्या वाऱ्यांचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे राज्यातही पाऊस कमी होईल. - डॉ. एस. डी. सानप, शास्त्रज्ञ, भारतीय हवामानशास्त्र विभाग, पुणे

पाऊस थांबल्यास वापसा येण्यास मदत होईल. त्यानंतर पेरणीयोग्य स्थिती पाहून बीजप्रक्रिया करून पेरणी करावी. - विनयकुमार आवटे, संचालक, कृषी 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडRainपाऊसWaterपाणी