शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

पुणेकरांनो काळजी घ्या! खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला; पुन्हा मुसळधार पावसाला सुरूवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2024 23:12 IST

खडकवासला धरण क्षेत्रात पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे.  यामुळे खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

खडकवासला धरण क्षेत्रात पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे.  यामुळे खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. मुठा नदीत पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आलाय, यामुळे पुणे शहरातील मुठा नदी पात्रातील पाण्याची पातळी वाढली आहे. नदी पात्राच्या बाजूने असणाऱ्यांना लोकांना सूचना देण्यात आल्या आहेत. 

मुठा कालवा पाटबंधारे उपविभागाचे उपविभागीय अभियंता यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी दिलेली माहिती अशी, शनिवारी २४ ऑगस्ट रोजी खडकवासला धरणाच्या सांडव्यावरुन मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा २७,८४१ क्युसेक विसर्ग वाढवून रात्री १०.०० वाजता ३१, ५१५ क्युसेक करण्यात आला आहे. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानुसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे, याची नोंद घ्यावी, अशी माहिती दिली आहे. तसेच नदी काठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

आज रात्री ९ वाजल्यापासून पुणे शहरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. शहरामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. अनेक ठिकाणी जलमय परिस्थिती झाली आहे. 

रात्री ११ वाजता ३५ हजार ३१० क्यूसेक पाण्याचा विसर्ग

खडकवासला धरणातून रात्री ११.०० वा. मुठा नदी पात्रात ३५ हजार ३१० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. नागरिकांनी नदी पात्रात उतरू नये; नदीकाठच्या नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असं जिल्हा प्रशासनाने आवाहन केले.

पुढील 48 तासात 'या' जिल्ह्यात अतिजोरदार पाऊस

मागील दोन दिवसांपासून पावसाची संततधार (Heavy Rain) सुरूच आहे. आज देखील राज्यातील बहुतांश भागात जोरदार पाऊस बरसला. आज शनिवार दि. २४ ऑगस्ट सकाळ ते सोमवार दि.२६ ऑगस्टच्या सकाळपर्यंतच्या ४८ तासात संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता (Maharashtra Rain Update) वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. 

जेष्ठ निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तविलेल्या हवामान अंदाजानुसार पुढील ४८ तासात अति जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. त्यानुसार विशेषतः नंदुरबार, धुळे, जळगांव, नाशिक, अहमदनगर, छ. संभाजीनगर, पुणे, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा १४ जिल्ह्यात पुढील ४८ तासात तर अतिजोरदार पावसाचीही शक्यता जाणवते. 

रविवार दि. २५ ऑगस्टपासून सह्याद्री कुशीतील नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावरील धरणांतून होणाऱ्या जलविसर्गाच्या शक्यतेतून, संबंधित नद्यांच्या खोऱ्यात कदाचित पूर-परिस्थितीही निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

टॅग्स :PuneपुणेRainपाऊस