शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

धरणसाठ्याचा ‘पुणे पॅटर्न’ : जिल्ह्यातील धरणांची क्षमताच केली कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2020 17:16 IST

गाळ काढण्यासाठी फारसे प्रयत्न न करता राबविण्यात आलेला हा 'पुणे पॅटर्न ' राज्याला जलसंकटात लोटू शकतो.

ठळक मुद्देवर्षानुवर्षे पुणे जिल्ह्यातील या धरणांमध्ये गाळ राज्यातील बहुतांश धरणांना झाली तीस ते चाळीस वर्षांची

विशाल शिर्के- पुणे : राज्यातील बहुतांश धरणांना तीस ते चाळीस वर्षे झाली असून, काही धरणे तर स्वातंत्र्यपूर्व काळातील आहेत. वर्षानुवर्षे पुणे जिल्ह्यातील या धरणांमध्ये गाळ साचत आहे. काही संघटनांनी आंदोलने करूनही रुतलेला गाळ काही जागचा हलला नाही. आता, गाळाने धरण भरत असल्याने त्याची क्षमताच कमी करण्याचा निर्णय काही धुरिणांनी घेतला आहे. गाळ काढण्यासाठी फारसे प्रयत्न न करता राबविण्यात आलेला हा 'पुणे पॅटर्न ' राज्याला जलसंकटात लोटू शकतो. नाशिक येथील महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था (मेरी) धरणाच्या अभियांत्रिकीबरोबरच धरणातील साठलेल्या गाळावरदेखील अभ्यास करते. या संस्थेने घोड पाटबंधारे उपविभागातील घोड प्रकल्पाच्या जलाशयाच्या साठवण क्षमतेचा अभ्यास केला. त्यात त्यांना गाळामुळे धरणाची साठवण क्षमता कमी झाल्याचे आढळले. घोड धरणाची एकूण साठ्याची प्रकल्पीय क्षमता ७.७३ अब्ज घनफूट (टीएमसी) होती. गाळामुळे त्यात ४.८७ अब्ज घनफुटापर्यंत घट झाली आहे. म्हणजेच तब्बल १.७० टीएमसीने पाणीसाठा घटला आहे. दुसºया शब्दात सांगायचे झाल्यास पुणे शहराची ३५ ते ४० दिवसांची तहान भागेल इतके पाणी धरणातील गाळामुळे कमी झाले आहे. याचाच अर्थ, जवळपास एक खडकवासला (उपयुक्त साठा १.९७ टीएमसी) धरणाइतकी क्षमता कमी झाली आहे.  हा अहवाल आल्यानंतर घोड पाटबंधारे विभागाने धरणसाठ्याच्या आकडेवारीतच बदल केला आहे. भीमा खोरे पाटबंधारे अहवालात २१ नोव्हेंबर २०१९ पूर्वी या धरणाची प्रकल्पीय पाणीसाठ्याची क्षमता ७.६३ टीएमसी होती. ती २१ नोव्हेंबरपासून ५.९७ टीएमसी करण्यात आली आहे. तसेच पूर्वीचा उपयुक्त पाणीसाठादेखील ५.४६ टीएमसीवरून ४.८७ टीएमसीपर्यंत खाली आला आहे. त्यातही ०.५९ टीएमसीने घट झाली आहे. या बाबत बोलताना जलतज्ज्ञ डॉ. डी. बी. मोरे म्हणाले, राज्यात सह्याद्रीच्या दºयाखोºयात आणि मैदानी भागात धरणे आहेत. डोंगराळ भागातील धरणांच्या क्षेत्रात तुलनेने अधिक झाडी-झुडपे असल्याने कमी गाळ धरणात येतो. त्या तुलनेत मैदानी भागातील धरणांमधे गाळ साठण्याचे प्रमाण अधिक असते. घोडसह उजनी, जायकवाडी, मांजरा ही धरणे मैदानी प्रदेशातील आहेत. पानशेत, वरसगाव, कोयना ही धरणे डोंगररांगातील आहेत. या धरणातही कालामानाने गाळ साचत असतो. मेरीने दहा वर्षांपूर्वी दिलेल्या अहवालानुसार राज्यातील धरणात सरासरी ८ ते दहा टक्के गाळ होता. ..........सरकारने गाळ भरून देण्याचा खर्च करावा घोड धरणातील पाण्याचा अचूक हिशेब मांडता यावा यासाठी संबंधित अधिकाºयाने धरणाची क्षमता कमी केली असेल. मात्र, हा त्यावरील उपाय असू शकत नाही. धरणातील गाळ काढण्याचा कार्यक्रम दरवर्षी व्हायला हवा. विशेषत: दुष्काळी वर्षात लहान, मोठ्या आणि मध्यम प्रकल्पातील गाळ काढण्याची कामे हाती घ्यायला हवीत. तसेच, धरण पाणलोट क्षेत्रात वृक्षारोपण करणे, नदीतील घळीत ठराविक अंतराने सुट्या दगडगोट्यांचे बांध घालून गाळ येण्याचे प्रमाण कमी करावे लागेल. अनेकदा गाळ नेण्यासाठी शेतकरी उत्सुक नसतात. सरकारने जेसीबी, त्याचे डिझेल आणि गाळ भरुन देण्याचा खर्च करावा. शेतकºयांना तो वाहून नेण्याचे आवाहन करावे. - डॉ. डी. एम. मोरे, जलतज्ज्ञघोड धरणाचा पूर्वीचा व आजचा साठा (टीएमसीमध्ये)पाणीसाठा प्रकार                                                 पूर्वीची                       आत्ताचीजलाशयाची एकूण क्षमता                                    ७.६३                           ५.९७उपयुक्त पाणीसाठा क्षमता                                  ५.४६                           ४.८७मृत पाणीसाठा क्षमता                                          १.६९                          १.१०

टॅग्स :PuneपुणेDamधरणWaterपाणी