शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
2
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
3
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
4
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
5
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
6
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
7
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
8
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
9
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
10
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
11
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
12
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
13
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
14
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
15
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
16
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
17
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
18
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
19
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
20
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

ओबीसीमधून आरक्षणाला आव्हान मिळाले तर टिकणार का? प्रविण गायकवाड यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 19:55 IST

संभाजी ब्रिगेडकडून महाराष्ट्र धर्मासाठी कार्यक्रमाचे आयोजन

पुणे : मराठा आऱ्क्षण प्रश्नावरून महाराष्ट्रात जातीसंघर्ष तयार झाला आहे. सरकार या विषयावर स्पष्ट भूमिका न घेता भावना भडकवत आहे. ते योग्य नाही. १ मे रोजी झालेल्या महाराष्ट्रात असे वातावरण कधीही नव्हते. ते पुन्हा व्यवस्थित व्हावे यासाठी संभाजी ब्रिगेडने ‘महाराष्ट्र धर्मासाठी’ या जाहीर कार्यक्रमाचे रविवारी (दि.१४ सप्टेबर) रोजी सायंकाळी साडेचार वाजता बालगंधर्व रंगमंदिरात आयोजन केले आहे अशी माहिती ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांनी दिली.

गायकवाड यांनी या विषयावर पत्रकार परिषद घेतली. त्यात बोलताना त्यांनी विस्ताराने विवेचन केले. सरकारच्या सारथी तसेच अण्णासाहेब पाटील विकास महामंडळातून मराठा कुणबी व कुणबी मराठा यांना मदत केली जाते. याचा अर्थ सरकारला मराठा हे कुणबी आहेत व कुणबी हे मराठा आहेत हे मान्य आहे. सरकारने मराठा समाजाला आर्थिक मागासलेपण लक्षात घेऊन १० टक्के आरक्षण दिलेच आहे. आता जो अध्यादेश काढला त्यात कुणबी नोंदी सापडल्या तर ओबीसी आरक्षण मिळेल असे म्हटले आहे. मागणी मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे अशी आहे. सरकारच या मराठा आरक्षण प्रश्नात संभ्रम निर्माण करत आहे अशी टीका गायकवाड यांनी केली.

सरकारच्या या धोरणामुळे महाराष्ट्रात कधी नव्हे इतका जातीय संघर्ष निर्माण झाला. संतानी सांगितलेला महाराष्ट्र धर्म समजावून सांगण्याची आज खरी गरज आहे. आम्ही काही मोठे काम करत नाही, मात्र जे आवश्यक आहे ते करतो आहोत. महाराष्ट्र धर्मासाठी हा कार्यक्रम त्यासाठीच असल्याचे गायकवाड म्हणाले. यात ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार, डॉ. दीपक पवार, डॉ. प्रकाश पवार, हे अभ्यासक तसेच हनुमंत पवार, बालाजी गाडे पाटील हे राजकीय कार्यकर्ते बोलतील. सामाजिक कार्यकर्ते नितीन पवार व किशोर ढमाले यांचा कार्यक्रमात त्यांच्या सामाजिक कार्यासाठी सत्कार करण्यात येणार आहे अशी माहिती गायकवाड यांनी दिली. 

सध्या मराठा समाजाला आर्थिक मागासलेपणाच्या आधारे १० टक्के आरक्षण आहे. कुणबी नोंदीनुसार ओबीसी आरक्षणाला न्यायालयात आव्हान दिले गेले तर तिथे ते टिकेल का? हा प्रश्न आहे. ते घ्यायचे, त्यसाठी १० टक्के आरक्षणावर पाणी सोडायचे असा हा सर्व प्रकार आहे. याला सरकार जबाबदार आहे. सरकारने हा भांडणे लावण्याचा प्रकार सोडून सर्वच समाजासाठी शिक्षणाचा खर्च वाढवावा अशी मागणी आमची मागणी असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडOBC Reservationओबीसी आरक्षणMaratha Reservationमराठा आरक्षण