शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
3
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
4
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
5
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
6
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
7
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
8
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
9
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
10
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
11
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
12
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
13
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
14
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
15
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
16
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
17
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
18
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
19
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
20
कोल्हापुरातील शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट! शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश

कृषिक्षेत्रात ‘एआय’चा वापर ‘गेमचेंजर’ ठरणार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 11:06 IST

श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या वतीने ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता याविषयी शेतकरी मेळावा आणि कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले होते.

बारामती : सणसर - गणरायाच्या आगमनाच्या दिवशी छत्रपती कारखान्याने शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा कार्यक्रम घेतला आहे. भविष्यात हवामान बदल, वाढता उत्पादन खर्च पाहता कृषिक्षेत्रात ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर गेम चेंजर ठरणार असल्याचे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या वतीने ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता याविषयी शेतकरी मेळावा आणि कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले होते. यावेळी उपमुख्यमंत्री पवार पुढे म्हणाले, ‘एआय’चा वापर शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण बाब आहे. त्यासाठी आजचा कार्यक्रम महत्त्वाचा आहे. या आयोजनाबद्दल संचालक मंडळाला धन्यवाद देतो. याच कारखान्यापासून माझी राजकीय कारकीर्द सुरू झाल्याने माझे या परिसराशी भावनिक नाते आहे.

कारखान्याला गतवैभव प्राप्त झाले पाहिजे, ही आमची भूमिका आहे. हे काम मोठे जिकिरीचे आहे. मात्र, संचालक मंडळ साथ देत आहे. शिवाय राज्य सरकार, बँक स्तरावर आमची जबाबदारी पार पाडण्याचा आपल्यासह भरणे यांनी प्रयत्न केला आहे. कारखाना परिसरातील रस्त्यांच्या कामासाठी १० काेटींचा निधी मंजूर केल्याची घोषणा उपमुख्यमंत्री पवार यांनी केली. पुढील काळात कारखाना परिसराच्या विकासासाठी टप्प्याने आणखी निधी देण्यात येइल, असेदेखील पवार यांनी स्पष्ट केले. शेती आपण ‘स्मार्ट’ करू शकल्यास शेतकऱ्यांचे जीवन समृद्ध होईल. तंत्रज्ञानाचा वापर करणाराच भविष्यात साक्षर ठरेल.

शेतकऱ्यांच्या भल्यासाठी कायम पाठीशी राहू, वडीलधाऱ्यांनी उभा केलेला कारखाना देशात पुढे नेऊ, असे पवार म्हणाले. यावेळी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकरी हितासाठी राज्य सरकार चांगले निर्णय घेण्यासाठी प्रयत्नशील आहे. भरघोस उत्पादनासाठी शेतात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे. ठिबक सिंचनाचे उर्वरित अनुदान पुढील महिन्यात जमा होणार असल्याचे भरणे म्हणाले. कृषी विकास प्रतिष्ठानचे चेअरमन राजेंद्र पवार यांनी भविष्यातील शेतीसंकटावर मात करण्यासाठी ‘एआय’ महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार असल्याचे मत व्यक्त केेले.

‘छत्रपती’चे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह शेतकरी सभासदांनी टाकलेला विश्वास सार्थ करू, शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी ‘एआय’ महत्त्वपूर्ण असल्याचे जाचक म्हणाले. याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. यावेळी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, कृषी विकास प्रतिष्ठानचे प्रमुख राजेंद्र पवार, कारखान्याचे उपाध्यक्ष कैलास गावडे, माजी चेअरमन प्रशांत काटे, संचालक रामचंद्र निंबाळकर, पृथ्वीराज घोलप, शिवाजी निंबाळकर, सणसरचे सरपंच यशवंत नरुटे, यांच्यासह सर्व संचालक, पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAjit Pawarअजित पवार