शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर नेपाळमध्ये सत्तांतर! पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी दिला राजीनामा; देश सोडून पळाले?
2
नेपाळमधील आंदोलनाला हिंसक वळण; राष्ट्रपती, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची घरे जमावाने जाळली
3
कोण आहे बालेन शाह? ज्यांच्याकडे देशाचं नेतृत्व सोपवण्याची मागणी Gen Z आंदोलनकर्ते करतायेत
4
Gen-Z क्रांतीमुळे नेपाळमध्ये सत्तापालट? पंतप्रधान ओली दुबईला पळून जाण्याच्या प्रयत्नात, खाजगी विमान तयार
5
मुंबई विमानतळावरील अधिकारी जप्त नारळ, तेलाच्या बाटल्या नेत होते; १५ जणांना नोकरीवरून काढले
6
Video : नेपाळमधील आंदोलन आणखी पेटलं; मंत्र्यांची घरं जाळल्यानंतर लोकांचा सुरक्षा दलांवर हल्ला
7
रणबीर कपूर 'या' कंपनीचे १२.५ लाख शेअर्स खरेदी करणार, सलग दुसऱ्या दिवशी अपर सर्किट; गुंतवणूकदार मालामाल
8
iPhone 17: अ‍ॅपल आज मोठा धमाका करणार! पहिल्यांदाच आयफोनमध्ये 'हे' ४ फीचर्स मिळण्याची शक्यता
9
हिरो डॉग! मालकाला वाचवण्यासाठी जळते डायनामाइट तोंडात धरले अन्..; Video पाहून भावूक झाले लोक
10
एक व्यक्ती, ६ जिल्ह्यात एकाच वेळी केली ९ वर्षे नोकरी, सरकारला घातला कोट्यवधींचा गंडा 
11
ओलाच्या नावाने शिमगा केला, बजाज चेतक भररस्त्यात पेटली; इचलकरंजीत शोला बनला आग का गोला...
12
नेपाळमध्ये सरकार कोसळण्याचं संकट, घटकपक्षाने सोडली साथ; आतापर्यंत ३ मंत्र्यांनी दिले राजीनामे
13
हेल्दी वाटणारा मिल्कशेक मेंदूसाठी ठरतोय 'विष'; आवडीने पिणाऱ्यांना धोक्याचा इशारा
14
डिफेन्स कंपनीचा शेअर ठरला 'मल्टीबॅगर', ६ महिन्यांत पैसे दुप्पट; ५ वर्षांत दिला २०००% परतावा
15
रशियन कच्च्या तेलावरील भारताच्या नफ्याला म्हटलं 'ब्लड मनी'; ट्रम्प यांच्या सहकाऱ्यानं पुन्हा गरळ ओकली
16
स्थानिक निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदेंनी डाव टाकला; भाजपाच्या शत्रूशी केली हातमिळवणी, काय घडलं?
17
Asia Cup 2025 : 'बॅग'सह 'लक फॅक्टर' घेऊन दुबईला पोहचलाय कोच गंभीर! नेमकी काय आहे ही भानगड?
18
गोराई बीचवर मिनीबस भरतीच्या पाण्यात अडकली; चालकाचे जीवघेणं धाडस, तीन तासांनी...
19
WhatsApp Web Down : लॅपटॉप किंवा माऊस खराब झाला नाही तर WhatsApp Web आहे डाऊन; स्क्रोलिंगला येतोय प्रॉब्लेम
20
"नेपाळसाठी काळा दिवस...", देशातील हिंसक परिस्थिती पाहून मनीषा कोईरालाची भावुक पोस्ट

शिक्षक बदल्यांचा बोजवारा;संचमान्यता,समानीकरण शासन निर्णयालाच हरताळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 13:21 IST

- शासन आदेशाला केराची टोपली, मंजूर पदांपेक्षा अधिक शिक्षक नियुक्त केल्याने कार्यरत शिक्षकांवर अतिरिक्त होण्याची वेळ

- बी.एम.काळे

जेजुरी : नवीन शैक्षणिक वर्ष १५ जून २०२५ पासून सुरू झाले असतानाही राज्यात सध्या शिक्षकांच्या ऑनलाइन पोर्टलद्वारे बदल्यांची प्रक्रिया सुरू झाली आहे. ही प्रक्रिया राबविण्याची जबाबदारी ‘विन्सिस’ या खासगी कंपनीकडे आहे. मात्र, बदल्यांचा बोजवारा संपूर्ण राज्यात उडालेला पाहावयास मिळत आहे. शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत संचमान्यतेचे निकष डावलून, तसेच समानीकरणाच्या संदर्भात शासन निर्णयालाच केराची टोपली दाखवून शाळांमध्ये मंजूर पदांपेक्षा अधिक शिक्षक नियुक्त केल्याने कार्यरत शिक्षकांवर अतिरिक्त होण्याची वेळ आल्याचे संपूर्ण राज्याचे चित्र आहे.

शिक्षकांची बदली प्रक्रिया पार पडताना अतिरिक्त शिक्षकांचे प्रथम समायोजन करणे आवश्यक होते. मात्र, त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने बदलीमध्ये त्या जागांवर शिक्षक टाकल्याने राज्यभरात शिक्षकांवर अतिरिक्त होण्याची वेळ आली आहे. बदली प्रक्रियेचा एक भाग म्हणून सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी आपल्या जिल्ह्यातील अनिवार्य रिक्त ठेवायच्या जागांची यादी निश्चित करतात. ती यादी जाहीर देखील झाली; पण बदल्यांमध्ये त्याच शाळांवर शिक्षक टाकले गेल्याने पुढील शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत.बदलीच्या शासन निर्णयानुसार समानीकरणाची पदे ही फक्त शिक्षक भरती किंवा खासगी अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनासाठीच खुली करण्यात येतील, हे स्पष्ट नमूद असतानाही तसेच समानीकरणांतर्गत रिक्त ठेवाव्या लागणाऱ्या जागांवर बदलीने नियुक्ती दिली जाणार नाही, असा स्पष्ट शासन निर्णय असताना मात्र काही जिल्हा परिषदांमध्ये अशा शाळांवर बदली पोर्टलद्वारे शिक्षक टाकल्याने पुढील शिक्षकांवर अतिरिक्त होण्याची वेळ आली असून, ते शिक्षक पुढे समायोजनाच्या फेऱ्यात अडकणार आहेत. राज्यात जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये बदली प्रक्रियेचे निकष डावलल्याने शिक्षकांना अतिरिक्त ठरविण्याची शासनाची खेळी असून, जिल्हा परिषद शाळा बंद करण्याचा हा घाट असल्याची चर्चा शिक्षकांमध्ये आहे.सध्या केवळ संवर्ग एकच्या बदल्यांची प्रक्रिया पार पडली असून, अजून संवर्ग तीन, चार व विस्थापित राउंडच्या बदल्या बाकी आहेत. या प्रक्रियेला अजून महिना लागणार असल्याने तोपर्यंत शिक्षकांची काम करण्याची मानसिकता राहणार नाही. शिवाय आपल्या पाल्यांचे नुकसान होणार असल्याने मध्येच बदल्यांचे काढलेले खुळ शासनाने बंद करावे, अशी मागणी पालकवर्गामधून जोर धरत आहे.

बदली प्रक्रियेनंतर दुर्गम भागातील पदे रिक्त राहू नयेत म्हणून १८ जून २०२४ च्या बदली शासन निर्णयामध्ये समानीकरणाची तरतूद केली आहे. त्यानुसार प्रत्येक जिल्हा परिषदेने प्रत्यक्ष बदली प्रक्रियेपूर्वी समानीकरणाच्या जागा निश्चित केल्या. त्यानंतर बदली प्रक्रिया सुरू झाली; परंतु संवर्ग एकमधील बदली मागितलेल्या शिक्षकांना समानीकरणाच्या जागांवर नियुक्ती मिळाली आहे. समानीकरणाच्या जागा बदलीपात्र शिक्षकांना मिळतातच कशा? याबाबत संपूर्ण राज्यांमध्ये शिक्षक वर्गात बदली प्रक्रियेबाबत शंका निर्माण झाली असून, यात काहीतरी गौडबंगाल असल्याची चर्चा आहे. ही बाब प्रशासकीय पातळीवर तातडीने दुरुस्त न झाल्यास याविरुद्ध महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल.- केशवराव जाधव, राज्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटना. 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रEducationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्रTeacherशिक्षक