शहरं
Join us  
Trending Stories
1
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
2
तेव्हा गरजेपेक्षा जास्त कर्मचारी भरले, आता त्यांना बेरोजगार करणार; ॲमेझॉनमध्ये ३०,००० नोकऱ्या धोक्यात
3
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
4
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२५: ‘मौनं सर्वार्थ साधनम्’, येणी वसूल होतील; सरकारी लाभ
5
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक
6
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
7
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
8
मतदाराचे आणि त्याच्या वडिलाचे आडनाव वेगवेगळे, २० हजार मतदारांची नावे संशयास्पद: आदित्य ठाकरे
9
शाळेची नव्हे, धोक्याची घंटा! सरकारी अनास्था आणि 'विनाअनुदानित' इंग्रजी शाळांचा वाढता बाजार
10
सरन्यायाधीश बूटफेक प्रकरण: वकिलावर कारवाई करणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
11
तातडीने सुनावणीस नकार, पण दोन मागण्या मान्य; मराठा-ओबीसी आरक्षण वादात ओबीसी संघटनेला कोर्टाचा दिलासा
12
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
13
तोटा झाल्याची बनावट कागदपत्रे; कुर्ल्यातील कंपनीने कॅनरा बँकेला तब्बल ११ कोटींना गंडवले
14
शिवडीतील दागिने लुटीचा सुरक्षारक्षक निघाला सूत्रधार; एकाच घरात राहत होते सर्व आरोपी
15
राम जन्मभूमी मंदिराचे काम पूर्ण, २५ नोव्हेंबरला भव्य सोहळा, ६ ते ८ हजार निमंत्रित येणार
16
जामीन अर्जाविरोधात अर्ज करण्याचा प्रश्नच येत नाही; खालिद, शार्जिलवरून कोर्टाने दिल्ली पोलिसांना फटकारले
17
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
18
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
19
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
20
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता

शिक्षक बदल्यांचा बोजवारा;संचमान्यता,समानीकरण शासन निर्णयालाच हरताळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 13:21 IST

- शासन आदेशाला केराची टोपली, मंजूर पदांपेक्षा अधिक शिक्षक नियुक्त केल्याने कार्यरत शिक्षकांवर अतिरिक्त होण्याची वेळ

- बी.एम.काळे

जेजुरी : नवीन शैक्षणिक वर्ष १५ जून २०२५ पासून सुरू झाले असतानाही राज्यात सध्या शिक्षकांच्या ऑनलाइन पोर्टलद्वारे बदल्यांची प्रक्रिया सुरू झाली आहे. ही प्रक्रिया राबविण्याची जबाबदारी ‘विन्सिस’ या खासगी कंपनीकडे आहे. मात्र, बदल्यांचा बोजवारा संपूर्ण राज्यात उडालेला पाहावयास मिळत आहे. शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत संचमान्यतेचे निकष डावलून, तसेच समानीकरणाच्या संदर्भात शासन निर्णयालाच केराची टोपली दाखवून शाळांमध्ये मंजूर पदांपेक्षा अधिक शिक्षक नियुक्त केल्याने कार्यरत शिक्षकांवर अतिरिक्त होण्याची वेळ आल्याचे संपूर्ण राज्याचे चित्र आहे.

शिक्षकांची बदली प्रक्रिया पार पडताना अतिरिक्त शिक्षकांचे प्रथम समायोजन करणे आवश्यक होते. मात्र, त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने बदलीमध्ये त्या जागांवर शिक्षक टाकल्याने राज्यभरात शिक्षकांवर अतिरिक्त होण्याची वेळ आली आहे. बदली प्रक्रियेचा एक भाग म्हणून सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी आपल्या जिल्ह्यातील अनिवार्य रिक्त ठेवायच्या जागांची यादी निश्चित करतात. ती यादी जाहीर देखील झाली; पण बदल्यांमध्ये त्याच शाळांवर शिक्षक टाकले गेल्याने पुढील शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत.बदलीच्या शासन निर्णयानुसार समानीकरणाची पदे ही फक्त शिक्षक भरती किंवा खासगी अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनासाठीच खुली करण्यात येतील, हे स्पष्ट नमूद असतानाही तसेच समानीकरणांतर्गत रिक्त ठेवाव्या लागणाऱ्या जागांवर बदलीने नियुक्ती दिली जाणार नाही, असा स्पष्ट शासन निर्णय असताना मात्र काही जिल्हा परिषदांमध्ये अशा शाळांवर बदली पोर्टलद्वारे शिक्षक टाकल्याने पुढील शिक्षकांवर अतिरिक्त होण्याची वेळ आली असून, ते शिक्षक पुढे समायोजनाच्या फेऱ्यात अडकणार आहेत. राज्यात जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये बदली प्रक्रियेचे निकष डावलल्याने शिक्षकांना अतिरिक्त ठरविण्याची शासनाची खेळी असून, जिल्हा परिषद शाळा बंद करण्याचा हा घाट असल्याची चर्चा शिक्षकांमध्ये आहे.सध्या केवळ संवर्ग एकच्या बदल्यांची प्रक्रिया पार पडली असून, अजून संवर्ग तीन, चार व विस्थापित राउंडच्या बदल्या बाकी आहेत. या प्रक्रियेला अजून महिना लागणार असल्याने तोपर्यंत शिक्षकांची काम करण्याची मानसिकता राहणार नाही. शिवाय आपल्या पाल्यांचे नुकसान होणार असल्याने मध्येच बदल्यांचे काढलेले खुळ शासनाने बंद करावे, अशी मागणी पालकवर्गामधून जोर धरत आहे.

बदली प्रक्रियेनंतर दुर्गम भागातील पदे रिक्त राहू नयेत म्हणून १८ जून २०२४ च्या बदली शासन निर्णयामध्ये समानीकरणाची तरतूद केली आहे. त्यानुसार प्रत्येक जिल्हा परिषदेने प्रत्यक्ष बदली प्रक्रियेपूर्वी समानीकरणाच्या जागा निश्चित केल्या. त्यानंतर बदली प्रक्रिया सुरू झाली; परंतु संवर्ग एकमधील बदली मागितलेल्या शिक्षकांना समानीकरणाच्या जागांवर नियुक्ती मिळाली आहे. समानीकरणाच्या जागा बदलीपात्र शिक्षकांना मिळतातच कशा? याबाबत संपूर्ण राज्यांमध्ये शिक्षक वर्गात बदली प्रक्रियेबाबत शंका निर्माण झाली असून, यात काहीतरी गौडबंगाल असल्याची चर्चा आहे. ही बाब प्रशासकीय पातळीवर तातडीने दुरुस्त न झाल्यास याविरुद्ध महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल.- केशवराव जाधव, राज्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटना. 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रEducationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्रTeacherशिक्षक