शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

यवतच्या मानकोबावाडा परिसरात तीव्र पाणीटंचाई; दरवर्षीच्या टँकर खर्चाऐवजी होऊ शकतो कायमचा उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2025 15:55 IST

यवतच्या मानकोबावाडा परिसरात तीव्र पाणीटंचाई; दरवर्षीच्या टँकर खर्चाऐवजी होऊ शकतो कायमचा उपाय

यवत : येथील मानकोबावाडा परिसरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ग्रामपंचायत पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीतील पाण्याने तळ गाठल्याने टँकर चालू करण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडे पाठविण्यात आला आहे. उन्हाळा आला की यवतमधील महामार्गाच्या दक्षिण बाजूला भुलेश्वर डोंगर पायथ्याला असलेल्या वस्त्यांमध्ये तीव्र पाण्याची टंचाई निर्माण होते. या भागातील वस्त्यांना पिण्याचे पाणी पुरवठा करण्यासाठी प्रशासनाला टँकर चालू करावे लागतात.

या भागात मानकोबावाडा, खुपटे वस्ती, लाटकर वस्ती, वाघदर वस्ती, दोरगे वस्ती, मलभारे आदी भागात मोठी लोकसंख्या आहे. मात्र, उन्हाळा आला की या भागात पाणीटंचाई ठरलेली आहे. काही अंतरावरून नवीन मुठा उजवा कालवा गेलेला असताना, टँकर सुरू करणे म्हणजे केवळ नियोजनाचा अभाव असल्याचे यावरून दिसून येते. मात्र आता हा पाणीप्रश्न कायमचा सोडवा अशी तळमळीची मागणी ग्रामस्थ करत आहेत.

यवत ग्रामपंचायतीने पाणीटंचाई निर्माण झालेल्या भागात टँकर सुरू करण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडे पाठविला आहे. याबाबत प्रशासकीय कारवाई होऊन टँकर सुरू होईल असे सांगितले जात आहे. मात्र यातील मानकोबावाडा भागातील पाणीटंचाईवर थोडक्या खर्चात कायमचा मार्ग निघू शकतो. यासाठी ग्रामपंचायतीने मुंजोबाच्या तलावात नवीन मुठा कालव्यातील पाणी पाइपलाइन करून सोडल्यास, बाजूच्या पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीतून पाणी नागरिकांना देता येऊ शकते.

यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच समीर दोरगे, ग्रामविकास अधिकारी बालाजी सरवदे यांनी ही बाब तहसीलदार अरुण शेलार, गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांच्या निदर्शनास आणून टंचाई निधीमधून ही पाइपलाइन करण्यासाठी निधी द्यावा अशी मागणी केली आहे. या कामासाठी लागणारे अंदाजपत्रक सादर करण्याच्या सूचना तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांनी ग्रामपंचायतीला दिल्या आहेत. ग्रामपंचायतीने सदर अंदाजपत्रक दिले असून यावर प्रशासनाने गांभिर्याने हालचाल केल्यास आणि प्रशासनाकडून निधी उपलब्ध झाल्यास मानकोबावाडा परिसरात उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईवर कायमस्वरूपी मार्ग निघू शकतो.

पाणीटंचाईच्या काळात पर्यायी उपाययोजना शासनाकडून केल्या जातात. त्या अनुषंगाने यवत आणि भांडगाव गावांच्या सीमेवरील मुंजोबाच्या तलावात पाणी सोडण्याची मागणी ग्रामपंचायतीने केली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून संबंधित विभाग यावरील प्रस्तावावर कार्यवाही करतील. - अरुण शेलार, तहसीलदार दौंडयवत आणि भांडगाव गावांच्या सीमेवरील तलावात टंचाईच्या काळात पाणी सोडण्यात यावे. यासाठी लागणाऱ्या योजनेचा प्रस्ताव यवत ग्रामपंचायतीने आमच्याकडे दिला आहे. सदर प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आला आहे. प्रशासनाने याला मान्यता दिल्यास लवकरच ही योजना राबविली जाईल.- प्रशांत काळे, गटविकास अधिकारी

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रWaterपाणीAgriculture Schemeकृषी योजना