शहरं
Join us  
Trending Stories
1
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
2
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
3
'शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?'; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
4
समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
5
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
6
AI बिनधास्त वापरा, पण त्याआधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा! नाहीतर स्वतःच अडचणीत सापडाल
7
५ राशींवर दुर्गा देवीची कायम लक्ष असते, लाभते विशेष कृपा; हाती राहतो पैसा, शुभ-कल्याण-भरभराट!
8
कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला
9
सेन्सेक्सलाही टाकले मागे! सरकारी कंपनीचा शेअर महिन्यात ४०% नी वधारला; तेजीचे कारण काय?
10
लेक राहासाठीही आहे वेगळी व्हॅनिटी व्हॅन, आलियाचा प्रश्न ऐकून महेश भटही झाले शॉक
11
भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट
12
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार हवा, पण अर्धी अमेरिकाच नाखूश! सर्वेक्षणात झाला धक्कादायक खुलासा 
13
IND vs PAK: 'इतका राग होता तर खेळलाच कशाला?' हस्तांदोलन न करण्यावर शशी थरूर संतापले!
14
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
15
वाढीव मदतीचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर मांडू; मंत्री मकरंद पाटील यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
16
भाजपाच्या अध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर, कशी असेल पुढची वाटचाल? फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
17
भगवा कुर्ता, कपाळी भस्म; संजय दत्तने घेतलं महाकालेश्वरचं दर्शन, भक्तीत तल्लीन झाला अभिनेता
18
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
19
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला

प्रवाशांसाठी गुड न्यूज; सोलापूर - मुंबईदरम्यान धावणाऱ्या‘वंदे भारत’चे डबे वाढवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 13:59 IST

दि. २९ ऑगस्टपासून वंदे भारतचे चार डबे वाढविण्यात येतील, त्यामुळे सोळा डब्याची वंदे भारत भारत एक्स्प्रेस वीस डब्यांची होणार आहे.

पुणे : सोलापूर - मुंबईदरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसचे चार डबे वाढविण्यात येणार आहेत. त्यामुळे पुण्यातून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. दि. २९ ऑगस्टपासून वंदे भारतचे चार डबे वाढविण्यात येतील, त्यामुळे सोळा डब्याची वंदे भारत भारत एक्स्प्रेस वीस डब्यांची होणार आहे.

सोलापूर-मुंबई आणि मुंबई-सोलापूरदरम्यान धावणारी वंदे भारत एक्स्प्रेस (गाडी क्र. २२२२६/२२२२५) या दोन्ही पुण्यातून जाणाऱ्या महत्त्वाच्या गाड्या आहेत. या गाड्यांना पुणे-मुंबई आणि मुंबई - पुणेदरम्यान सर्वाधिक गर्दी असतो.

शिवाय शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशी या गाडीला प्रवाशांची वेटिंग असते. त्यामुळे या गाडीला डबे वाढवावेत, अशी मागणीदेखील केली जात होती. रेल्वे प्रशासनाने मुंबई-नांदेड वंदे भारत आणि मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेससाठी एकत्र रेक वापरण्याचा निर्णय घेतला आहे. वंदे भारतमधून जाणाऱ्या प्रवाशांची संख्या ३१२ने वाढणार आहे.

साडेचार लाखांपेक्षा जास्त प्रवाशांनी केला प्रवास :

सोलापूर - मुंबई आणि मुंबई - सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसच्या चेअरकार आणि इकॉनॉमी क्लाससाठी १०० टक्केपेक्षा जास्त प्रतिसाद मिळत आहे. त्यात पुणे ते मुंबई आणि मुंबई - पुणेदरम्यान सर्वाधिक प्रतिसाद असून, जानेवारी २०२५ पासून या दोन्ही गाड्यांमधून एकूण ४ लाख ६९ हजार ६०९ प्रवाशांनी प्रवास केला आहे.

वाढत्या प्रवाशांमुळे या गाडीला चार डबे वाढविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. त्याचा फायदा पुण्यातून प्रवास करणाऱ्या नागरिकांना होणार आहे. - हेमंत कुमार बेहेरा, जनसंपर्क अधिकारी, पुणे

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडpassengerप्रवासीVande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेस