शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
2
"सचिन घायवळवर गुन्हे दाखल होते, पण..."; मंत्री योगेश कदमांनी सांगितले शस्त्र परवाना देण्याचे कारण
3
बांगलादेशचं पाकिस्तानच्या पावलावर पाऊल! चीनकडून खरेदी करणार १५००० कोटींची २० लढाऊ विमाने
4
प्लेन रनवेवर टेकऑफसाठी सुसाट धावलं, पण अचानक पायलटचं नियंत्रण सुटलं आणि...; व्हिडीओ व्हायरल
5
रोहित पवारांचा सभापती राम शिंदेंवर खळबळजनक आरोप; निलेश घायवळला देशाबाहेर पळवण्यामागे कोण?
6
Video - कर्तव्यनिष्ठेला सलाम! IAS संस्कृती जैन यांना सोनेरी पालखीतून अनोखा निरोप, पाणावले डोळे
7
याला म्हणतात जबरदस्त लिस्टिंग, २०% प्रीमिअमसह लिस्ट झाला शेअर; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
8
"नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नरेंद्र मोदी नाव द्यावं, अदानींचा दि.बा.पाटील नावाला विरोध"
9
“CJI गवई यांच्यावरील हल्ला हा लोकशाहीवरचा हल्ला, सर्वांनी संताप व्यक्त करायला हवा”: सपकाळ
10
VIDEO: आ रा रा रा खतरनाकsss... पक्ष्याने चक्क गिळला जिवंत साप, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्
11
पुढील वर्षी सरासरी १० टक्क्यांपर्यंत पगारवाढ; सर्वाधिक लाभ कुणाला मिळणार?
12
दिवाळीला कार घ्यायचीय? HDFC, ICICI की IndusInd? ५ वर्षांसाठी सर्वात कमी हप्ता कोणाचा?
13
चीन-भारताच्या संबंधात फिल्मी क्लायमॅक्स; ड्रॅगन म्हणाला, " आश्वासन द्या, आम्ही जे देऊ ते अमेरिकेला देणार नाही..."
14
प्रेमानंद महाराजांची प्रकृती आणखी खालावली? आश्रमाकडून मिळाली 'ही' अधिकृत माहिती 
15
रोहित शर्माचं कर्णधारपद जाणार हे आधीच सांगितलं होतं.. प्रेस कॉन्फरन्समध्ये झाला मोठा खुलासा
16
फक्त ८८६ चेंडूत टेस्ट मॅच संपवली; ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवून भारतानं रचला इतिहास!
17
गोल्ड ईटीएफ ठरला नवा मल्टीबॅगर स्टॉक! इतक्या वर्षात ₹१० लाखाचे झाले तब्बल ₹१ कोटी रुपये!
18
Ratan Tata Death Anniversary: वाद... आव्हानं.., रतन टाटांच्या निधनानंतर एका वर्षात किती बदलला टाटा समूह
19
बायकोचं ऐकलं नाही, रोडट्रिपला गेला; अपघतात ३५ वर्षीय गायकाचा मृत्यू, दोन लहान मुलं पोरकी
20
WhatsApp हॅक झालं? लगेच करा 'या' ५ गोष्टी; नाहीतर पूर्ण फोनचाच ताबा जाईल!

राजगड तालुका नामकरणाचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत

By राजू इनामदार | Updated: August 22, 2025 14:21 IST

‘हर हर महादेव’, ‘जय शिवराय’च्या जयघोषाने आणि हलगी, तुरारीच्या निनादाने राजगड-तोरण्याची दरी खोरे दुमदुमून गेले.

वेल्हे : छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची कर्मभूमी आणि हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी असलेल्या वेल्हे तालुक्याचे नामकरण राजगड तालुका म्हणून करण्याचा ऐतिहासिक निर्णय केंद्र सरकारने जाहीर केला आहे. या निर्णयाचे स्वागत गुरुवारी (२१ ऑगस्ट) वेल्हे बुद्रूक (ता. राजगड) येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकावर ढोल-ताशांच्या गजरात आणि पारंपरिक रिवाजात करण्यात आले.

‘हर हर महादेव’, ‘जय शिवराय’च्या जयघोषाने आणि हलगी, तुरारीच्या निनादाने राजगड-तोरण्याची दरी खोरे दुमदुमून गेले. यावेळी परिसरातील शेकडो मावळे, रहिवासी, विविध राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

राज्य मंत्रिमंडळाने यापूर्वी वेल्हे तालुक्याचे नामकरण राजगड तालुका म्हणून करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर केंद्र सरकारच्या मान्यतेसाठी प्रतीक्षा होती. अखेर बुधवारी (२० ऑगस्ट) केंद्र सरकारने या नामकरणास मंजुरी दिली. यामुळे आता देशासह जगाच्या नकाशावर ‘राजगड तालुका’ नाव विराजमान होणार आहे. गेल्या दहा वर्षांपासून मावळा जवान संघटना आणि तत्कालीन शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश वालगुडे यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. वालगुडे यांनी तत्कालीन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडेही याबाबत मागणी केली होती.

राजगड, तोरणा, पानशेत आणि सिंहगड परिसरात सर्वपक्षीय नेते, शिवप्रेमी संघटना आणि मावळ्यांनी या निर्णयाचे ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजी आणि साखर-पेढे वाटून जल्लोषात स्वागत केले. वेल्हे बुद्रूक पंचायत समितीच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकास पुणे जिल्हा दूध संघाचे माजी अध्यक्ष भगवान पासलकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली.

यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष संतोष दसवडकर, मावळा जवान संघटनेचे अध्यक्ष व ज्येष्ठ इतिहास अभ्यासक दत्ताजी नलावडे, राजगड पंचायत समितीच्या सहायक गटविकास अधिकारी एस. टी. तेलंग, वेल्हे पोलिस ठाण्याचे अंमलदार आकाश पाटील, भाजपचे राज्य परिषदेचे सदस्य बाळासाहेब गरुड, जिल्हाध्यक्ष शेखर वढणे, तालुकाध्यक्ष राजू रेणुसे, आनंद देशमाने, सुनील जागडे, बाळासाहेब सणस, इंद्रजीत जेधे, शुभम बेलसरे, अंकुश पासलकर, लक्ष्मण भोसले, खंडू गायकवाड, रामभाऊ राजीवडे आदी उपस्थित होते.

ऐतिहासिक निर्णय

पुणे जिल्हा दूध संघाचे माजी अध्यक्ष भगवान पासलकर म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या जगातील पहिल्या हिंदवी स्वराज्य या स्वतंत्र लोकशाहीवादी राष्ट्रातील राजगड हा पहिला तालुका आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासाठी मोलाचे योगदान दिले आहे.”

तालुक्याचा गौरव

या ऐतिहासिक निर्णयामुळे राजगड तालुका जगाच्या नकाशावर स्वतःची ओळख निर्माण करणार आहे. भोर-राजगड-मुळशीचे आमदार शंकर मांडेकर यांनीही या निर्णयाचे स्वागत करत केंद्र आणि राज्य सरकारचे आभार मानले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडTrafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीस