शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

जनसुरक्षा कायदा की सत्ता सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था? काँग्रेसचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 17:23 IST

- शहरी नक्षलवाद सिद्ध करून दाखवण्याचे आव्हान

पुणे : केंद्रीय गृहमंत्री देशातील नक्षलवादात ७२ टक्के घट झाल्याचे सांगतात तर मग असे असताना राज्य सरकारला जनसुरक्षा कायदा लागू करण्याची गरज का भासते अशी टीका काँग्रेसने केली. शहरी नक्षलवाद आहे म्हणता तर मग तो सिद्ध करून दाखवा असे आव्हानही काँग्रेसने सरकारला दिले.

पक्षाचे प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी म्हणाले, गृहमंत्री २०२६ मध्ये संपूर्ण देश नक्षलवाद मुक्त होणार असल्याचे जाहीरपणे सांगत आहेत. त्याच मुलाखतींमध्ये ते देशातील नक्षलवादात ७२ टक्के घट झाली असल्याचेही सांगतात. मग जनसुरक्षा कायदा का लागू केला जात आहे? ही जनतेच्या सुरक्षेची व्यवस्था आहे की स्वत:च्या सत्तेची ? सरकारच्या विरोधात कोणी काही बोलूच नये, सरकारवर टीका करू नये, सरकारच्या चुका जनतेमध्ये जाऊन सांगितल्या जाऊ नयेत यासाठीच हा नवा कायदा केला जात आहे.

केंद्र व राज्य सरकारने अनेक स्वायत्त संस्थांवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला. तरीही विरोधी आवाज, विरोधातील मते दडपणे त्यांना शक्य झालेले नाही. सक्त वसुली संचलनालय (इडी), निवडणूक आयोग यांना विरोधी पक्षांकडून प्रश्न विचारले जातच आहेत. हे कसे थांबवता येईल याचा विचार करून सरकार हा नवा कायदा आणत आहे असा दावा तिवारी यांनी केला.काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत ४० नक्षलवादी संघटना सहभागी झाल्या होत्या असा आरोप सत्ताधारी भाजपकडून केला गेला, मात्र केंद्रीय गृहखाते हाताशी असूनही त्यातील एकाही संघटनेला सरकार नक्षलवादी असल्याचे सिद्ध करू शकली नाही. विरोधात असणाऱ्यांना विनाचौकशी, विनापुरावा दीर्घ काळ तुरूंगात डांबता येणे शक्य व्हावे असा सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळेच हा जनसुरक्षा कायदा नाही तर सत्तासुरक्षा कायदा आहे अशी टीका तिवारी यांनी केली.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcongressकाँग्रेस