शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

जनसुरक्षा कायदा की सत्ता सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था? काँग्रेसचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 17:23 IST

- शहरी नक्षलवाद सिद्ध करून दाखवण्याचे आव्हान

पुणे : केंद्रीय गृहमंत्री देशातील नक्षलवादात ७२ टक्के घट झाल्याचे सांगतात तर मग असे असताना राज्य सरकारला जनसुरक्षा कायदा लागू करण्याची गरज का भासते अशी टीका काँग्रेसने केली. शहरी नक्षलवाद आहे म्हणता तर मग तो सिद्ध करून दाखवा असे आव्हानही काँग्रेसने सरकारला दिले.

पक्षाचे प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी म्हणाले, गृहमंत्री २०२६ मध्ये संपूर्ण देश नक्षलवाद मुक्त होणार असल्याचे जाहीरपणे सांगत आहेत. त्याच मुलाखतींमध्ये ते देशातील नक्षलवादात ७२ टक्के घट झाली असल्याचेही सांगतात. मग जनसुरक्षा कायदा का लागू केला जात आहे? ही जनतेच्या सुरक्षेची व्यवस्था आहे की स्वत:च्या सत्तेची ? सरकारच्या विरोधात कोणी काही बोलूच नये, सरकारवर टीका करू नये, सरकारच्या चुका जनतेमध्ये जाऊन सांगितल्या जाऊ नयेत यासाठीच हा नवा कायदा केला जात आहे.

केंद्र व राज्य सरकारने अनेक स्वायत्त संस्थांवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला. तरीही विरोधी आवाज, विरोधातील मते दडपणे त्यांना शक्य झालेले नाही. सक्त वसुली संचलनालय (इडी), निवडणूक आयोग यांना विरोधी पक्षांकडून प्रश्न विचारले जातच आहेत. हे कसे थांबवता येईल याचा विचार करून सरकार हा नवा कायदा आणत आहे असा दावा तिवारी यांनी केला.काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत ४० नक्षलवादी संघटना सहभागी झाल्या होत्या असा आरोप सत्ताधारी भाजपकडून केला गेला, मात्र केंद्रीय गृहखाते हाताशी असूनही त्यातील एकाही संघटनेला सरकार नक्षलवादी असल्याचे सिद्ध करू शकली नाही. विरोधात असणाऱ्यांना विनाचौकशी, विनापुरावा दीर्घ काळ तुरूंगात डांबता येणे शक्य व्हावे असा सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळेच हा जनसुरक्षा कायदा नाही तर सत्तासुरक्षा कायदा आहे अशी टीका तिवारी यांनी केली.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcongressकाँग्रेस